शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

आत्मज्ञान प्राप्तीचे साधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 01:06 IST

पूर्वेकडील सर्वाधिक पवित्र स्थळ म्हणजे काशी, जे आज बनारस म्हणून ओळखले जाते. काशीला या विश्वाचा गाभा समजले जाते. काशीचे निर्माण नक्की  केव्हा झाले आहे हे कोणालाच माहिती नाही.

- सद्गुरू जग्गी वासुदेव

पूर्वेकडील सर्वाधिक पवित्र स्थळ म्हणजे काशी, जे आज बनारस म्हणून ओळखले जाते. काशीला या विश्वाचा गाभा समजले जाते. काशीचे निर्माण नक्की  केव्हा झाले आहे हे कोणालाच माहिती नाही. दंतकथांनुसार हे खूपच प्राचीन, काळातीत ठिकाण आहे. आत्मज्ञानाच्या साक्षात्कारासाठी या स्थळाचे निर्माण करण्यात आले आणि संपूर्ण शहर एका विशिष्ट संरचनेत वसवले गेले - सात स्तरांमध्ये. आत्मज्ञानप्राप्तीसाठी हे सातही स्तर पार करून जाणे आवश्यक होते. काशीचे आणखी एक नाव म्हणजे ‘महा-स्मशान’, म्हणजे ‘अंत्यसंस्काराचे श्रेष्ठ ठिकाण.’ मणिकर्णिका घाट हे काशीचे केंद्रस्थान म्हणजेच काशीचा गाभा आहे, जेथे सतत नेहमी किमान एक तरी प्रेत जळताना दिसतेच. त्या ठिकाणी मरण पावलेल्यांसाठी आणि दहन केल्या जाणाऱ्या व्यक्तींसाठी आवश्यक असे वातावरण निर्माण केले गेले होते़ जर कोणी हे सातही स्तर पार करतात, तर नक्कीच ते पंचमहाभूतांच्या बंधनातून मुक्त होतात. अगदी प्राचीन काळापासून, अशी परंपरा होती की वृद्धत्व चाहूल लागताच लोक काशीला जाऊन राहत असत कारण त्यांना आपला मृत्यू तिथेच व्हावा असे वाटायचे. आजकाल ही केवळ एक श्रद्धा बनली आहे; परंतु त्या काळी, तिथे आत्मज्ञानप्राप्तीची एक जिवंत प्रक्रिया उपलब्ध होती आणि या शहराचे निर्माण आत्मज्ञानप्राप्तीचे एक साधन म्हणून केले गेले होते, जर तुम्ही ते सात स्तर पार करू शकलात, तर मणिकर्णिका घाटावर पोहोचेपर्यंत आत्मज्ञान प्राप्त झालेले असेल  आणि हे शरीर सोडून जाण्यापूर्वी, तुम्ही पंचमहाभूतांच्या खेळापलीकडे पोहोचाल अशी व्यवस्था होती.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक