शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
3
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
4
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
5
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
6
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
7
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
8
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
9
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
10
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
11
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
12
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
13
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
14
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
15
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
16
तेजीनंतर पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण, तरीही चांदी १.१० लाखांच्या पार; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
18
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
19
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
20
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक

आत्मज्योतीपासून दुरावलेला मनुष्य अंधकारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 08:59 IST

अखंडित सुखाचा अनुभव जीवनात घ्यायचा असेल तर नम्रता, शालीनता हे गुण अंगी बाळगा. कुटुंब, देश, राज्य यांच्या उन्नतीकरिताही मानवी जीवन महत्त्वाचे आहे.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

आत्मा हेच खरे जीवन आहे. आत्मोन्नती हीच खरी मानवाची उन्नती आहे. आत्मज्योतीचा प्रकाश हा सत्य असून, आत्मज्योतीपासून मनुष्य दुरावला म्हणजे अंधकारात पडतो. या आत्मज्योतीला प्रकाशित करण्यासाठी शरीराचा आधार लागतो. शरीर सदा निरोगी व बलवान असेल तर आत्मज्योतीचा प्रकाश उत्तमरीतीने पाहता येतो. जीवनात नियमितपणा, संयम, प्राणायाम, व्यायाम या साधनांद्वारे शरीरसंपत्ती चांगली ठेवू शकतात. शरीरसंपत्ती नीटनेटकी असली की आत्मस्वरूपाजवळ जाण्यासाठी योग्य ते उपाय करता येतात. आपण जे करतो त्याला शुभचिंतन समजावे. शुभसंकल्प करावेत. मनाला कधीही पराजित होऊ देऊ नका. मन नेहमी प्रसन्न ठेवा. कारण मानवी जीवनात पहिल्यांदा मनाची प्रसन्नता महत्त्वाची आहे. मनाच्या प्रसन्नतेवरच सुखाची अनुभूती घेता येते. सुखाची अनुभूती आली की आत्म्याला शांती लाभते. आत्मा प्रसन्न झाला की शरीर अनेक विकारांपासून मुक्त होते. धन, पुत्र यांच्यापासून मिळणारे सुख शाश्वत नाही ते अखंडित राहू शकत नाही.

अखंडित सुखाचा अनुभव जीवनात घ्यायचा असेल तर नम्रता, शालीनता हे गुण अंगी बाळगा. कुटुंब, देश, राज्य यांच्या उन्नतीकरिताही मानवी जीवन महत्त्वाचे आहे. म्हणून शुद्ध, पवित्र, सत्य, न्यायमुक्त जीवन घालवा. आपला मान वाढेल, आपली विचारधारा बदलेल. दीर्घकाळ जीवनाचा उपभोग घ्याल. आपल्या जीवनात समता, बंधुता, सभ्यता, शिष्टता या गुणांची वृद्धी होईल. भौतिक ऐश्वर्य व आत्मिक ऐश्वर्य यांचा संयोग करून मानवी जीवनाला एक वेगळी दिशा द्याल. सुखाची धार वाढेल. मानवाचे उत्थापन होईल. वास्तविक जीवनाचा जवळून परिचय होईल. सद्सद्विवेक बुद्धी जागृत होईल. मग तुझे-माझे संपेल. आत्माच सर्वदूर निवास करतो याची प्रचिती येईल. आनंदाच्या सागरात डुबाल. आत्मसुखाची अनुभूती मिळेल. जीवन सार्थकी लागल्याचा अनुभव व्यक्त कराल. जीवन तेजोमयी होईल. जीवनात उच्चवत स्थिती प्राप्त होईल.

(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष आहेत)

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक