शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पानी केरा बुदबुदा, अस मानुस की जात । एक दिना छिप जाएगा, जो तारा परभात ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 22:21 IST

 धर्मराज हल्लाळेमाणसाचे आयुष्य म्हणजे पाण्यावरील बुडबुड्यासारखे आहे. अगदी क्षणभंगुर, संत कबीर यांनीही आपल्या दोह्यांमध्ये अंतर्मुख करणारे विचार दिले आहेत़ माणसाची जात म्हणजे पाण्यावरच्या बुडबुड्यासारखी आहे़ जसे आकाशातले तारे सकाळ होताच दिसेनासे होतात, तसे माणूसही कोणत्याही क्षणी आपले अस्तित्व सोडून निघून जातो़ मृत्यू अटळ आहे़ तरीही अमरत्वाचा गुण ठायी-ठायी भरलेला असतो़ शेवटच्या क्षणापर्यंत ...

 

धर्मराज हल्लाळे

माणसाचे आयुष्य म्हणजे पाण्यावरील बुडबुड्यासारखे आहे. अगदी क्षणभंगुर, संत कबीर यांनीही आपल्या दोह्यांमध्ये अंतर्मुख करणारे विचार दिले आहेत़ माणसाची जात म्हणजे पाण्यावरच्या बुडबुड्यासारखी आहे़ जसे आकाशातले तारे सकाळ होताच दिसेनासे होतात, तसे माणूसही कोणत्याही क्षणी आपले अस्तित्व सोडून निघून जातो़ मृत्यू अटळ आहे़ तरीही अमरत्वाचा गुण ठायी-ठायी भरलेला असतो़ शेवटच्या क्षणापर्यंत लोभ, माया सुटत नाही़ स्वाभाविकच संतांनाही प्रश्न पडतो, असे काय घडते की माणसे आपल्या अस्तित्वाला प्रश्न विचारत नाहीत़ सत्ता, संपत्तीचा संग्रह करण्याचा विचार अखेरपर्यंत कायम ठेवतात़ नक्कीच निसर्गाने माणसाला जशी स्मरणशक्ती दिली आहे, त्याहूनही दांडगी विस्मरणशक्ती दिली आहे़ त्याचाच परिणाम म्हणून मरणाचेही विस्मरण होते. 

कधी कोणासाठी स्मशानात पोहचल्यावर माणसाचे काय, पाण्यावरचा बुडबुडा हे आठवते़ मात्र ती आठवण म्हणजे स्मशानवैराग्य असते़ ज्याक्षणी स्मशानातून पावले बाहेर पडतात़, त्याक्षणी स्व म्हणजेच स्वार्थ जागा होतो. आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे, म्हणजे त्याचा अर्थ स्वत:चे भले करणे इतके सिमित नाही़ आयुष्य क्षणभंगुर म्हटल्यावर दोन विचार मांडणाºया प्रवृत्ती अवतीभोवती चटकन दिसतात़ एक म्हणजे माणसाचे काय खरे आहे, कधी होत्याचे नव्हते होईल म्हणून जितक्या वेगाने स्वत:भोवती फिरता येईल तितके स्वत:भोवती फिरत राहणे़ अगदी जे दिसेल ते कसे मिळविता येईल, आनंद मिळविण्यापेक्षा कसा ओरबडता येईल, असा अविचार दिसतो़ मात्र संतांना जे अभिपे्रत आहे ते म्हणजे आयुष्याचा मिळालेला अल्प क ाळ सद्विचार, सद्वर्तनाने घालवावा़ कुठलाही संग्रह सोबत येणार नाही. 

जीवसृष्टीतील माणसांनाच हे संत वचन पुन्हा पुन्हा सांगावे लागते़ मानव जात वगळता कुठलाही प्राणी उद्याचा विचार करून संचय करीत नाही़ मानवी मेंदूने मानव जातीची प्रगती केली़ त्या वाटेवर माणूस इतका रूतून बसला की तो सद्मार्ग विसरला़ जसा एकट्याचा हव्यास तसा समुहाचा झाला़ ज्याने आपल्यासमोर विध्वंसच मांडून ठेवला़ मी, माझे कुटुंब, माझे गाव, माझा प्रदेश अशा सीमा अन् अहंकारात बुडालेला माणसांचा समुदायही प्रलय आल्याखेरीज सावध होत नाही़ शेवटी एकच शाश्वत सत्य म्हणजे मानव कल्याणाचा विचाऱ जो संतांनी प्रत्येक वचन सांगताना व्यापक अर्थाने आपल्यासमोर ठेवला़ स्वत:च्या वा आपल्या समुहाच्या स्वार्थासाठी संचय करू नका अन् निसर्गाने दिलेल्या साधनसंपत्तीचा विनाशही करू नका़ पृथ्वीच्या रंगमंचावर वाट्याला आलेली भूमिका मानव जातीच्या उत्कर्षाची असू द्या़ कारण शेवटी हा देह पाण्यावरचा बुडबुडा आहे.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक