शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

प्रलोभनापासून मनाला ठेवा दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 09:33 IST

मनामध्ये अनेक चांगले वाईट विचार असतात. परंतु मन सतत चिंतनात मग्न असावे. नकारात्मक प्रणाली मनात आणू नये. भगवान अथवा कोणी दिव्यपुरुष याचे चिंतन करणे महत्त्वाचे आहे.

मनामध्ये अनेक चांगले वाईट विचार असतात. परंतु मन सतत चिंतनात मग्न असावे. नकारात्मक प्रणाली मनात आणू नये. भगवान अथवा कोणी दिव्यपुरुष याचे चिंतन करणे महत्त्वाचे आहे. आपले मन-बुद्धी ही एकमात्र परमात्म्याच्या ठिकाणी लावा. मनाला प्रलोभन आणि विषयात भटकू देऊ नका. जी माणसे नेहमी सदा उच्चतर मन:स्थितीत जगतात. त्यांचे मन प्रलोभित नसते. नेहमी चांगले विचार आणि कल्पना याचे भंडार आपल्याजवळ ठेवा. समजा एखादी व्यक्ती तुमचे मन आकर्षित करुन घेते. तेवढ्यात तुमच्या मनात एखादी विचित्र कल्पना आली. त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात अनेक कल्पना निर्माण होतात. मनात उठणाऱ्या सर्व कल्पना नित्य प्रकाशित असतात.

आत्मज्योतित त्या मनात विलीन करण्यासाठी एक प्रभावशाली उपाय म्हणजे प्रलोभित मनाला अंधकारमय प्रदेशातून काढून टाकणे होय. तुमचे मन उर्ध्वगामी करा. त्याच्यासोबत मित्रत्वाचा व्यवहार करा. त्याच्या अंतरिक शत्रूला मारा. त्या मनाला स्त्री-पुरुष, देह आहे ही जाणीवच नसणे. फक्त स्वयं आत्मस्वरूप चैतन्य आणि आनंदीस्वत्व भौतिकस्थिती सुनियोजित असावी. मनातल्या अनेक समस्या चिंता निर्माण करतात. चिंतित मन नेहमी अशांती निर्माण करते. अनिर्णय स्थिती निर्माण करुन कठीण प्रसंग उभे करते. अचानक मनात उठणाऱ्या लहरींना शुभ-भाव नियमित करु शकत नाही. मनात वाईट विचार उठतात तेव्हा पराभूत झालेले मन दृष्टीस पडते. तेथे निष्क्रिय मनाची लक्षणे जाणवतात. ज्या मनात उपद्रव असतो. व्याभिचार असतो. ते मन कधी धर्म-अधर्माच्या कल्पना मांडत नाही. कर्मरेषा सांभाळत नाही. असे मन निष्क्रियतेत गुंतलेले असते. त्या मनाला सावरण्यासाठी भक्तिपूर्ण मनाची गरज असते. आंतर प्रक्रियेत बदल घडविण्यासाठी अनुष्ठान करणाऱ्या मनाची गरज भासते. म्हणून म्हणावेसे वाटते की आंतरमनाचा परिपाठ शुद्ध ठेवा. मन ताळ्यावर येईल.

- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष.)

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक