शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

विचारभ्रमंतीचा चमत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 04:49 IST

विचारभ्रमंतीच्या ऊर्जेमुळेच मेंदूतल्या पेशींना नव्या वाटा दिसत राहतात.

- विजयराज बोधनकरविचारभ्रमंतीच्या ऊर्जेमुळेच मेंदूतल्या पेशींना नव्या वाटा दिसत राहतात. नवी आशा नवा दिवस याचे अतूट नाते घट्ट होतच जाते. विचारभ्रमण हे जर अस्सल तत्त्वनिष्ठ असेल तर सकारात्मकता आपल्याशी जीवाभावाने मैत्री करते. माझ्या विचारांची पायवाट नेमकी मला कुठल्या दिशेला घेऊन जात आहे याची खात्री जो सतत करीत राहतो त्याची प्रत्येक गोष्ट ही नितांत सुंदर निर्माण होत राहते. मी आणि माझा विचार परिसर कसा स्वच्छ आणि संपन्न ठेवता येईल हा विचारच आयुष्याला सुंदर वळणावर आणून ठेवू शकतो. भ्रमंती कधीच संपू नये म्हणून पुस्तकांना मित्र मानून पानोपानी विसावलेल्या सुंदर घटना विचारभ्रमंतीला उत्तेजन देत राहतात. निरीक्षणाने आणि गंभीर मनाने अनेक गोष्टींचा उलगडा होत जातो. प्रश्न सुटत जातात, उत्तराच्या बागेत चैतन्याची कर्मशाळा सहजसुंदर निष्ठेने फुलतच राहते.विचारभ्रमंती संपली की मन साचलेल्या पाण्यासारखं बनत जातं, तसं होऊ नये म्हणूनच तर विचार अध्यात्म मनबुद्धीला सतत नव्या स्वरूपात तयार करीत राहतं. लोभाच्या सतत सहवासात राहिल्यामुळे निर्जीव इमले उभे राहतात, परंतु मनाची उंची मात्र खुंटत जाते. विचारभ्रमंतीला लोभ नासवू शकतो. अस्वस्थ करणारा लोभीपणा सहज सुंदर उलगडत जाणाऱ्या गोष्टींना दडपून टाकतो आणि या लोभाच्या दडपशाहीमुळे सुप्त मनाला यातना सहन कराव्या लागतात. याच सुप्त यातनेतून एखादा मनोरोगही जडण्याची शक्यता निर्माण होते. मनाची निर्भयता डळमळीत झाली की बुद्धीचा तोल जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून विचारभ्रमंतीसाठी अति लोभाचे खच्चीकरण करणेच उपयोगाचे ठरू शकते.सुंदर विचार प्रकटीकरणाचे फायदे असे होतात की नव्या विचारांचे गुच्छ आपल्याच व्यक्तिमत्त्वाला नवे रूप नकळत बहाल करीत राहते. नवे आयाम प्राप्त होत राहतात. संकुचित विचारांचा नायनाट होऊन तिथे सशक्त विचारांची मालिका नव्या कल्पनांचा पाठपुरावा करीत सुटते. ती नव्याची नवी भूक नव्या निर्मितीला प्रोत्साहित करीत राहते. कल्पनाशक्ती वाढीला लागते ती केवळ विचारभ्रमणामुळेच! वाचन, मनन, चिंतनाची सततची मैत्री एका सहज सुंदर नव्या दुनियेत घेऊन जात राहते. ती आनंदाची विचार बाग नव्या रंगरूपासह फुलतच राहते. याचसाठी माणूस धडपडत असतो. नव्या संकल्पनांचा पाठलाग करीत राहणे हा तर मानवी स्वभावच आहे. अन्यथा आजही आपण बैलगाडीतूनच प्रवास करीत असतो. नवा दिवस उजाडतोच नव्या कल्पना घेऊन. भूतकाळ संपन्न असला की वर्तमान फुललेल्या फुलासारखा भासत राहतो.बंद कळीलासुद्धा फुलात रूपांतर करण्यासाठी गतिमान भ्रमंती करावीच लागते, तेव्हा कुठे लपलेल्या पाकळ्या मुक्त होऊन आकार, उकार, रंग याचं दर्शन घडवत राहतात. कळीसुद्धा अफाट कार्यक्षमता अंगी आणून त्याचं प्रकटीकरण फुलातून दाखवत राहते. मनाच्या विश्वात अगणित ऊर्जेचा साठा भरून आहे. त्याला फक्त उत्तम विचारांची सोबत मिळाली की रंकाचा राजा बनू शकतो. म्हणूनच नव्या जगात अवतरणाºया जीवाला पहिले गुरू मिळतात ते आईवडील, दुसरे गुरूजन आणि त्यानंतर त्या विचार मंथनाला सुरुवात करताना स्वत:च स्वत:चा मार्गदर्शक बनत जातो आणि सततच्या विचारभ्रमंतीमुळे आयुष्याचे अनेक सुप्त पैलू चकाकून टाकतो. म्हणूनच विचारांची भ्रमंती करीत राहणे आजची महत्त्वाची गरज आहे.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक