शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

विचारभ्रमंतीचा चमत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 04:49 IST

विचारभ्रमंतीच्या ऊर्जेमुळेच मेंदूतल्या पेशींना नव्या वाटा दिसत राहतात.

- विजयराज बोधनकरविचारभ्रमंतीच्या ऊर्जेमुळेच मेंदूतल्या पेशींना नव्या वाटा दिसत राहतात. नवी आशा नवा दिवस याचे अतूट नाते घट्ट होतच जाते. विचारभ्रमण हे जर अस्सल तत्त्वनिष्ठ असेल तर सकारात्मकता आपल्याशी जीवाभावाने मैत्री करते. माझ्या विचारांची पायवाट नेमकी मला कुठल्या दिशेला घेऊन जात आहे याची खात्री जो सतत करीत राहतो त्याची प्रत्येक गोष्ट ही नितांत सुंदर निर्माण होत राहते. मी आणि माझा विचार परिसर कसा स्वच्छ आणि संपन्न ठेवता येईल हा विचारच आयुष्याला सुंदर वळणावर आणून ठेवू शकतो. भ्रमंती कधीच संपू नये म्हणून पुस्तकांना मित्र मानून पानोपानी विसावलेल्या सुंदर घटना विचारभ्रमंतीला उत्तेजन देत राहतात. निरीक्षणाने आणि गंभीर मनाने अनेक गोष्टींचा उलगडा होत जातो. प्रश्न सुटत जातात, उत्तराच्या बागेत चैतन्याची कर्मशाळा सहजसुंदर निष्ठेने फुलतच राहते.विचारभ्रमंती संपली की मन साचलेल्या पाण्यासारखं बनत जातं, तसं होऊ नये म्हणूनच तर विचार अध्यात्म मनबुद्धीला सतत नव्या स्वरूपात तयार करीत राहतं. लोभाच्या सतत सहवासात राहिल्यामुळे निर्जीव इमले उभे राहतात, परंतु मनाची उंची मात्र खुंटत जाते. विचारभ्रमंतीला लोभ नासवू शकतो. अस्वस्थ करणारा लोभीपणा सहज सुंदर उलगडत जाणाऱ्या गोष्टींना दडपून टाकतो आणि या लोभाच्या दडपशाहीमुळे सुप्त मनाला यातना सहन कराव्या लागतात. याच सुप्त यातनेतून एखादा मनोरोगही जडण्याची शक्यता निर्माण होते. मनाची निर्भयता डळमळीत झाली की बुद्धीचा तोल जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून विचारभ्रमंतीसाठी अति लोभाचे खच्चीकरण करणेच उपयोगाचे ठरू शकते.सुंदर विचार प्रकटीकरणाचे फायदे असे होतात की नव्या विचारांचे गुच्छ आपल्याच व्यक्तिमत्त्वाला नवे रूप नकळत बहाल करीत राहते. नवे आयाम प्राप्त होत राहतात. संकुचित विचारांचा नायनाट होऊन तिथे सशक्त विचारांची मालिका नव्या कल्पनांचा पाठपुरावा करीत सुटते. ती नव्याची नवी भूक नव्या निर्मितीला प्रोत्साहित करीत राहते. कल्पनाशक्ती वाढीला लागते ती केवळ विचारभ्रमणामुळेच! वाचन, मनन, चिंतनाची सततची मैत्री एका सहज सुंदर नव्या दुनियेत घेऊन जात राहते. ती आनंदाची विचार बाग नव्या रंगरूपासह फुलतच राहते. याचसाठी माणूस धडपडत असतो. नव्या संकल्पनांचा पाठलाग करीत राहणे हा तर मानवी स्वभावच आहे. अन्यथा आजही आपण बैलगाडीतूनच प्रवास करीत असतो. नवा दिवस उजाडतोच नव्या कल्पना घेऊन. भूतकाळ संपन्न असला की वर्तमान फुललेल्या फुलासारखा भासत राहतो.बंद कळीलासुद्धा फुलात रूपांतर करण्यासाठी गतिमान भ्रमंती करावीच लागते, तेव्हा कुठे लपलेल्या पाकळ्या मुक्त होऊन आकार, उकार, रंग याचं दर्शन घडवत राहतात. कळीसुद्धा अफाट कार्यक्षमता अंगी आणून त्याचं प्रकटीकरण फुलातून दाखवत राहते. मनाच्या विश्वात अगणित ऊर्जेचा साठा भरून आहे. त्याला फक्त उत्तम विचारांची सोबत मिळाली की रंकाचा राजा बनू शकतो. म्हणूनच नव्या जगात अवतरणाºया जीवाला पहिले गुरू मिळतात ते आईवडील, दुसरे गुरूजन आणि त्यानंतर त्या विचार मंथनाला सुरुवात करताना स्वत:च स्वत:चा मार्गदर्शक बनत जातो आणि सततच्या विचारभ्रमंतीमुळे आयुष्याचे अनेक सुप्त पैलू चकाकून टाकतो. म्हणूनच विचारांची भ्रमंती करीत राहणे आजची महत्त्वाची गरज आहे.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक