शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

माया ही जीवाला भगवंतापासून विन्मुख करत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 19:59 IST

अध्यात्म शास्त्रात जीव हा ईश्वराचाच अंश आहे. देवाचा आणि  जीवाचा अनादी काळापासून संबंध आहे.

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड) 

अध्यात्म शास्त्रात जीव हा ईश्वराचाच अंश आहे. देवाचा आणि  जीवाचा अनादी काळापासून संबंध आहे. देव जसा सूक्ष्म तसा जीव देखील सूक्ष्म आहे. देव जसा दिसत नाही, तसा जीव देखील दिसत नाही. देव जसा अविनाशी तसा जीव देखील अविनाशी. देव जसा चैतन्यमय, तसा जीव देखील चैतन्यमयच.. संत तुलसीदासजी वर्णन करतात -ईश्वर अंश जीव अविनाशी..चेतन अमल सहज सुखराशी..!मनुष्य देहाला जे महत्त्व प्राप्त झाले ते जीवामुळेच झाले. या शरीरावर फक्त जीवाचीच सत्ता आहे. तुकाराम महाराज म्हणतात  हात पाय दिसे शरीर चालता..नाव भेद सत्ता जीवाची ती..!असा हा जीव भगवंताचा अंश असला तरी अविद्येमुळे व मायाजाळी गुरफटल्यामुळे भगवंतापासून विन्मुख झाला. मानव देह मिळाल्यानंतर सर्व प्रथम कोणते कर्म करावयाचे तर, जीवाला भगवत् सन्मुख करण्याचे. समर्थ रामदास स्वामी म्हणतातसांगा नरदेह जोडले आणि परमार्थ बुध्दी विसरले ते मूर्ख कैसे भ्रमले मायाजाळी..!माया ही जीवाला भगवंतापासून विन्मुख करते. जीवाला उद्वीग्न करते. माया ही छायेसारखी आहे. छायेला स्वतंत्र अस्तित्व नाही. सूर्याच्या विरूद्ध दिशेला तोंड करून चाललो तर छायेचा अनुभव येतो. छायेच्या अनुभूतीचे कारण जशी सूर्याची विन्मुखता तसेच मायेच्या अनुभूतीचे कारण भगवंताची विन्मुखता. त्यासाठी माया निर्मूलनाचा उपाय म्हणजे फक्त भगवत् सन्मुखता. अशी देव सन्मुखता प्राप्त होण्यासाठी देह बुद्धी नष्ट होऊन आत्मबुद्धीशी ऐक्य होण्याची गरज आहे. आत्माराम ग्रंथात समर्थ रामदास स्वामी म्हणतात -अहं ऐसे जे स्फुरणतेचिं मायेचे लक्षणतयें मायेपासून त्रिगुणगुणापासून भूतेंअज्ञानामुळे, अविद्येमुळे जीवाला दु:ख प्राप्त होते. देह बुद्धीने केलेली कर्मेच जन्म मरणास कारण ठरतात. आत्मबुद्धीने केलेली कर्मे मोक्षपदाला नेतात. मानवी देहाला येऊन अशी साधना करावी की या जन्म मरणाच्या भवबंधनातून मुक्त होता येईल..!

(लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत; त्यांचा संपर्क क्रमांक 9421344960 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक