शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

आनंद तरंग: शक्तीचं स्मरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 04:24 IST

श्लोक तरुणांनी पाठ करावा व त्यातला धीर मोहित होत नाही हे स्मरणात ठेवावं. शौर्यवृत्ती लढते, संकटात धीरवृत्ती शूराला विचलित होऊ देत नाही.

बा.भो. शास्त्री

शौर्याशिवाय धैर्य व धैर्याशिवाय शौर्य अपंग आहे. शौर्य जवळ असून अर्जुनासारखा वीर धनुर्धर रडत होता. म्हणून श्रीकृष्णाने त्याला गीतेत मंत्र दिला.‘‘देहिनोस्न्यथा देहेकौमार योवनं जरातथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति’’हा श्लोक तरुणांनी पाठ करावा व त्यातला धीर मोहित होत नाही हे स्मरणात ठेवावं. शौर्यवृत्ती लढते, संकटात धीरवृत्ती शूराला विचलित होऊ देत नाही. आपला नेमका धीरच खचलेला असतो. आपण घाई करतो, दम निघत नाही. गाड्यांचे अपघात हे धीर नसल्याने होतात, ओव्हरटेक करताना होतात. आपण दमच धरत नाही. घरात घरातली भांडणं, समाजातल्या समस्या अधीर मनामुळे होतात. चहात साखर कमी-जास्त झाली की भांडणाचं कारण कलहाला पुरेसं होतं. मन स्फोटक झालं आहे. काही लोक अभिमानाने म्हणतात, ‘‘मेरी गाली और गोली साथ साथ चलती है.’’ का रे बाबा, जरा धीर धर ना! त्याच्यात किंवा तुझ्यात बदल होण्याची वाट पाहा. धीर धरून संवाद कर, चर्चा कर, समस्या मिटेल. शिष्टाई नेहमीच फसत नसते. संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची माती करायला निघालेल्या रामेश्वरभटाचा संत तुकाराम महाराजांनी धैर्याने विरोध सहन केला. शेवटी त्यांच्यावर आरती त्यानेच लिहिली. कसोटीला उतरण्यासाठी देवाच्या मूर्तीला व दवाखान्यातल्या पेशंटलाही धीर धरावाच लागतो. स्वामींनी आचार्यांना गीतेचं पारायण सांगितलं नाही, नवस करायला सांगितलं नाही, वैद्याकडे नेलं नाही तर हृदयातच झोपलेल्या धीरत्व व वीरत्वाला जागं केलं. अंधश्रद्धेला त्यांनी कधीच खतपाणी घातलं नाही. ते माणसातील सुप्त गुणांना जागवत राहिले. आपल्याच विसरलेल्या शक्तीचं स्वामी स्मरण करून देत होते.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक