शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

आत्मज्योतीपासून दुरावलेला मनुष्य अंधकारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 08:59 IST

अखंडित सुखाचा अनुभव जीवनात घ्यायचा असेल तर नम्रता, शालीनता हे गुण अंगी बाळगा. कुटुंब, देश, राज्य यांच्या उन्नतीकरिताही मानवी जीवन महत्त्वाचे आहे.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

आत्मा हेच खरे जीवन आहे. आत्मोन्नती हीच खरी मानवाची उन्नती आहे. आत्मज्योतीचा प्रकाश हा सत्य असून, आत्मज्योतीपासून मनुष्य दुरावला म्हणजे अंधकारात पडतो. या आत्मज्योतीला प्रकाशित करण्यासाठी शरीराचा आधार लागतो. शरीर सदा निरोगी व बलवान असेल तर आत्मज्योतीचा प्रकाश उत्तमरीतीने पाहता येतो. जीवनात नियमितपणा, संयम, प्राणायाम, व्यायाम या साधनांद्वारे शरीरसंपत्ती चांगली ठेवू शकतात. शरीरसंपत्ती नीटनेटकी असली की आत्मस्वरूपाजवळ जाण्यासाठी योग्य ते उपाय करता येतात. आपण जे करतो त्याला शुभचिंतन समजावे. शुभसंकल्प करावेत. मनाला कधीही पराजित होऊ देऊ नका. मन नेहमी प्रसन्न ठेवा. कारण मानवी जीवनात पहिल्यांदा मनाची प्रसन्नता महत्त्वाची आहे. मनाच्या प्रसन्नतेवरच सुखाची अनुभूती घेता येते. सुखाची अनुभूती आली की आत्म्याला शांती लाभते. आत्मा प्रसन्न झाला की शरीर अनेक विकारांपासून मुक्त होते. धन, पुत्र यांच्यापासून मिळणारे सुख शाश्वत नाही ते अखंडित राहू शकत नाही.

अखंडित सुखाचा अनुभव जीवनात घ्यायचा असेल तर नम्रता, शालीनता हे गुण अंगी बाळगा. कुटुंब, देश, राज्य यांच्या उन्नतीकरिताही मानवी जीवन महत्त्वाचे आहे. म्हणून शुद्ध, पवित्र, सत्य, न्यायमुक्त जीवन घालवा. आपला मान वाढेल, आपली विचारधारा बदलेल. दीर्घकाळ जीवनाचा उपभोग घ्याल. आपल्या जीवनात समता, बंधुता, सभ्यता, शिष्टता या गुणांची वृद्धी होईल. भौतिक ऐश्वर्य व आत्मिक ऐश्वर्य यांचा संयोग करून मानवी जीवनाला एक वेगळी दिशा द्याल. सुखाची धार वाढेल. मानवाचे उत्थापन होईल. वास्तविक जीवनाचा जवळून परिचय होईल. सद्सद्विवेक बुद्धी जागृत होईल. मग तुझे-माझे संपेल. आत्माच सर्वदूर निवास करतो याची प्रचिती येईल. आनंदाच्या सागरात डुबाल. आत्मसुखाची अनुभूती मिळेल. जीवन सार्थकी लागल्याचा अनुभव व्यक्त कराल. जीवन तेजोमयी होईल. जीवनात उच्चवत स्थिती प्राप्त होईल.

(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष आहेत)

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक