शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग - शांतीचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 02:53 IST

झोपेची गोळी आहे़, शांतीची नाही़ म्हणून जीवनाचं मोल कळावं

बा.भो. शास्त्रीशांती हेच जीवनमूल्य आहे़ विकारांचा विक्षेप विकल्पाचे हेलकावे थांबले की शांतीचा उदय होतो़ पण त्यात अहंकार हाच मोठा खोडा आहे़ तोच मनाला अस्थिर करतो, तेच तर अशांतीचं मूळ आहे़ संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,‘‘निश्चलत्वाची भावनाजरी नव्हैचि देखै मनातरी शांती केवी अर्जुनाआपु होये’’

झोपेची गोळी आहे़, शांतीची नाही़ म्हणून जीवनाचं मोल कळावं व आपणच आपल्या जन्मी व जगण्यावर प्रेम करावं़ हेच कवी मंगेश पाडगावकरांनी म्हटलं, ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.’ श्रीधर चक्रधरांनी मराठीच्या बीजातच हा सुंदर भाव ओतला आहे़ अहं वाईट नाही़ अहंत वाईट आहे़ तिचा परिवार मोठा आहे़ उपद्रवी आहे़ तृष्णा ही तिची लाडकी मुलगी आहे़ तीच जीवघेणी धावपळ करायला लावते़ व्यथित झालेला माणूस अशांत होतो़ अशांतीत मानसिक दु:ख व वेदना होतात़ अस्वस्थता वाढते़ मिळालेलं सुख भोगता येत नाही़ चित्त अस्थिर होतं़ मन दुबळं होतं, बुद्धीची क्षमता कमी होत जाते़ आत्मग्लानी येते़ जीवनातील उत्साह निघून जातो. राग आला की, भांडं आदळत, भांडण, चिडचिड कटकटी होतात़ अनेक समस्या निर्माण होतात़ आपण समस्येच्या मुळाशी न जाता भरकटतो़ शेवटी सुंदर जीवन अविवेकाने नष्ट करतो़ शांती केवळ क्रांती, शक्तीने, पैशाने मिळते ही आपली भ्रांती आहे़ पण हे सगळे प्रयोग फसले, असं इतिहास आपल्याला सांगतो़ परशुरामाने एकवीस वेळा युद्धात क्षत्रिय मारले़ कुठे शांती स्थापित झाली? बुद्धाने युद्धाशिवाय शांतीचा संदेश दिला़ प्रीती व भक्तीच्या शेतात शांती अंकुरित होते़ पण अहंतेला मुळातून उखडून फेकावे लागते.

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रAdhyatmikआध्यात्मिक