शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

माया ही जीवाला भगवंतापासून विन्मुख करत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 19:59 IST

अध्यात्म शास्त्रात जीव हा ईश्वराचाच अंश आहे. देवाचा आणि  जीवाचा अनादी काळापासून संबंध आहे.

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड) 

अध्यात्म शास्त्रात जीव हा ईश्वराचाच अंश आहे. देवाचा आणि  जीवाचा अनादी काळापासून संबंध आहे. देव जसा सूक्ष्म तसा जीव देखील सूक्ष्म आहे. देव जसा दिसत नाही, तसा जीव देखील दिसत नाही. देव जसा अविनाशी तसा जीव देखील अविनाशी. देव जसा चैतन्यमय, तसा जीव देखील चैतन्यमयच.. संत तुलसीदासजी वर्णन करतात -ईश्वर अंश जीव अविनाशी..चेतन अमल सहज सुखराशी..!मनुष्य देहाला जे महत्त्व प्राप्त झाले ते जीवामुळेच झाले. या शरीरावर फक्त जीवाचीच सत्ता आहे. तुकाराम महाराज म्हणतात  हात पाय दिसे शरीर चालता..नाव भेद सत्ता जीवाची ती..!असा हा जीव भगवंताचा अंश असला तरी अविद्येमुळे व मायाजाळी गुरफटल्यामुळे भगवंतापासून विन्मुख झाला. मानव देह मिळाल्यानंतर सर्व प्रथम कोणते कर्म करावयाचे तर, जीवाला भगवत् सन्मुख करण्याचे. समर्थ रामदास स्वामी म्हणतातसांगा नरदेह जोडले आणि परमार्थ बुध्दी विसरले ते मूर्ख कैसे भ्रमले मायाजाळी..!माया ही जीवाला भगवंतापासून विन्मुख करते. जीवाला उद्वीग्न करते. माया ही छायेसारखी आहे. छायेला स्वतंत्र अस्तित्व नाही. सूर्याच्या विरूद्ध दिशेला तोंड करून चाललो तर छायेचा अनुभव येतो. छायेच्या अनुभूतीचे कारण जशी सूर्याची विन्मुखता तसेच मायेच्या अनुभूतीचे कारण भगवंताची विन्मुखता. त्यासाठी माया निर्मूलनाचा उपाय म्हणजे फक्त भगवत् सन्मुखता. अशी देव सन्मुखता प्राप्त होण्यासाठी देह बुद्धी नष्ट होऊन आत्मबुद्धीशी ऐक्य होण्याची गरज आहे. आत्माराम ग्रंथात समर्थ रामदास स्वामी म्हणतात -अहं ऐसे जे स्फुरणतेचिं मायेचे लक्षणतयें मायेपासून त्रिगुणगुणापासून भूतेंअज्ञानामुळे, अविद्येमुळे जीवाला दु:ख प्राप्त होते. देह बुद्धीने केलेली कर्मेच जन्म मरणास कारण ठरतात. आत्मबुद्धीने केलेली कर्मे मोक्षपदाला नेतात. मानवी देहाला येऊन अशी साधना करावी की या जन्म मरणाच्या भवबंधनातून मुक्त होता येईल..!

(लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत; त्यांचा संपर्क क्रमांक 9421344960 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक