शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंतांनी पत्रे  : प्रेमभक्तीचा पाझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 00:41 IST

हे बघा! भक्तीसाठी राणीपदाची, ऐश्वर्याची गरज नाही. कोणतीही महिला आपल्या शुद्ध अंत:करणाने प्रभुभक्तीत तदाकार झाली तर ती मीरेप्रमाणेच संत होऊ शकेल.

प्रिय मित्रसंत मीराबाईबद्दल आपण विचारले की तिला प्रेमभक्ती कशी प्राप्त झाली? आपल्या या प्रश्नासंबंधीचे माझे विचार मी आपणास कळवीत आहे. हे बघा! भक्तीसाठी राणीपदाची, ऐश्वर्याची गरज नाही. कोणतीही महिला आपल्या शुद्ध अंत:करणाने प्रभुभक्तीत तदाकार झाली तर ती मीरेप्रमाणेच संत होऊ शकेल. साध्वी होऊ शकेल. कोणताही भक्त भक्तिभावाने प्रभूशी समरस झाला की देव त्याच्या ओंजळीने पाणी पिऊ लागतो, ही गोष्ट सर्वश्रुत आहे. पण जीवनाला भक्तीचा रंग किती चढला यावरच हे अवलंबून असणार! भक्तीचा संबंध बाहेरच्या अवडंबराशी मुळीच नाही. तो मनाशी व हृदयाशी आहे. ज्या भक्ताचे हृदय भक्तीने भिजून गेलेले असते, ज्या भक्ताचे मन विकल्परहित झालेले असते तेव्हाच त्याच्यासमोर त्याची देवता नाचू लागत असते. प्रश्न असा आहे की ही वृत्ती निर्माण करण्याला काय करावे लागत असते? माझे मत असे आहे की संकटे किंवा संतसमागम या दोन गोष्टींमुळे ही गोष्ट शक्य होते. संतसमागमातून सद्बुद्धी मिळते. संकटांशी सामना करण्याने मनाची ताकद वाढते. पण संकटांशी सामना करण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरावे लागते.संतसमागमासाठी हरिकथा घोकावी लागते. जग हे स्मशानवत समजून वैराग्य प्राप्त करावे लागते. सुख आणि संपत्ती या गोष्टींपासून बाजूला सरकावे लागते.मित्रा, शेवटी मन, बुद्धी व अहंकार ज्या मार्गाने जातात तसाच माणूस बनणार आणि तसाच त्याला अनुभव येणार. तुला दुसऱ्याची कथा आवडते पण प्रत्यक्ष काही करण्याची वेळ येईल तेव्हा मन घडीघडी कसे बदलत जाते याची साक्ष पटेल. यासाठी भक्तांनी व मीरेने काय काय आपत्ती सहन केल्या, हे काही नव्याने सांगण्यासारखे नाही. शेवटी जहराचा पेलासुद्धा तिच्या जवळच्या, घरातल्या लोकांनी दिला ना? हे सारे सहजपणे थोडेच घडते? ज्याप्रमाणे विषयांध माणूस जिवावर उदार होऊन लाज-शरम न बाळगता आपल्या प्रिय वस्तूला प्राप्त करून घेतो, त्याचप्रमाणे देवाशी जेव्हा प्रेम जडते तेव्हा काय होईल ते होवो पण आपल्या देवाशी अंतर पडू नये, असे भक्ताच्या मनाने घेतलेले असते. तो देवाच्या सख्यत्वासाठी वाटेल तसा प्रयत्न करून देवाची भक्ती करतो; व शेवटी देवस्वरूप होतो आणि मग देवाचे कार्य हेच आपले कार्य मानून देवाशी तादात्म्य पावतो असेच मीरेचे व अनेक भक्तांचे झाले आहे. येथे राणीच कशाला? कुब्जा, भिल्लीण, राधा, सखू, जनी, मंदोदरी सर्वांनी आपल्या जीवनाच्या पणत्या देवाजवळ पाजळल्या आणि जळलेल्या कापराप्रमाणे देवाशी समरस झाल्या. देवाच्या प्राप्तीसाठी स्वत:ला विलीन करून घेणे हीच प्रेमभक्तीची खूण आहे.                                                                                                                                                     -तुकड्यादास

  • बाबा मोहोड

 

टॅग्स :Rashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराजAdhyatmikआध्यात्मिक