शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

चला पंढरीसी जाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 17:10 IST

महाराष्ट्रामध्ये सातशे वषार्पूर्वी संत ज्ञानेश्वरांनी पंढरीच्या वारीची खांद्यावर घेतलेली भागवत धमार्ची पताका आज सुद्धा तेवढ्याच उत्साहाने वारकरी खांद्यावर घेवून नाचत आहेत.

महाराष्ट्रामध्ये सातशे वषार्पूर्वी संत ज्ञानेश्वरांनी पंढरीच्या वारीची खांद्यावर घेतलेली भागवत धमार्ची पताका आज सुद्धा तेवढ्याच उत्साहाने वारकरी खांद्यावर घेवून नाचत आहेत. या पायी वारीची अखंड परंपरा संत नामदेव, संत तुकाराम व संत एकनाथ अशा अनेक संतांपासून तर लाखो वारकऱ्यांपर्यत सर्वांनीच अखंडपणे जोपासली आहे. विठ्ठलनामाचा गजर करित होणाºया वारीत सारेच सहभागी होऊन अध्यात्मिक समतेचा संदेश देतात.या रे या रे लहानथोर । याती भलत्या नारी नर।...अशा या भागवत धर्माच्या अध्यात्मिक परंपरेमध्ये संतानी आपले जीवन समर्पित केले आहे. एवढी मोठी भक्तीची परंपरा लाभलेल्या वैष्णवांच्या वारीच्या निमित्ताने आषाढी एकादशीला सर्व संताची मांदीयाळी पंढरीला अवतरते. आपल्या प्राणसख्या पांडूरंगाला पाहण्यासाठी व त्याला भेटण्यासाठी आपला जीव डोळ्यामध्ये साठवून पायी वारी करून ते पंढरीला येतात. मुखाने नाम गातात आपल्या देवाला मनामध्ये साठवून ते म्हणतात-टाळी वाजवावी । गुढी उभारावी।वाट ती चालावी पंढरीची।।सकळ मंगळ निधी । श्रीविठ्ठलाचे नाम आधी।।कोसो दूरून आलेले वारकरी आपला अवघा भाग व शीण त्या पांडूरंगाला पाहता क्षणीच विसरून गेलेले आहेत. त्यांना आता आपल्या संसाराची सुद्धा कोणतीही काळजी राहीलेली नाही. कोणत्याही प्रश्नाशिवाय पंढरीच्या रायाला भेटण्यासाठी ते येथे आलेले आहेत. संत तुकाराम महाराज तर म्हणतात-यारे नाचो अवघे जण । भावे आनंदे करून ।।गाऊं पंढरीचा राणा । क्षेम देऊ संतजना ।।सुख फुकासाठी । साधे हरिनाम बोभाटी ।।प्रेम वाटीतो उदार । देतां नाहीं सान थोर ।।तुका म्हणे धन्य काळ । आजि प्रेमाचा सुकाळ ।।संतांच्या या मांदीयाळी मध्ये एकमेकांना भेटतांना साक्षात विठ्ठल त्यांना आपल्या अंत:करणाशी लावतो आहे असे त्यांना वाटते. एक प्रकारची अध्यात्मिक लोकशाहीच पंढरीला अवतरते. हरिनाम ते अतिशय प्रेमाने गातात व सर्व संतांना क्षेम देतात. संतांच्या या प्रेमाला चंद्रभागेच्या तीरावर भक्तीची अपार भरती येते. ही महा पर्वणी ते आपल्या डोळ्यात साठवून ठेवतात. जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्यांना विठ्ठलच दिसतो अवघे विश्व विठ्ठलमय झाल्याचा भास त्यांना होतो. समत्ववाचा व विश्वरूप दर्शनाचा भाव त्यांचे ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्यांना ईश्वर आपल्यापेक्षा वेगळा वाटतच नाही.जेथे देखे तेथे तुझीच पाऊले। विठ्ठल अवघे कोंदाटले ।।रूप गुणनाम अवघा मेघश्याम । वेगळे काय ते काय उरले।।संत तुकारामांनी तर भक्तिसाधनेचा कळस गाठला. ही उच्चतम अवस्था त्यांना जी प्राप्त झाली त्याला महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांचा परमेश्वराविषयीचा उत्कट भाव आहे. भावानेच भक्तीला पूर्णता येते. देव हा भावाचा भुकेला आहे. ज्याचा जसा भाव असेल तसा त्याचा देव असतो म्हणून.जें जें भेटें भूत । ते ते मानिजे भगवंत ।असा संदेश ते सर्वांना देतात. वारीच्या माध्यमातून असा विश्वसखाभाव निर्माण होत असतो ती विश्वशांतीसाठी आवश्यक प्रार्थना आहे. वारीमुळे प्रत्येक वारकर्यांना एक समाधानाचा भाव प्राप्त होऊन ते आपल्या प्रेमसंख्या पांडुरंगाला क्षेम देतात.

- डॉ. हरिदास आखरे

 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिकPandharpur Wariपंढरपूर वारी