शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मनुष्याचे कर्म इच्छेनुसारच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 07:42 IST

कर्म चांगले की वाईट हे त्याच्या मनावरून ठरते. मनानुसार पाप-पुण्याचा निवाडा होतो. मनानेच या बाजाराची देखरेख केली जाते.

जिकडे तिकडे संसाराचा बाजार भरला आहे. या बाजारात सारी खटपट क्रियमाण-कर्म करण्याची वाढलेली दिसते. या बाजाराला जाण्याकरिता मनाची अवस्था महत्त्वाची असते. बाजार कसा आहे, याची प्रचिती कर्माच्या वाटेने गेल्यास येते. कर्म चांगले की वाईट हे त्याच्या मनावरून ठरते. मनानुसार पाप-पुण्याचा निवाडा होतो. मनानेच या बाजाराची देखरेख केली जाते. मनानुसार संकल्प-विकल्प निर्माण होतात. या सर्व कार्याचे साक्षीदार मन आहे. या संसारात प्रत्येक मनुष्य आपल्या इच्छेनुसार कर्म करतो. म्हणजे मनानुसार त्या मनानेच देव आळविला जातो. त्या मनानेच पाप-पुण्य घडतात. त्या मनानेच कर्माची बंधने तुटतात किंवा जुळतात. शरीर स्त्रीचे असो या पुरुषाचे कालांतराने नष्ट होणार; हे खरे असतानादेखील मन त्याला उपाधीत अडकविते. मृगजळाप्रमाणे त्याला भासविते. त्या मनस्वी स्थानावरून जगातील सर्व पदार्थ जाणता येतात. सर्व प्रकारच्या भयापासून तेच मन मुक्त होते किंवा तेच मन भय निर्माण करते. मनानेच काम-क्रोधाला पुष्टी मिळते. मनाची तृप्ती होईपर्यंत मन संसाररूपी भवसागरात डुबक्या मारते. जगातील सर्व कल्पनांचे साक्षी मन आहे.

आपल्याविषयी असलेले प्रेम मोठ्या आदराने निखळून पाहणे किंवा शुद्ध प्रेम असल्याची खात्री पटणे हेही मनावरच ठरते. ब्रह्मज्ञानाचा अनुभव किंवा भक्तिसुखाचा अनुभव मनच घेत असते. आपल्या व्यापक स्वरुपाची कल्पना मनच करते. तुझे-माझे, द्वैत-अद्वैत याचा निर्णय मनच घेत असते. अर्जुनाच्या मनातला संशय घालविण्यासाठी देवाने विश्वरुप दाखविले. तेव्हा अर्जुनाच्या मनातील संशय दूर झाला. फक्त मनात संशय आला की किती गोंधळ उडतो. सर्वच दृष्टिकोन बदलतो. जोपर्यंत मनातला संशय जात नाही तोपर्यंत मनाचे समाधान होत नाही. मन नेदी समाधान- मनाचे समाधान महत्त्वाचे असते. या सर्व गोष्टीला कारणीभूत ‘मन’ आहे. निरुपाधिक किंवा उपाधीरहित अवस्था ही मनावर अवलंबून असते. मनाचा व्यापकपणा, संकुचितपणा त्या मनुष्याच्या कृतीनुसार ठरतो. ती कृती ‘मनच’ करते. संसार जिंंकायचा की त्यात बुडायचे याचे चिंतन मनानीच होते. मन ठरवेल त्यानुसार मनुष्याची ओळख होते. मनरुपी गंगेचा अभिषेक शुद्धरुपी विचारांनी करा. मन मंगलकारक व शुद्ध मोत्यासारखे बनवा. मनुष्यदेहाची सहजता कळेल.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक