शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग - शांतीचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 02:53 IST

झोपेची गोळी आहे़, शांतीची नाही़ म्हणून जीवनाचं मोल कळावं

बा.भो. शास्त्रीशांती हेच जीवनमूल्य आहे़ विकारांचा विक्षेप विकल्पाचे हेलकावे थांबले की शांतीचा उदय होतो़ पण त्यात अहंकार हाच मोठा खोडा आहे़ तोच मनाला अस्थिर करतो, तेच तर अशांतीचं मूळ आहे़ संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,‘‘निश्चलत्वाची भावनाजरी नव्हैचि देखै मनातरी शांती केवी अर्जुनाआपु होये’’

झोपेची गोळी आहे़, शांतीची नाही़ म्हणून जीवनाचं मोल कळावं व आपणच आपल्या जन्मी व जगण्यावर प्रेम करावं़ हेच कवी मंगेश पाडगावकरांनी म्हटलं, ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.’ श्रीधर चक्रधरांनी मराठीच्या बीजातच हा सुंदर भाव ओतला आहे़ अहं वाईट नाही़ अहंत वाईट आहे़ तिचा परिवार मोठा आहे़ उपद्रवी आहे़ तृष्णा ही तिची लाडकी मुलगी आहे़ तीच जीवघेणी धावपळ करायला लावते़ व्यथित झालेला माणूस अशांत होतो़ अशांतीत मानसिक दु:ख व वेदना होतात़ अस्वस्थता वाढते़ मिळालेलं सुख भोगता येत नाही़ चित्त अस्थिर होतं़ मन दुबळं होतं, बुद्धीची क्षमता कमी होत जाते़ आत्मग्लानी येते़ जीवनातील उत्साह निघून जातो. राग आला की, भांडं आदळत, भांडण, चिडचिड कटकटी होतात़ अनेक समस्या निर्माण होतात़ आपण समस्येच्या मुळाशी न जाता भरकटतो़ शेवटी सुंदर जीवन अविवेकाने नष्ट करतो़ शांती केवळ क्रांती, शक्तीने, पैशाने मिळते ही आपली भ्रांती आहे़ पण हे सगळे प्रयोग फसले, असं इतिहास आपल्याला सांगतो़ परशुरामाने एकवीस वेळा युद्धात क्षत्रिय मारले़ कुठे शांती स्थापित झाली? बुद्धाने युद्धाशिवाय शांतीचा संदेश दिला़ प्रीती व भक्तीच्या शेतात शांती अंकुरित होते़ पण अहंतेला मुळातून उखडून फेकावे लागते.

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रAdhyatmikआध्यात्मिक