शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

पानी केरा बुदबुदा, अस मानुस की जात । एक दिना छिप जाएगा, जो तारा परभात ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 22:21 IST

 धर्मराज हल्लाळेमाणसाचे आयुष्य म्हणजे पाण्यावरील बुडबुड्यासारखे आहे. अगदी क्षणभंगुर, संत कबीर यांनीही आपल्या दोह्यांमध्ये अंतर्मुख करणारे विचार दिले आहेत़ माणसाची जात म्हणजे पाण्यावरच्या बुडबुड्यासारखी आहे़ जसे आकाशातले तारे सकाळ होताच दिसेनासे होतात, तसे माणूसही कोणत्याही क्षणी आपले अस्तित्व सोडून निघून जातो़ मृत्यू अटळ आहे़ तरीही अमरत्वाचा गुण ठायी-ठायी भरलेला असतो़ शेवटच्या क्षणापर्यंत ...

 

धर्मराज हल्लाळे

माणसाचे आयुष्य म्हणजे पाण्यावरील बुडबुड्यासारखे आहे. अगदी क्षणभंगुर, संत कबीर यांनीही आपल्या दोह्यांमध्ये अंतर्मुख करणारे विचार दिले आहेत़ माणसाची जात म्हणजे पाण्यावरच्या बुडबुड्यासारखी आहे़ जसे आकाशातले तारे सकाळ होताच दिसेनासे होतात, तसे माणूसही कोणत्याही क्षणी आपले अस्तित्व सोडून निघून जातो़ मृत्यू अटळ आहे़ तरीही अमरत्वाचा गुण ठायी-ठायी भरलेला असतो़ शेवटच्या क्षणापर्यंत लोभ, माया सुटत नाही़ स्वाभाविकच संतांनाही प्रश्न पडतो, असे काय घडते की माणसे आपल्या अस्तित्वाला प्रश्न विचारत नाहीत़ सत्ता, संपत्तीचा संग्रह करण्याचा विचार अखेरपर्यंत कायम ठेवतात़ नक्कीच निसर्गाने माणसाला जशी स्मरणशक्ती दिली आहे, त्याहूनही दांडगी विस्मरणशक्ती दिली आहे़ त्याचाच परिणाम म्हणून मरणाचेही विस्मरण होते. 

कधी कोणासाठी स्मशानात पोहचल्यावर माणसाचे काय, पाण्यावरचा बुडबुडा हे आठवते़ मात्र ती आठवण म्हणजे स्मशानवैराग्य असते़ ज्याक्षणी स्मशानातून पावले बाहेर पडतात़, त्याक्षणी स्व म्हणजेच स्वार्थ जागा होतो. आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे, म्हणजे त्याचा अर्थ स्वत:चे भले करणे इतके सिमित नाही़ आयुष्य क्षणभंगुर म्हटल्यावर दोन विचार मांडणाºया प्रवृत्ती अवतीभोवती चटकन दिसतात़ एक म्हणजे माणसाचे काय खरे आहे, कधी होत्याचे नव्हते होईल म्हणून जितक्या वेगाने स्वत:भोवती फिरता येईल तितके स्वत:भोवती फिरत राहणे़ अगदी जे दिसेल ते कसे मिळविता येईल, आनंद मिळविण्यापेक्षा कसा ओरबडता येईल, असा अविचार दिसतो़ मात्र संतांना जे अभिपे्रत आहे ते म्हणजे आयुष्याचा मिळालेला अल्प क ाळ सद्विचार, सद्वर्तनाने घालवावा़ कुठलाही संग्रह सोबत येणार नाही. 

जीवसृष्टीतील माणसांनाच हे संत वचन पुन्हा पुन्हा सांगावे लागते़ मानव जात वगळता कुठलाही प्राणी उद्याचा विचार करून संचय करीत नाही़ मानवी मेंदूने मानव जातीची प्रगती केली़ त्या वाटेवर माणूस इतका रूतून बसला की तो सद्मार्ग विसरला़ जसा एकट्याचा हव्यास तसा समुहाचा झाला़ ज्याने आपल्यासमोर विध्वंसच मांडून ठेवला़ मी, माझे कुटुंब, माझे गाव, माझा प्रदेश अशा सीमा अन् अहंकारात बुडालेला माणसांचा समुदायही प्रलय आल्याखेरीज सावध होत नाही़ शेवटी एकच शाश्वत सत्य म्हणजे मानव कल्याणाचा विचाऱ जो संतांनी प्रत्येक वचन सांगताना व्यापक अर्थाने आपल्यासमोर ठेवला़ स्वत:च्या वा आपल्या समुहाच्या स्वार्थासाठी संचय करू नका अन् निसर्गाने दिलेल्या साधनसंपत्तीचा विनाशही करू नका़ पृथ्वीच्या रंगमंचावर वाट्याला आलेली भूमिका मानव जातीच्या उत्कर्षाची असू द्या़ कारण शेवटी हा देह पाण्यावरचा बुडबुडा आहे.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक