शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

तणावाचे प्रबंधन: काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 16:59 IST

जो तणावापासून वाचण्याचा जितका चांगल्या प्रकारे प्रबंध करतो, तोच आपले जीवन सुध्दा चांगल्या प्रकारे जगु शकतो.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात लहान मुले, युवा, वृध्द, गरीब, श्रीमंत, सर्वांनाच काहींना काही कारणाने तणाव येत असतो. परिणामत: त्यांच्या जीवनात कमी अधिक प्रमाणात दु:ख, अशांती पहायला मिळते. म्हणूनच तणावाचे प्रबंधन करणे ही काळाची गरज आहे. जो तणावापासून वाचण्याचा जितका चांगल्या प्रकारे प्रबंध करतो, तोच आपले जीवन सुध्दा चांगल्या प्रकारे जगु शकतो.असे म्हटले जात ेकी, मन खुश तो जहान खुश’ जीवनात जसे, योग्य आहार, विहार व निद्रा यांना महत्व आहे. तसेच मनाच्या खुशीचे देखील महत्व आहे. त्यामुळे मनाला खुशी प्राप्त व्हावी यासाठी चांगल्या प्रतीचे संगीता ऐका, निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जा, मनाला पसंत असलेल्या चांगल्या गोष्टी करा, एखादा छंद जोपासा, आपल्या आवडीची समाज सेवा करा, ईश्वरीय ज्ञानाचे मनन चिंतन करा, दुसºयांना आनंद द्या, सर्वांशी प्रेमपुर्वक व्यवहार करा, सदैव स्वमानात रहा, दुसºयाचे केवळ गुण पहा, सर्वांविषयी मनात शुभभावना व शुभकामना ठेवा, मनाच्या विरूध्द किंवा मनाला भारी करणारे, दु:ख देणारे कोणतेही कार्य करू नका. खरे तर आपण जेवढे मनाला ईश्वरीय चिंतनामध्ये लावतो, मन्मनाभव स्थितीमध्ये राहतो, सकारात्मक चिंतन करतो, तेवढे आपोआपच मनोरंजन होते व मनाला अपार खुशीची प्राप्ती होते. आध्यात्मिक चिंतनामुळे मनाला विपरीत परिस्थितीशी लढण्याची शक्ती प्राप्त होते. मन सशक्त होते, फलस्वरूप आपण तणावापासून खुप दूर राहतो. वर्तमान समयी तणावमुक्त जीवन जगण्यासाठी आपला दृष्टीकोन व दृष्टी सकारात्मक बनवा. आपले मन खात राहील, असे कुठलेही कर्म करू नका. विपरीत परिस्थितीला सुध्दा ईश्वरीय ज्ञान व राजयोगाच्या आधारे धैर्यता पुर्वक तोंड द्या, कुठल्याही परिस्थितीला घाबरून जावू नका कारण स्वयं ईश्वर आपल्या सोबत आहे. तसेच संगम युगाचा समय देखील कल्याणकारी आहे. त्यामुळे आपले कधीही अकल्याण होणार नाही, हा दृढविश्वास मनात बाळगा, म्हणजे तुमचे जीवन सदैव हेल्दी (स्वस्थ्य), वेल्दी (धनसंपन्न) व हॅपी (आनंदी) अनुभवता येईल.सारांशाने असे म्हणता येईल-सदा सकारात्मक जीवनाची कास धरा।तेणे जणवमुक्तीचा अनुभव तुम्ही करा।।

- ब्र.कु.सुषमा दिदी,रायगड कॉलनी, खामगाव.

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक