शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

कर्ता राम हे असो द्यावे..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 13:47 IST

आपले हातून घडणारे प्रत्येक कर्म रघुनाथ स्मरणपूर्वक करावे तरच ते सिद्धीला जाईल.

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

बहुतांशी प्रत्येक मनुष्य कर्माचे कर्तृत्व हे स्वतःकडे घेत असतो त्यामुळे माणसाच्या ठिकाणी कर्म कर्तृत्वाचा अहंकार निर्माण होतो आणि हाच अहंकार भवबंधाला कारण ठरतो.श्रीसमर्थ रामदास स्वामी श्रीमद् दासबोधात म्हणतात -

कर्ता मी ऐसे म्हणसी । तेणें तू कष्टी होसी ॥राम कर्ता म्हणता पावसी । यश कीर्ती प्रताप ॥रघुनाथ स्मरोनि कार्य करावे । ते तात्कालचि सिद्धी पावे ॥ कर्ता राम हे असो द्यावे । अभ्यंतरी ॥

अहंकाराचा त्याग करुन, कर्म कर्तृत्वाचा त्याग करुन, निराभिमान वृत्तीने सर्व कर्मे जर ब्रह्मार्पण केली तरच विहित कर्माला भक्तीचा अधिकार प्राप्त होतो. वेगळी भक्ती करण्याची गरज रहात नाही. भक्तीयोगाच्या संदर्भात आणखी एक महत्वाचे चिंतन असे की, विहित कर्मे जर भगवंताच्या नामाच्या अनुसंधानात केली तर, कर्मयोगाच्या वाटेने, भक्तीमंदिरात जाता येते. नदीवरुन पाणी आणतांना, माताभगिनी डोक्यावर हंडे ठेवतात, हात मोकळे सोडून घराकडे भराभर चालत येतात, रस्त्यात मैत्रिणींबरोबर गप्पागोष्टी करतात तरीही हंड्यातील पाणी सांडत नाही, घागर कलंडत नाही, कारण त्यांचे सगळे लक्ष फक्त डोक्यावरील हंड्याकडेच असते. अनुसंधानात लक्ष फक्त हंड्यातील पाण्याकडेच असते म्हणून पाणी सांडत नाही तसे साधकाने संसारातील कर्म करीत असताना अनुसंधान फक्त परमेश्वराकडेच ठेवले तर, विहित कर्मालाच भक्तीचा दर्जा प्राप्त होईल. आपले हातून घडणारे प्रत्येक कर्म रघुनाथ स्मरणपूर्वक करावे तरच ते सिद्धीला जाईल.

भक्तीयोगाचे स्वरुप विशद करताना श्रीसमर्थ म्हणतात, कर्म निष्काम करा. फलाची अपेक्षा न करता कर्म केले तर, अशी निष्काम भक्ती साधकाला अमरत्व प्रदान करते. निष्काम भक्ताच्या पायाजवळ अष्टमहासिद्धी लोळण घेतात. भगवंताला निष्काम भक्तच आवडतो. संत म्हणतात -

नाना फळें देवापाशी । आणि फळ अंतरी भगवंतासी ॥या कारणे भगवंतासी । निष्काम भजावे ॥

अशा निष्काम कर्मातूनच भक्ती घडते, उपासना घडते, उपासनेतून ज्ञान प्राप्ती होते आणि ज्ञानातून मोक्ष मिळतो. उपासना, भक्ती, ज्ञान आणि मोक्ष या मार्गाने साधकाचा प्रवास होतो..!

( लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांचा संपर्क क्रमांक ९४२१३४४९६० ) 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक