शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पितृपक्षात काय करावे, काय करू नये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 15:25 IST

भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणजेच पितृपक्ष हा पितर अथवा पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो.

भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणजेच पितृपक्ष हा पितर अथवा पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो. विशेष म्हणजे या काळात काय करावे आणि काय करू नये, याबाबत अनेक लोक अनभिज्ञ असतात. अनेकजण तर भीतीने श्राद्धच करीत नाहीत. त्यांचे कारण असते की आपल्या हातून काही चूक होऊ नये म्हणून. त्यामुळे पितृपक्षात कोणत्या १० गोष्टी करू नयेत आणि कोणत्या १० गोष्टी आवर्जून कराव्यात, याची माहिती घेऊ या-

पितृपक्षात खालील गोष्टी अजिबात करू नयेत -

१) संपूर्ण पितृपक्षात मांसाहार, मदिरापान कधीही करू नये.

२) यज्ञ, अनुष्ठान किंवा धार्मिक संस्कारही करू नयेत.

३) कोणाकडून उधार पैसे घेऊन कोणते कार्य करू नये.

४) नवे घर, जमीन, वाहन खरेदी करू नये. मात्र, त्याबाबतची बोलणी, सौदा पक्का करणे, पूर्वतयारी आदी सर्व गोष्टी करू शकता.

५) घर जुने असेल तर त्याची डागडुजी करण्याचे काम या काळात करू नये.

६) फारच आवश्यक नसेल तर या काळात कपडे, दागिने आदी वस्तूही खरेदी करण्याचे लांबणीवर टाकावे.

७) घरातील कोणताही भाग अंधारात राहू नये, याची काळजी घ्यावी.

८) कोणत्याही स्थितीत खोटे, फसवणुकीचे कार्य करू नये. खरे तर वर्षभरासाठीच हा नियम पाळायला हवा.

९) आपले कुळ, खानदानाची मर्यादा ओलांडून कोणतेही काम करू नये.

१०) तुम्ही स्वत: श्राद्ध करणारे नसाल म्हणजेच तुमचे मोठे भाऊ श्राद्ध करणारे असतील, तरी वरील सर्व नियम पाळावेत.

पितृपक्षाच्या काळात या गोष्टी आवर्जून करा -

१) श्राद्ध करणाऱ्याने संपूर्ण पितृपक्षात पितरांना उद्देशून तर्पण अवश्य करावे. यात जल, तीळ, कुश, पुष्पाचा वापर करावा.

२) पितृ-श्राद्ध करण्याच्या दिवशी डोके, केस, नखे यांची स्वच्छता जरूर करावी. आपल्या सामर्थ्यानुसार, ब्राह्मणांना बोलावून तर्पण, पिंडदान, भोजन प्रदान केल्यानंतर दक्षिणा द्यावी.

३) दैनंदिन पूजा अवश्य करावी. वर्षभर नियमितपणे मंदिरात जाऊन देवदर्शनघेत असाल तर त्याचेही पालन करावे.

४) ब्रह्मचर्याचे पालन करून श्रद्धापूर्वक नियमित तर्पण करावे.

५) सात्विक भोजन करावे. लसून, कांदा यांचा वापर अजिबात करू नये.

६) संपूर्ण पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या यशगाथा गाव्यात. मोठ्यांचा सन्मान करावा व गुरूजनांची पूजा करावी.

७) दररोज आपल्या सामर्थ्यानुसार दुसऱ्याची मदत अवश्य करावी.

८) मुंग्यांसाठी साखर किंवा इतर गोड पदार्थ योग्य जागी ठेवावेत.

९) घराच्या छतावर किंवा स्वच्छ भांड्यात पाणी, अन्न व गोड वस्तू अवश्य ठेवाव्यात.

१०) घरी श्वान असल्यास त्याची योग्य प्रकारे देखभाल करावी. आपल्या घरी श्वान नसल्यास बाहेरच्या श्वानास दुपारी पोळी, भाकरी जरूर द्यावी.

- संकलन : सुमंत अयाचित

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक