शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

कर्म हे निष्काम स्वरुपाचे असावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 11:51 IST

आपल्या हातून असे कार्य घडणे गरजेचे आहे. जे निष्काम स्वरुपाचे असावे.

- डॉ. भालचंद्र ना. संगनवार

कामे सर्वचि मूल्यवान । त्यांची योग्यता समसमान ।।श्रीकृष्ण सिद्धे केले उचच्छिष्टे काढून । ओढिले ढोरे विठ्ठले ।।

केल्या जाणाऱ्या सर्व विकासोन्मुख कामांची योग्यता सामाजिकदृष्ट्या सारखीच असून, विकास कामात त्यांचा वाटा हा कमी किंवा जास्त नसतो, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामविकासाचे महत्त्व सांगताना नमूद करतात. कोणीही सर्व विद्या आत्मसात करीत नाही, परिस्थितीनुसार व श्रमपरत्वे माणूस कला अवगत करतो. जो तिन्ही जगाचा स्वामी, ब्रह्मांड रचेता, पांडवांचे सारथ्य करतो, ही देखील मानवी रुपात महानता आहे. 

एकदा का एखाद्या कार्यास स्वत:हून वाहून घेतले की, त्यात समर्पणाची भावना ओतप्रोत भरलेली असावी. स्वत:च्या विकासासाठी आणि पर्यायाने देशाच्या विकासासाठी आपल्या वाट्याला आलेली कामे तन्मयतेने, सचोटीने व कार्यकुशलतेने करणे म्हणजेच राष्ट्रभक्ती आहे. कार्य ही परंपरा नसून, ध्येय असावे लागते. बहुतांश वेळेस कामे न करताच श्रेयवादात माणसे अडकतात आणि नामोहरम होतात. काम करीत राहणे व फळाची अपेक्षा करू नये, असे असताना देखील काम न करता फलप्राप्ती कशी होईल, ही प्रवृत्ती बळावत आहे. काम न करिता, दाम, नाम आणि पदाची अपेक्षा या विकृती बळावल्या आहेतच. प्रत्येक क्षेत्रात आत्मचिंतन होण्याची गरज असून, कर्म हीच पूजा आहे. यांचा विचार ठासून रुजविण्याची गरज आज निर्माण झाली आहे. 

खरे नाम विष्काम ही ग्रामसेवा । झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा ।।कळो हे वळो देह कार्यी पडू दे । घडू दे प्रभो एवढे घडू दे ।।

कार्यसक्ती कशी असावी, याचे हे ज्वलंत भाष्य आहे. आपल्या हातून असे कार्य घडणे गरजेचे आहे. जे निष्काम स्वरुपाचे असावे. आपण जिथे वावरतो तिथे स्वर्गासम भास झाला पाहिजे, असे मागणे काय असावे तर मरावे परी कीर्तिरुपी उरावे, पण असे घडताना दिसते का, याचा फार विचार करण्याची गरज नाही. कारण निष्काम कर्म ही संकल्पना अत्यंत विरळ झाली आहे. व्यक्ती कर्म करण्यासाठी स्वतंत्र आहे. कर्म फळ, संबंध, नैतिकतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, यालाच कर्मवादाचा सिद्धांत म्हणतात. 

संत मीराबाई, सूरदास, कबीर आदींनी कर्माची धारणा सुस्पष्ट करीत असताना ‘कर्म गती टारे नही टरै । जो जस करे, सो फल चाखा ।।' असे सांगितले आहेच. कर्माची व फळाची प्राप्ती एकाचवेळी शक्य नसते. अर्थात दोहोत खूप अंतर असते. कर्मावस्थेत कर्ता आणि फळास्थेत भोक्ता असे असेल तर कर्मावस्थेतील कर्त्यास त्याची फलप्राप्ती होत नाही. जर कर्म करणारा फलप्राप्ती वेळ बदलला तर फलप्राप्तीचा उपभोक्ता कोण, अशा परिस्थितीत दोन दोष निर्माण होण्याची शक्यता असते. एक क्रोतप्रणाश म्हणजे केलेले कर्म नष्ट होणे आणि दुसरे अक्रुताभ्यूगम म्हणजे अक्रत कर्माचे फळ यावरून असे स्पष्टपणे जाणवते की, कर्मफळ हे निश्चित प्राप्त होतेच. आजच्या कालावधीत कर्मनिष्ठा आणि श्रमप्रतिष्ठा आवश्यक झाल्या आहेत. ज्यांच्याकडे या गोष्टी आढळतात, त्यांच्या हातून मानवकल्याण होणे शक्य आहे. म्हणूनच प्रार्थना केली आहे की,‘तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो, सकळांचे लक्ष तुझकडे वळो, मानवतेचे तेज झळझळो, विश्वामाझी या योगे'

(लेखक हे लातूर येथे जिल्हा वरिष्ठ भू-वैज्ञानिक आहेत ) 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक