शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका हेराला अटक! वाराणसीच्या तुफैलने पाकिस्तानमध्ये भारतातील कोणत्या ठिकाणांची माहिती पाठवली?
2
हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक, वैष्णवीचे मामासासरे IG सुपेकरांनी मांडली बाजू
3
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
4
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
5
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
6
मयंतीची पँट नेहमी मी घातलो, आज तू का घातलीस? Live शोमध्ये गावस्करांनी विचारला मिश्किल प्रश्न, मग...  
7
'फक्त कॅमेऱ्यासमोरच तुमचं रक्त उसळतं' राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल, विचारले ३ प्रश्न!
8
Vaishnavi Hagawane Death Case : ..हा तर मुलींचा छळ करणारा ‘मुळशी पॅटर्न’;तृप्ती देसाई यांच्याकडून संताप  
9
पार्किंगची सोय नसेल तर खरेदी करता येणार नाही कार, सरकार कठोर नियम लागू करण्याच्या तयारीत
10
एक भारतीय कंपनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी! हर्ष गोयंकांनी आकडेवारी मांडली
11
"...तर त्यांचे राजकारणात कसे तुकडे करायचे हे आपण ठरवू"; उद्धव ठाकरे कामगारांसमोर काय बोलले?
12
Vaishnavi Hagawane Death Case: 'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला
13
'पहलगाम हल्ल्याचे मुख्य आरोपी अजूनही मोकाट...', जयराम रमेश यांचे पंतप्रधान मोदींना 4 प्रश्न
14
"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
15
Investment Tips by Robert Kiyosaki : 'महामंदी' येणार? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा इशारा! म्हणाले फक्त 'या' गोष्टीच तुमची संपत्ती वाचवतील
16
Jyoti Malhotra : "माझ्याकडे पैसे नाहीत..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी
17
लष्कर जंग जंग पछाडतंय, पण महिना झाला तरी पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी का सापडत नाही आहेत? ही आहेत कारणं
18
INDvENG: वासिम जाफरने इंग्लंडच्या कसोटी दौऱ्यासाठी निवडला भारताचा संघ; कर्णधार कुणाला केलं पाहिलंत का?
19
हा विकृतपणा अन् नीचपणाचा कळस,अशा प्रवृत्ती ठेचल्याच पाहिजेत;उदय सामंत यांची संतप्त भावना
20
Government Jobs: सरकारी नोकरी आणि पगार जवळपास २ लाख रुपये; एमपीएससीकडून भरतीची घोषणा!

दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 18:58 IST

क्षमेचा विस्तार क्षेत्रज्ञ वृत्ति । अवघी हे क्षिति एकरूप ॥१॥ शांति दया पैसे क्षमा जयारूप । अवघेंचि स्वरूप आत्माराम ...

ठळक मुद्देआपण अज्ञानी जीवाने सुद्धा दया, क्षमा, शांती या गुणांचा अंगीकार करावा ज्यांच्या ठायी हे गुण आहेत त्यांची संगती करावी असा गुप्त रुपाने उपदेश आपल्या देहाच्या प्रत्येक इंद्रियाद्वारे क्षमा हा गुण विस्ताराला येतो

क्षमेचा विस्तार क्षेत्रज्ञ वृत्ति ।अवघी हे क्षिति एकरूप ॥१॥शांति दया पैसे क्षमा जयारूप ।अवघेंचि स्वरूप आत्माराम ॥२॥निंदा द्वेष चेष्टा या अभिमान भाजा ।सांडुनिया भजा केशवासी ॥३॥निवृत्ति तिष्ठतु एकरूप चित्त ।अवघींच समस्त गिळियेलीं ॥४।

प्रस्तुत सेवेसाठी आलेला अभंग श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांचा उपदेश प्रकरणातील असुन आपल्या अज्ञानी जीवांना उपदेश करणारा असा चार चरणाचा अतिशय सुंदर आहे. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात की क्षमेचा विस्तार हीच क्षेत्रज्ञाची वृत्ती आहे म्हणजे आपल्या देहरुपी क्षेत्रात वास करणारा क्षेत्रज्ञ किंवा आत्मा, परमात्मा क्षमाशील आहे , याचीच प्राप्ती सदगुरू कृपेने करुन घेतली असता आपल्या वृत्तीच्या द्वारे त्याच क्षेत्रज्ञाच्या गुणाचा विस्तार होतो म्हणजे आपल्या देहाच्या प्रत्येक इंद्रियाद्वारे क्षमा हा गुण विस्ताराला येतो किंवा आपल्या वृत्तीच्या सामर्थ्यावर इंद्रियाद्वारे क्षमा बाहेर प्रसवते म्हणजे विस्तार पावते. अशी अवस्था झाली असता आपण अपकार्यावर सुद्धा उपकार करायला लागतो कारण सर्व विश्व हे आपलेच एकाचे स्वरुप आहे अशी त्यांची दृष्टी स्वस्वरुपाच्या ठिकाणी एकरुप झालेली असुन त्यांच्याच ठिकाणी शांती, दया, क्षमा नांदुन आहे हेच ज्यांचे रुप आहे त्यांनाच अवघ्या विश्वात एका आत्मारामाचे स्वरुपाचा अनुभव येतो.

कारण दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती म्हणजे ज्यांच्या ठिकाणी दया, क्षमा, शांती हे गुण नांदत आहेत तेथे साक्षात देवाची वस्ती असुन तोच देह देवाचे साक्षात घरच आहे आणि देवच वस्तीला आले म्हटल्यावर त्यांना सहजच आत्मरामाच्या स्वरुपाचा साक्षात्कार झाला आहे म्हणून त्यांना अवघ्या विश्वात एका आत्मरामा शिवाय दुसरे काहीच दिसत नाही. म्हणून आपण अज्ञानी जीवाने सुद्धा दया, क्षमा, शांती या गुणांचा अंगीकार करावा किंवा ज्यांच्या ठायी हे गुण आहेत त्यांची संगती करावी असा गुप्त रुपाने उपदेश करीत आहेत. एवढेच नाही तर निंदा, द्वेष, चेष्टा ज्या अभिमानाच्या संगतीने घडतात त्या अभिमाला भाजा म्हणजे जाळून टाका मग अभिमान गेला  तुका म्हणे देव झाला अशी अवस्था प्राप्त होईल. या करीता अभिमान सांडून किंवा सोडुन केशवाला भजा म्हणजे भगवंताचे अखंड प्रेमपुर्वक नामस्मरण, भजन करा. असा उपदेश करीत आहेत.

शेवटच्या चरणात महाराज सांगतात की आम्ही ( या निवृत्तीने ) सुद्धा सदगुरू कृपेने अभिमान रहित होऊन एकरुप चित्ताने भगवंताचे भजन केले आहे म्हणून अवघ्याच गुणदोषांना गिळून टाकले आहे म्हणजे गुणदोषांच्या पलिकडे असलेल्या किंवा दोषरहीत, गुणातीत असलेल्या पांडुरंग परमात्म्याला आपलेसे करुन अवीट आनंदाचा उपभोग घेत आहोत. आणि आपण इतरांनी सुद्धा याच ( संतांच्या, सदगुरुंच्या ) वाटेने जाऊन अवीट असा अपरिमित आनंद प्राप्त करुन घ्यावा. 

-  ह.भ.प. वसंत साठे महाराज,बीबीदारफळ, ता. उत्तर सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक