शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

आत्मज्योतीपासून दुरावलेला मनुष्य अंधकारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 08:59 IST

अखंडित सुखाचा अनुभव जीवनात घ्यायचा असेल तर नम्रता, शालीनता हे गुण अंगी बाळगा. कुटुंब, देश, राज्य यांच्या उन्नतीकरिताही मानवी जीवन महत्त्वाचे आहे.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

आत्मा हेच खरे जीवन आहे. आत्मोन्नती हीच खरी मानवाची उन्नती आहे. आत्मज्योतीचा प्रकाश हा सत्य असून, आत्मज्योतीपासून मनुष्य दुरावला म्हणजे अंधकारात पडतो. या आत्मज्योतीला प्रकाशित करण्यासाठी शरीराचा आधार लागतो. शरीर सदा निरोगी व बलवान असेल तर आत्मज्योतीचा प्रकाश उत्तमरीतीने पाहता येतो. जीवनात नियमितपणा, संयम, प्राणायाम, व्यायाम या साधनांद्वारे शरीरसंपत्ती चांगली ठेवू शकतात. शरीरसंपत्ती नीटनेटकी असली की आत्मस्वरूपाजवळ जाण्यासाठी योग्य ते उपाय करता येतात. आपण जे करतो त्याला शुभचिंतन समजावे. शुभसंकल्प करावेत. मनाला कधीही पराजित होऊ देऊ नका. मन नेहमी प्रसन्न ठेवा. कारण मानवी जीवनात पहिल्यांदा मनाची प्रसन्नता महत्त्वाची आहे. मनाच्या प्रसन्नतेवरच सुखाची अनुभूती घेता येते. सुखाची अनुभूती आली की आत्म्याला शांती लाभते. आत्मा प्रसन्न झाला की शरीर अनेक विकारांपासून मुक्त होते. धन, पुत्र यांच्यापासून मिळणारे सुख शाश्वत नाही ते अखंडित राहू शकत नाही.

अखंडित सुखाचा अनुभव जीवनात घ्यायचा असेल तर नम्रता, शालीनता हे गुण अंगी बाळगा. कुटुंब, देश, राज्य यांच्या उन्नतीकरिताही मानवी जीवन महत्त्वाचे आहे. म्हणून शुद्ध, पवित्र, सत्य, न्यायमुक्त जीवन घालवा. आपला मान वाढेल, आपली विचारधारा बदलेल. दीर्घकाळ जीवनाचा उपभोग घ्याल. आपल्या जीवनात समता, बंधुता, सभ्यता, शिष्टता या गुणांची वृद्धी होईल. भौतिक ऐश्वर्य व आत्मिक ऐश्वर्य यांचा संयोग करून मानवी जीवनाला एक वेगळी दिशा द्याल. सुखाची धार वाढेल. मानवाचे उत्थापन होईल. वास्तविक जीवनाचा जवळून परिचय होईल. सद्सद्विवेक बुद्धी जागृत होईल. मग तुझे-माझे संपेल. आत्माच सर्वदूर निवास करतो याची प्रचिती येईल. आनंदाच्या सागरात डुबाल. आत्मसुखाची अनुभूती मिळेल. जीवन सार्थकी लागल्याचा अनुभव व्यक्त कराल. जीवन तेजोमयी होईल. जीवनात उच्चवत स्थिती प्राप्त होईल.

(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष आहेत)

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक