शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

दया तिचे नांव । भूतांचे पालन ॥

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 18:56 IST

जीवन जगत असताना दया ही अत्यंत आवश्यक आहे. दयेविषयी अनेकांची अनेक मतं आहेत पण देव मिळविण्याचा राजमार्ग म्हणजे दया.. !

- युवा कीर्तनकार ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी (बीड)

दयेविषयी अनेकांची अनेक मतं आहेत पण देव मिळविण्याचा  राजमार्ग म्हणजे दया. जीवन जगत असताना दया ही अत्यंत आवश्यक आहे. आत्यंतिक प्रेम म्हणजे दया.

व्यासमहर्षि दयेची शास्त्रशुद्ध व्याख्या सांगतात -

दयया सर्वभूतेषु संतुष्ट्या येन केन वा ।सर्वेन्द्रियोप शान्त्या च तुष्यत्या शु जनार्दन: ॥

सर्व इंद्रियांचा निग्रह करुन प्राणीमात्रांवर दया केल्याने जनार्दन संतुष्ट होतो पण त्यासाठी आधी इंद्रियांचा निग्रह म्हणजे इंद्रियांवर विजय मिळवणं  महत्वाचं आहे.

एकदिवस तुकाराम महाराज भजन गात होते. भजन संपलं आणि त्यांचा आवडता टाळकरी शिवबा कासार पुढे आला आणि म्हणाला, महाराज.! उद्या एकादशी. आपण खूप मोठे आहात पण उद्या माझ्या गरिबाच्या घरी आलात तर माझं घर पवित्र होईल. माझ्या घरांत शांती नांदेल. तुकाराम महाराज होऽ म्हणाले. शिवबाने घरी येऊन आपल्या पत्नीला सांगितले, अगं.! उद्या मी तुकाराम महाराजांना आपल्या घरी बोलावलं आहे पण ती काहीच बोलली नाही. आपला नवरा त्या टाळकुट्या तुकोबांच्या नादी लागलेला तिला अजिबात पटत नव्हता. ती गप्प बसली. पहाट झाली. शिवबा तुकोबांना आणण्यासाठी निघाला. त्याच्या पत्नीने पातेलंभर पाणी चुलीवर उकळायला ठेवलं. महाराज आले आणि अंगणात पाय धुण्यासाठी वाकले. एवढ्यात स्वयंपाक घराच्या खिडकीतून तिने उकळलेले पाणी तुकोबांच्या पाठीवर ओतले. मरणांत वेदना झाल्या. तुकोबांच्या तोंडातून आर्त शब्द उमटले, पांडुरंगा.! धावऽ रे.! शब्द ऐकून शिवबा धावत आला. महाराजांच्या पाठीवर फोड आले होते. ते दृश्य पाहून जवळ पडलेले पेटते लाकूड घेऊन शिवबा पत्नीच्या अंगावर धावला- थांब.! चांडाळणी.! काय केलंस हे.? ह्या विस्तवाने तुला डाग देतो म्हणजे तुला तुकोबांच्या यातनांचे दु:ख कळेल पण तुकोबांनी शिवबाचा हात धरला आणि ते म्हणाले, तिला का मारतोस..? हे माझ्या पूर्वजन्मीचे संचित आहे. तात्पर्य, स्वतःचे दु:ख दूर सारुन, इतरांच्या दु:खाचा विचार करणं म्हणजे दया..!

भूतांचि दया हे भांडवल संता ।आपुली ममता नाही देही ॥

तर ज्ञानराज माऊली म्हणते -

जे जे भेटे भूत । ते ते मानिजे भगवंत ।हा भक्तियोग निश्चित । जाण माझा ॥

मग प्रश्न असा निर्माण होतो की, दया सर्वांवरच करायची कां..? तुकोबा म्हणतात -

देव्हाऱ्यावरी विंचू आला । देवपूजा नावडे त्याला ।तेथे पैजाराचे काम । अधमासी तो अधम ।।

आपण जर देवघरावरील विंचवाची पूजा करायला लागाल तर तो तुम्हाला डंख मारणारच म्हणून दया करताना तो दया करण्या योग्य आहे का? हे बघून दया करा. सर्पाला कितीही दूध पाजलं तरी त्याचं विषच होणार आहे. मोरोपंत म्हणतात -

दुःखात जीव दिसता चित्ताला यातना जरी होती ।ते दुःख दूर करण्या साठी करि यत्न ती दया म्हणती ॥

जे दुःख पाहून आपल्या अंतःकरणांला पीळ पडतो त्याच्यावर दया दाखविणे म्हणजे प्रेम जे ईश्वराला आवडतं आणि असं प्रेम करणारांसाठी तो येतोच. नाथांघरी कावडी वाहिल्या, गोरोबांची मडकी घडविली, चोखोबांची गुरं राखली, जनाबाईंचं दळण दळलं, मीरेसाठी विष प्याला, गजेंद्रासाठी धावून आला पण यासाठी आपला अहंकार, देहभाव संपला पाहिजे. नाथबाबा म्हणतात -

देह शुद्ध करुनी भजनी भजावे ।अनेकांचे नाठवावे दोष गुण ॥

एकदा दया आत्मसात झाली की क्षमा आणि शांती ओघानेच येते.

दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती ।

दयेने माणूस विश्वावर प्रेम करायला शिकतो. म्हणून साने गुरुजी लिहितात -

" जाईचा मांडव आपल्या घरापुरता घातला तरी चालेल पण प्रेमाचा मांडव शेजारच्या घरावर घालायलाही विसरु नका..! "

फक्त दया करतांना -

पात्रापात्र विवेकोस्तु धेनू पन्नग रेव च ।

ज्यांचं या मातीशी आणि मातेशी प्रेम आहे, नातं आहे त्यांच्यावरच दया करा अन्यथा श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात -

धटासी आणावा धट । उद्धटासी उद्धट ।

जो दुष्ट प्रवृत्तीचा, दुराचाराचा, अनीतीचा अवलंब करुन घर, गाव, देश, राष्ट्र यांच्या नाशाला कारणीभूत होतो त्याला दया न दाखविता त्याच्यातील वाईट वृत्ती नष्ट करणे हीच खरी दया आणि हेच खरे प्राणीमात्रांचे पालन..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी ८७ ९३ ०३ ०३ ०३ ) 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक