शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञान हेच ब्रह्म आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 18:24 IST

भारतीय ऋषींनी सर्व विषयांवर आपापली मते उपनिषदात नोंदविली आहेत.

अध्यात्मविद्या या विद्येस ‘ब्रह्मविद्या’ असेही म्हणतात. विचारवंत मानवाला सतत चिंतन करावयास लावणारे विषय म्हणजे ब्रह्म, आत्मा, जीव, जीवात्मा, जगत, माया, मानवी शरीर, मोक्ष वगैरे हे सर्व गूढ, गंभीर विषय असून त्यावर हजारो वर्षांपासून चिंतन होत आहे. भारतीय ऋषींनी सर्व विषयांवर आपापली मते उपनिषदात नोंदविली आहेत. उपनिषदांना ‘गुरुवाक्य’ असेही म्हणतात.

‘कोऽऽहम’ म्हणजे मी कोण आहे, मी कुठून आलो, माझे  इथे येण्याचे प्रयोजन काय आहे? या गहन प्रश्नांचे उत्तर उपनिषदात आढळून येते. ‘अथर्ववेदाच्या’ मांडुक्य उपनिषदात याचे उत्तर दिलेले आहे- अयमात्मा ब्रह्म. त्यातच ‘सोऽऽहम’ असेही उत्तर सापडते. ‘यजुर्वेदा’च्या बृहद्कारण्यात याचे उत्तर ‘अहंब्रह्मास्मि’ म्हणजे मी माझ्या छोट्याशा विश्वाचा कर्ता आहे. मी माझा परिवार, माझा व्यवसाय, घरदार, शेती वगैरेंचा कर्ता असून मी माझे छोटेसे विश्व निर्माण केलेले आहे, करु शकतो. माझ्या पत्नीसोबत युगलधर्माने मी माझे प्रतिरुप निर्माण करु शकतो. माझ्या विश्वाचा सांभाळ आणि संरक्षण करु शकतो, म्हणून ‘अहंब्रह्मास्मि’. 

सामवेदाच्या छांदोग्य उपनिषदात त्या प्रश्नाचे उत्तर सापडते. ‘तत्वमसी’ म्हणजे तुही माझ्यासारखाच आहेस. या ठिकाणी मानवा-मानवातला फरक संपून जातो व सर्वजण समान आहेत, हे तत्त्वज्ञान आढळून येते व या ठिकाणी सर्व द्वैत संपून जाते. ऋग्वेदाच्या ‘ऐतरेय’ उपनिषदात (प्रज्ञान ब्रह्मा) हे महावाक्य आढळून येते. याचा अर्थ असा की, ज्ञान हेच ब्रह्म आहे. ज्ञानानेच माणसाचे जीवन सुखी, संपन्न, समृद्ध होवू शकते. 

पाश्चात्य विद्वानांच्या मते, अतिसूक्ष्म अशा जीव असलेल्या कणापासून कोट्यवधी वर्षांत पृथ्वीवर सर्व जीव निर्माण झालेले आहेत. तो कण ‘बिग बँग’ म्हणजे, विश्वात कोट्यवधी वर्षांपूर्वी झालेल्या प्रचंड स्फोटातून निर्माण झालेला ‘हिग्जबोसान’ म्हणजे ‘देवकण’ होय. पृथ्वीवर जीवसृष्टी कशी निर्माण झाली? हा गहन अभ्यासाचा विषय आहे. आज आपणास पृथ्वीवर चार प्रकारचे जीव आढळून येतात. १) उदभिज्ज म्हणजे, गवतापासून ते पिंपळ वटवृक्षापर्यंतचे सर्व वनस्पती व वृक्ष जे बिया किंवा फांदीपासून तयार होतात. २) श्वेदज म्हणजे, घामापासून निर्माण होणारे अल्पायुषी डास, कीटक. ३) अंडज म्हणजे, अंड्यातून निर्माण होणारे मासोळीपासून ते मगरीपर्यंतचे प्रचंड प्राणी. ४) जरायूज म्हणजे मातेच्या गर्भात वाढून जन्म घेणारे पशू व मानव.

हा मानव लक्षावधी वर्षे इतर प्राण्यांसारखाच केवळ उदरभरणासाठीच जगत होता. परिवाराच्या प्रेमामुळे कुटुंबव्यवस्था आपोआप अस्तित्वात आली व त्याचे रुपांतर ‘समूह’ किंवा ‘टोळी’त झाले. अशा अनेक टोळ्या जेव्हा उपजीविकेच्या साधन उपलब्धतेमुळे एकत्रित येवू लागल्या तेव्हा सहजीवनासाठी काही बंधनाची आवश्यकता जाणवू लागली आणि येथूनच निर्माण झाले गहन, चिंतन, मनन, प्रयोग, अध्यात्म व धर्म. 

- डॉ. भरत गहलोत ( सेवानिवृत्त प्राध्यापक व सर्वधर्माचे अभ्यासक, नांदेड ) 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक