शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

आनंद तरंग: एक प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 02:08 IST

‘कर्म’ हा शब्द खूप छोटा आहे. परंतु त्यामध्ये जीवनाची अनेक सत्ये दडलेली आहेत. या पृथ्वीवर आपण मनुष्यांची रूपे, त्यांची विचारसरणी, कार्यपद्धती यांची विविधता बघतो.

नीता ब्रह्मकुमारी‘भले बुरे ते घडून गेले...’ सुख-दु:ख, यश-अपयश, लाभ-हानी अनेक घटनांनी आपले जीवन भरलेले आहे. कधी कधी परिस्थितीला तोंड देत असताना किती तरी वेळा आपल्या मनात हा विचार येतो की माझ्याबरोबरच असे का झाले? माझ्याच जीवनात असे लोक का आले? इतके श्रम करूनही नेहमी मलाच का अपयश मिळते? प्रश्नांचे जाळे विणून स्वत: गुंतत जातो. जोपर्यंत त्याचा शोध लागत नाही, उत्तर मिळत नाही तोपर्यंत मनात विचारांचे वारे वाहतच राहतात. जीवनाचा हा प्रवास खूप दूरवर चालत राहणारा आहे. हा फक्त जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास नाही, परंतु जन्मोजन्मीचा प्रवास आहे. या प्रवासामध्ये अनेक व्यक्तींशी सुख-दु:खांचे ऋणानुबंध जोडले गेले. हे धागे वेगवेगळ्या नात्यांनी गुंफले गेले. परंतु प्रवासात भेटलेली व्यक्ती, वस्तू, साधने आणिक आहेत, कालांतराने सर्वांनाच आपल्या मार्गाने पुढे जायचे असते. चांगल्या-वाईट कर्मांच्या गाठोड्याव्यतिरिक्त आपल्याजवळ काहीच उरत नाही.

‘कर्म’ हा शब्द खूप छोटा आहे. परंतु त्यामध्ये जीवनाची अनेक सत्ये दडलेली आहेत. या पृथ्वीवर आपण मनुष्यांची रूपे, त्यांची विचारसरणी, कार्यपद्धती यांची विविधता बघतो. थोडंसं थांबून स्वत:च्याच जीवनाला न्याहाळले तरीही आढळून येईल की प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण काही वेगळा अनुभव देऊन जातो. आणि प्रत्येक वेळी कर्मांचे धागे अनेक अनेक व्यक्तींबरोबर आपण बांधत राहतो. सुख-दु:खाचे धागे असे विणले गेले आहेत की ज्यातून सुटका होणे कठीण. ‘जे पेराल ते उगवेल’ हा सिद्धांत आपल्याला माहीत आहे. म्हणून जेव्हा खूप दु:खी होतो तेव्हा अनायासेच आपल्या मुखावर शब्द येतात की ‘माहीत नाही हे कोणत्या जन्माचे, कोणत्या पापकर्मांचे फळ आहे? आपण हेसुद्धा समजतो कीजे आज आपल्याला लाभले आहे ते पूर्वजन्माचे संचित कर्मफळ आहे.

 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक