शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 18:58 IST

क्षमेचा विस्तार क्षेत्रज्ञ वृत्ति । अवघी हे क्षिति एकरूप ॥१॥ शांति दया पैसे क्षमा जयारूप । अवघेंचि स्वरूप आत्माराम ...

ठळक मुद्देआपण अज्ञानी जीवाने सुद्धा दया, क्षमा, शांती या गुणांचा अंगीकार करावा ज्यांच्या ठायी हे गुण आहेत त्यांची संगती करावी असा गुप्त रुपाने उपदेश आपल्या देहाच्या प्रत्येक इंद्रियाद्वारे क्षमा हा गुण विस्ताराला येतो

क्षमेचा विस्तार क्षेत्रज्ञ वृत्ति ।अवघी हे क्षिति एकरूप ॥१॥शांति दया पैसे क्षमा जयारूप ।अवघेंचि स्वरूप आत्माराम ॥२॥निंदा द्वेष चेष्टा या अभिमान भाजा ।सांडुनिया भजा केशवासी ॥३॥निवृत्ति तिष्ठतु एकरूप चित्त ।अवघींच समस्त गिळियेलीं ॥४।

प्रस्तुत सेवेसाठी आलेला अभंग श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांचा उपदेश प्रकरणातील असुन आपल्या अज्ञानी जीवांना उपदेश करणारा असा चार चरणाचा अतिशय सुंदर आहे. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात की क्षमेचा विस्तार हीच क्षेत्रज्ञाची वृत्ती आहे म्हणजे आपल्या देहरुपी क्षेत्रात वास करणारा क्षेत्रज्ञ किंवा आत्मा, परमात्मा क्षमाशील आहे , याचीच प्राप्ती सदगुरू कृपेने करुन घेतली असता आपल्या वृत्तीच्या द्वारे त्याच क्षेत्रज्ञाच्या गुणाचा विस्तार होतो म्हणजे आपल्या देहाच्या प्रत्येक इंद्रियाद्वारे क्षमा हा गुण विस्ताराला येतो किंवा आपल्या वृत्तीच्या सामर्थ्यावर इंद्रियाद्वारे क्षमा बाहेर प्रसवते म्हणजे विस्तार पावते. अशी अवस्था झाली असता आपण अपकार्यावर सुद्धा उपकार करायला लागतो कारण सर्व विश्व हे आपलेच एकाचे स्वरुप आहे अशी त्यांची दृष्टी स्वस्वरुपाच्या ठिकाणी एकरुप झालेली असुन त्यांच्याच ठिकाणी शांती, दया, क्षमा नांदुन आहे हेच ज्यांचे रुप आहे त्यांनाच अवघ्या विश्वात एका आत्मारामाचे स्वरुपाचा अनुभव येतो.

कारण दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती म्हणजे ज्यांच्या ठिकाणी दया, क्षमा, शांती हे गुण नांदत आहेत तेथे साक्षात देवाची वस्ती असुन तोच देह देवाचे साक्षात घरच आहे आणि देवच वस्तीला आले म्हटल्यावर त्यांना सहजच आत्मरामाच्या स्वरुपाचा साक्षात्कार झाला आहे म्हणून त्यांना अवघ्या विश्वात एका आत्मरामा शिवाय दुसरे काहीच दिसत नाही. म्हणून आपण अज्ञानी जीवाने सुद्धा दया, क्षमा, शांती या गुणांचा अंगीकार करावा किंवा ज्यांच्या ठायी हे गुण आहेत त्यांची संगती करावी असा गुप्त रुपाने उपदेश करीत आहेत. एवढेच नाही तर निंदा, द्वेष, चेष्टा ज्या अभिमानाच्या संगतीने घडतात त्या अभिमाला भाजा म्हणजे जाळून टाका मग अभिमान गेला  तुका म्हणे देव झाला अशी अवस्था प्राप्त होईल. या करीता अभिमान सांडून किंवा सोडुन केशवाला भजा म्हणजे भगवंताचे अखंड प्रेमपुर्वक नामस्मरण, भजन करा. असा उपदेश करीत आहेत.

शेवटच्या चरणात महाराज सांगतात की आम्ही ( या निवृत्तीने ) सुद्धा सदगुरू कृपेने अभिमान रहित होऊन एकरुप चित्ताने भगवंताचे भजन केले आहे म्हणून अवघ्याच गुणदोषांना गिळून टाकले आहे म्हणजे गुणदोषांच्या पलिकडे असलेल्या किंवा दोषरहीत, गुणातीत असलेल्या पांडुरंग परमात्म्याला आपलेसे करुन अवीट आनंदाचा उपभोग घेत आहोत. आणि आपण इतरांनी सुद्धा याच ( संतांच्या, सदगुरुंच्या ) वाटेने जाऊन अवीट असा अपरिमित आनंद प्राप्त करुन घ्यावा. 

-  ह.भ.प. वसंत साठे महाराज,बीबीदारफळ, ता. उत्तर सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक