शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

कर्ता राम हे असो द्यावे..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 13:47 IST

आपले हातून घडणारे प्रत्येक कर्म रघुनाथ स्मरणपूर्वक करावे तरच ते सिद्धीला जाईल.

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

बहुतांशी प्रत्येक मनुष्य कर्माचे कर्तृत्व हे स्वतःकडे घेत असतो त्यामुळे माणसाच्या ठिकाणी कर्म कर्तृत्वाचा अहंकार निर्माण होतो आणि हाच अहंकार भवबंधाला कारण ठरतो.श्रीसमर्थ रामदास स्वामी श्रीमद् दासबोधात म्हणतात -

कर्ता मी ऐसे म्हणसी । तेणें तू कष्टी होसी ॥राम कर्ता म्हणता पावसी । यश कीर्ती प्रताप ॥रघुनाथ स्मरोनि कार्य करावे । ते तात्कालचि सिद्धी पावे ॥ कर्ता राम हे असो द्यावे । अभ्यंतरी ॥

अहंकाराचा त्याग करुन, कर्म कर्तृत्वाचा त्याग करुन, निराभिमान वृत्तीने सर्व कर्मे जर ब्रह्मार्पण केली तरच विहित कर्माला भक्तीचा अधिकार प्राप्त होतो. वेगळी भक्ती करण्याची गरज रहात नाही. भक्तीयोगाच्या संदर्भात आणखी एक महत्वाचे चिंतन असे की, विहित कर्मे जर भगवंताच्या नामाच्या अनुसंधानात केली तर, कर्मयोगाच्या वाटेने, भक्तीमंदिरात जाता येते. नदीवरुन पाणी आणतांना, माताभगिनी डोक्यावर हंडे ठेवतात, हात मोकळे सोडून घराकडे भराभर चालत येतात, रस्त्यात मैत्रिणींबरोबर गप्पागोष्टी करतात तरीही हंड्यातील पाणी सांडत नाही, घागर कलंडत नाही, कारण त्यांचे सगळे लक्ष फक्त डोक्यावरील हंड्याकडेच असते. अनुसंधानात लक्ष फक्त हंड्यातील पाण्याकडेच असते म्हणून पाणी सांडत नाही तसे साधकाने संसारातील कर्म करीत असताना अनुसंधान फक्त परमेश्वराकडेच ठेवले तर, विहित कर्मालाच भक्तीचा दर्जा प्राप्त होईल. आपले हातून घडणारे प्रत्येक कर्म रघुनाथ स्मरणपूर्वक करावे तरच ते सिद्धीला जाईल.

भक्तीयोगाचे स्वरुप विशद करताना श्रीसमर्थ म्हणतात, कर्म निष्काम करा. फलाची अपेक्षा न करता कर्म केले तर, अशी निष्काम भक्ती साधकाला अमरत्व प्रदान करते. निष्काम भक्ताच्या पायाजवळ अष्टमहासिद्धी लोळण घेतात. भगवंताला निष्काम भक्तच आवडतो. संत म्हणतात -

नाना फळें देवापाशी । आणि फळ अंतरी भगवंतासी ॥या कारणे भगवंतासी । निष्काम भजावे ॥

अशा निष्काम कर्मातूनच भक्ती घडते, उपासना घडते, उपासनेतून ज्ञान प्राप्ती होते आणि ज्ञानातून मोक्ष मिळतो. उपासना, भक्ती, ज्ञान आणि मोक्ष या मार्गाने साधकाचा प्रवास होतो..!

( लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांचा संपर्क क्रमांक ९४२१३४४९६० ) 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक