शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

विचारभ्रमंतीचा चमत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 04:49 IST

विचारभ्रमंतीच्या ऊर्जेमुळेच मेंदूतल्या पेशींना नव्या वाटा दिसत राहतात.

- विजयराज बोधनकरविचारभ्रमंतीच्या ऊर्जेमुळेच मेंदूतल्या पेशींना नव्या वाटा दिसत राहतात. नवी आशा नवा दिवस याचे अतूट नाते घट्ट होतच जाते. विचारभ्रमण हे जर अस्सल तत्त्वनिष्ठ असेल तर सकारात्मकता आपल्याशी जीवाभावाने मैत्री करते. माझ्या विचारांची पायवाट नेमकी मला कुठल्या दिशेला घेऊन जात आहे याची खात्री जो सतत करीत राहतो त्याची प्रत्येक गोष्ट ही नितांत सुंदर निर्माण होत राहते. मी आणि माझा विचार परिसर कसा स्वच्छ आणि संपन्न ठेवता येईल हा विचारच आयुष्याला सुंदर वळणावर आणून ठेवू शकतो. भ्रमंती कधीच संपू नये म्हणून पुस्तकांना मित्र मानून पानोपानी विसावलेल्या सुंदर घटना विचारभ्रमंतीला उत्तेजन देत राहतात. निरीक्षणाने आणि गंभीर मनाने अनेक गोष्टींचा उलगडा होत जातो. प्रश्न सुटत जातात, उत्तराच्या बागेत चैतन्याची कर्मशाळा सहजसुंदर निष्ठेने फुलतच राहते.विचारभ्रमंती संपली की मन साचलेल्या पाण्यासारखं बनत जातं, तसं होऊ नये म्हणूनच तर विचार अध्यात्म मनबुद्धीला सतत नव्या स्वरूपात तयार करीत राहतं. लोभाच्या सतत सहवासात राहिल्यामुळे निर्जीव इमले उभे राहतात, परंतु मनाची उंची मात्र खुंटत जाते. विचारभ्रमंतीला लोभ नासवू शकतो. अस्वस्थ करणारा लोभीपणा सहज सुंदर उलगडत जाणाऱ्या गोष्टींना दडपून टाकतो आणि या लोभाच्या दडपशाहीमुळे सुप्त मनाला यातना सहन कराव्या लागतात. याच सुप्त यातनेतून एखादा मनोरोगही जडण्याची शक्यता निर्माण होते. मनाची निर्भयता डळमळीत झाली की बुद्धीचा तोल जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून विचारभ्रमंतीसाठी अति लोभाचे खच्चीकरण करणेच उपयोगाचे ठरू शकते.सुंदर विचार प्रकटीकरणाचे फायदे असे होतात की नव्या विचारांचे गुच्छ आपल्याच व्यक्तिमत्त्वाला नवे रूप नकळत बहाल करीत राहते. नवे आयाम प्राप्त होत राहतात. संकुचित विचारांचा नायनाट होऊन तिथे सशक्त विचारांची मालिका नव्या कल्पनांचा पाठपुरावा करीत सुटते. ती नव्याची नवी भूक नव्या निर्मितीला प्रोत्साहित करीत राहते. कल्पनाशक्ती वाढीला लागते ती केवळ विचारभ्रमणामुळेच! वाचन, मनन, चिंतनाची सततची मैत्री एका सहज सुंदर नव्या दुनियेत घेऊन जात राहते. ती आनंदाची विचार बाग नव्या रंगरूपासह फुलतच राहते. याचसाठी माणूस धडपडत असतो. नव्या संकल्पनांचा पाठलाग करीत राहणे हा तर मानवी स्वभावच आहे. अन्यथा आजही आपण बैलगाडीतूनच प्रवास करीत असतो. नवा दिवस उजाडतोच नव्या कल्पना घेऊन. भूतकाळ संपन्न असला की वर्तमान फुललेल्या फुलासारखा भासत राहतो.बंद कळीलासुद्धा फुलात रूपांतर करण्यासाठी गतिमान भ्रमंती करावीच लागते, तेव्हा कुठे लपलेल्या पाकळ्या मुक्त होऊन आकार, उकार, रंग याचं दर्शन घडवत राहतात. कळीसुद्धा अफाट कार्यक्षमता अंगी आणून त्याचं प्रकटीकरण फुलातून दाखवत राहते. मनाच्या विश्वात अगणित ऊर्जेचा साठा भरून आहे. त्याला फक्त उत्तम विचारांची सोबत मिळाली की रंकाचा राजा बनू शकतो. म्हणूनच नव्या जगात अवतरणाºया जीवाला पहिले गुरू मिळतात ते आईवडील, दुसरे गुरूजन आणि त्यानंतर त्या विचार मंथनाला सुरुवात करताना स्वत:च स्वत:चा मार्गदर्शक बनत जातो आणि सततच्या विचारभ्रमंतीमुळे आयुष्याचे अनेक सुप्त पैलू चकाकून टाकतो. म्हणूनच विचारांची भ्रमंती करीत राहणे आजची महत्त्वाची गरज आहे.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक