शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मनुष्याचे कर्म इच्छेनुसारच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 07:42 IST

कर्म चांगले की वाईट हे त्याच्या मनावरून ठरते. मनानुसार पाप-पुण्याचा निवाडा होतो. मनानेच या बाजाराची देखरेख केली जाते.

जिकडे तिकडे संसाराचा बाजार भरला आहे. या बाजारात सारी खटपट क्रियमाण-कर्म करण्याची वाढलेली दिसते. या बाजाराला जाण्याकरिता मनाची अवस्था महत्त्वाची असते. बाजार कसा आहे, याची प्रचिती कर्माच्या वाटेने गेल्यास येते. कर्म चांगले की वाईट हे त्याच्या मनावरून ठरते. मनानुसार पाप-पुण्याचा निवाडा होतो. मनानेच या बाजाराची देखरेख केली जाते. मनानुसार संकल्प-विकल्प निर्माण होतात. या सर्व कार्याचे साक्षीदार मन आहे. या संसारात प्रत्येक मनुष्य आपल्या इच्छेनुसार कर्म करतो. म्हणजे मनानुसार त्या मनानेच देव आळविला जातो. त्या मनानेच पाप-पुण्य घडतात. त्या मनानेच कर्माची बंधने तुटतात किंवा जुळतात. शरीर स्त्रीचे असो या पुरुषाचे कालांतराने नष्ट होणार; हे खरे असतानादेखील मन त्याला उपाधीत अडकविते. मृगजळाप्रमाणे त्याला भासविते. त्या मनस्वी स्थानावरून जगातील सर्व पदार्थ जाणता येतात. सर्व प्रकारच्या भयापासून तेच मन मुक्त होते किंवा तेच मन भय निर्माण करते. मनानेच काम-क्रोधाला पुष्टी मिळते. मनाची तृप्ती होईपर्यंत मन संसाररूपी भवसागरात डुबक्या मारते. जगातील सर्व कल्पनांचे साक्षी मन आहे.

आपल्याविषयी असलेले प्रेम मोठ्या आदराने निखळून पाहणे किंवा शुद्ध प्रेम असल्याची खात्री पटणे हेही मनावरच ठरते. ब्रह्मज्ञानाचा अनुभव किंवा भक्तिसुखाचा अनुभव मनच घेत असते. आपल्या व्यापक स्वरुपाची कल्पना मनच करते. तुझे-माझे, द्वैत-अद्वैत याचा निर्णय मनच घेत असते. अर्जुनाच्या मनातला संशय घालविण्यासाठी देवाने विश्वरुप दाखविले. तेव्हा अर्जुनाच्या मनातील संशय दूर झाला. फक्त मनात संशय आला की किती गोंधळ उडतो. सर्वच दृष्टिकोन बदलतो. जोपर्यंत मनातला संशय जात नाही तोपर्यंत मनाचे समाधान होत नाही. मन नेदी समाधान- मनाचे समाधान महत्त्वाचे असते. या सर्व गोष्टीला कारणीभूत ‘मन’ आहे. निरुपाधिक किंवा उपाधीरहित अवस्था ही मनावर अवलंबून असते. मनाचा व्यापकपणा, संकुचितपणा त्या मनुष्याच्या कृतीनुसार ठरतो. ती कृती ‘मनच’ करते. संसार जिंंकायचा की त्यात बुडायचे याचे चिंतन मनानीच होते. मन ठरवेल त्यानुसार मनुष्याची ओळख होते. मनरुपी गंगेचा अभिषेक शुद्धरुपी विचारांनी करा. मन मंगलकारक व शुद्ध मोत्यासारखे बनवा. मनुष्यदेहाची सहजता कळेल.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक