शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
2
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
3
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?
4
IND vs AUS 3rd ODI Live Streaming : टीम इंडियासमोर 'व्हाइट वॉश' टाळण्याचं आव्हान
5
'मोदीज मिशन' पुस्तकातील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा; एकनाथ शिंदेंची मागणी
6
Anil Deshmukh: "पोलिसांचे धाडस कसे झाले?" महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर अनिल देशमुख यांची संतप्त प्रतिक्रिया
7
जम्मू-काश्मीर राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर; नॅशनल कॉन्फरन्स 3, तर भाजपचा 1 जागेवर विजय
8
Women’s World Cup 2025: ज्या पावसाने खाते उघडले, त्याने शेवटी वाटही लावली; पाकची विजयाची पाटी कोरीच!
9
चीनचं धक्कादायक कारस्थान उघड, पँगाँग सरोवराजवळ उभारतोय एअर डिफेन्स कॉम्प्लेक्स
10
मोबाईल चार्जरमध्ये लपवलं १५० ग्रॅम सोनं, तेच ठरलं जीवघेणे; युवकाच्या हत्येचा अखेर उलगडा
11
लालबागमधील हल्लेखोर प्रियकरापाठोपाठ ‘त्या’ मुलीचाही मृत्यू, किरकोळ कारणातून गेले दोन जीव  
12
सोन्या-चांदीचे दर कोसळले! सोनं 2,000, तर चांदी 4,000 रुपये स्वस्त; कारण काय..?
13
Maruti CNG Cars: पेट्रोलच्या वाढत्या किमतींनी हैराण झालात? मारुतीच्या 'या' ५ सीएनजी कार वाचवतील तुमचे पैसे!
14
"कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही", पीयूष गोयल यांचे अमेरिकेला खडेबोल
15
IND vs AUS: कोहलीनं फॉर्म परत मिळवण्यासाठी काय करावं? मोहम्मद कैफचा मोलाचा सल्ला! म्हणाला...
16
दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! ३९१ कॉन्स्टेबल जीडी पदांची भरती निघाली
17
‘मोबाईल सर्व्हेलन्स’च्या मुद्द्यावरून बावनकुळेंची सारवासारव, व्हॉट्सअप ग्रुप्सबाबत बोलल्याचा दावा
18
१ लाख व्हॉट्सअप ग्रुप, भाजपाची 'वॉर रूम'; कशी चालते यंत्रणा? बावनकुळेंनी सगळेच सांगितले
19
डॉक्टर अवघड शस्त्रक्रिया करत होते. ती ऑपरेशन टेबलवर सनई वाजवत होती, व्हिडीओ व्हायरल
20
"मला न्याय हवाय, पती-मुलाला लोखंडी रॉडने मारहाण..."; भाजपा महिला नेत्याचा रस्त्यावर ठिय्या

आनंद तरंग - शांतीचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 02:53 IST

झोपेची गोळी आहे़, शांतीची नाही़ म्हणून जीवनाचं मोल कळावं

बा.भो. शास्त्रीशांती हेच जीवनमूल्य आहे़ विकारांचा विक्षेप विकल्पाचे हेलकावे थांबले की शांतीचा उदय होतो़ पण त्यात अहंकार हाच मोठा खोडा आहे़ तोच मनाला अस्थिर करतो, तेच तर अशांतीचं मूळ आहे़ संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,‘‘निश्चलत्वाची भावनाजरी नव्हैचि देखै मनातरी शांती केवी अर्जुनाआपु होये’’

झोपेची गोळी आहे़, शांतीची नाही़ म्हणून जीवनाचं मोल कळावं व आपणच आपल्या जन्मी व जगण्यावर प्रेम करावं़ हेच कवी मंगेश पाडगावकरांनी म्हटलं, ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.’ श्रीधर चक्रधरांनी मराठीच्या बीजातच हा सुंदर भाव ओतला आहे़ अहं वाईट नाही़ अहंत वाईट आहे़ तिचा परिवार मोठा आहे़ उपद्रवी आहे़ तृष्णा ही तिची लाडकी मुलगी आहे़ तीच जीवघेणी धावपळ करायला लावते़ व्यथित झालेला माणूस अशांत होतो़ अशांतीत मानसिक दु:ख व वेदना होतात़ अस्वस्थता वाढते़ मिळालेलं सुख भोगता येत नाही़ चित्त अस्थिर होतं़ मन दुबळं होतं, बुद्धीची क्षमता कमी होत जाते़ आत्मग्लानी येते़ जीवनातील उत्साह निघून जातो. राग आला की, भांडं आदळत, भांडण, चिडचिड कटकटी होतात़ अनेक समस्या निर्माण होतात़ आपण समस्येच्या मुळाशी न जाता भरकटतो़ शेवटी सुंदर जीवन अविवेकाने नष्ट करतो़ शांती केवळ क्रांती, शक्तीने, पैशाने मिळते ही आपली भ्रांती आहे़ पण हे सगळे प्रयोग फसले, असं इतिहास आपल्याला सांगतो़ परशुरामाने एकवीस वेळा युद्धात क्षत्रिय मारले़ कुठे शांती स्थापित झाली? बुद्धाने युद्धाशिवाय शांतीचा संदेश दिला़ प्रीती व भक्तीच्या शेतात शांती अंकुरित होते़ पण अहंतेला मुळातून उखडून फेकावे लागते.

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रAdhyatmikआध्यात्मिक