शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ऊठ अर्जुना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 05:18 IST

रणांगणावर दु:खाने उद्विग्न मन झालेला अर्जुन धनुष्यबाण टाकून देऊन रथाच्या मागील भागात जाऊन बसला. त्याचे मन करुणेने व्याप्त झाले होते. डोळे आसवांनी भरले होते. तो व्याकूळ दिसत होता.

- शैलजा शेवडेरणांगणावर दु:खाने उद्विग्न मन झालेला अर्जुन धनुष्यबाण टाकून देऊन रथाच्या मागील भागात जाऊन बसला. त्याचे मन करुणेने व्याप्त झाले होते. डोळे आसवांनी भरले होते. तो व्याकूळ दिसत होता. तेव्हा शोक करणाऱ्या अर्जुनाला भगवान मधुसूदन म्हणाले,ऊठ अर्जुना, उचल शस्त्र अन् तयार हो लढण्या,टाकून देऊन षंढपणा, चल शत्रूस रे भिडण्या ।परंतपा तुज शोभत नाही, रणांगणी हे होणे विव्हल,कोठून आले मनात तुझिया, दुष्कीर्तीकर दुबळे कश्मल ।खेद करसी अनुचिताचा, आव आणसी पांडित्याचा,प्राण कुणाचे जावो राहो, विवेकी शोक न करती त्याचा ।बाल्य, यौवन जरा अवस्था, जीवात्म्याला या देही,तसाच पुढती देह दुसरा, जाणत्यास भ्रांती नाही ।जुनाट वस्त्रे टाकून देऊन, मनुष्य घाली नवीन वसने,जीर्ण शरीरा तसेच त्यागून, आत्मा घेतो नवीन शरीरेजन्मरहित हा नित्य असे, क्षयरहित अविनाशी असे,जाणतो जो पुरुष असे, कोण मारील कोणास कसे?तुटतो ना शस्त्राने आत्मा, जळतो ना अग्नीने आत्मा,भिजतो ना पाण्याने आत्मा, सुकतो ना वायूने आत्मा ।अव्यक्त, अचिंत्य, अविकारी आत्मा, अनादी शाश्वत शुद्ध असे, जाणून घेऊन असे अर्जुना, शोक करणे योग्य नसे ।जन्म ज्यास मृत्यू त्याला, मृतास निश्चित जन्म असे,अटळ या गोष्टीकरिता, शोक करणे योग्य नसे ।देहामध्ये जो जीवात्मा, तो सर्वदा अवध्य असे,कुणा प्राण्यास्तव उगाच हा मग, शोक करणे योग्य नसे ।आज इथे या रणभूमीवर, शोक निरर्थक मृत्यूचा,क्षात्रधर्म हा तुझा सांगतो, मार्ग हितकर लढण्याचा ।समजतील भित्रा, पळपुटा, करशील ना तू युद्ध हे जर,दुष्कीर्ती मग तुझी निरंतर, मरणाहून जी अति भयंकर ।जिंकलेस जर, पृथ्वी भोगशील, मृत्यू पावला,स्वर्ग पावशील, म्हणून अर्जुना, युद्धाचा रे निश्चय करूनी, उठ तू चल ।' म्हणूनच भगवद्गीता मंत्ररूप आहे.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक