शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग: मोक्षाचा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 05:34 IST

अज्ञानात चाचपडणारे त्या काळातले तीन वर्ण व स्त्रिया यांचा श्वास सूत्राने मोकळा केला. मोक्षाचा मार्ग प्रशस्त झाला. स्वत:च्या पंखांनी आभाळात झेप घ्यायचं बळ दिलं.

बा. भो. शास्त्री

श्रीकृष्णाने नरकासुराच्या कारागृहाचं भव्य कुलूप तोडून सर्व राजे आणि स्त्रियांना बंधमुक्त केलं. कारागृह मोठं होतं. दरवाजा पण अवजड होता. कुलूपही मोठं वा मजबूत होतं. पण ते लहान किल्लीने उघडतं. कुलूप व किल्लीच्या वजनात फार तफावत असते. हातोडी कुलुपाला तोडू शकते, पण कुलूप उघडत नाही. पण लहान आकाराची किल्ली कुलुपाला लीलया लागते आणि सहज उघडतेसुद्धा. असंच असतं सूत्र. दिव्याची लहान ज्योत खोलीभर अंधार नाहीसा करते.

अज्ञानात चाचपडणारे त्या काळातले तीन वर्ण व स्त्रिया यांचा श्वास सूत्राने मोकळा केला. मोक्षाचा मार्ग प्रशस्त झाला. स्वत:च्या पंखांनी आभाळात झेप घ्यायचं बळ दिलं. आपली जात खोटी, वर्ण खोटा. आपण सर्वच जीव आहोत, हे कळलं. भेदाभेदाच्या भिंती पडल्या. सूत्र आपलीच उंची आपल्याला सांगून गेलं. जीवा, तू लहान आणि शूद्र नाही. तू देवाचा अनमित्त बंधू आहेस. तू पापात्म. तूच पुण्यात्मा. तूच डाकू आणि तूच संत. तुला नरक होऊ शकतो. पण तुलाच मोक्षही मिळू शकतो. सगळेच गुणधर्म सगळ्यात आहेत. कुणी लहान कुणी मोठा नाही. ज्ञान ही कुणाची मक्तेदारी नाही. जीवाचं जीवन खरंच पाण्यासारखं आहे. ते उसात गेलं की गोड होतं. मिरचीला दिलं तर तिखट. कारल्याच्या वाफ्यात गेलं तर कडू होतं. त्याला स्वत:चा रंग नाही. ज्यात गेलं तसा त्याचा रंग होतो. असाच आहे हा जीव. त्याचं स्वरूप जसं मोठं तेवढंच सूक्ष्मही. सागरातलं पाणी अथांग दिसतं. डोळ्यातलं दिसत नाही. जमिनीतून नारळाकडे जाणाऱ्या पाण्याला पाइपलाइन नाही. मोटरपंप बसवला नाही. पाणी दिसत नाही. प्रत्येक नारळात शुद्ध आणि मधुर पाणी येतं कुठून? खोबºयाचं तेल होतं. लाडू होतात. बर्फी होते. कच्चं खाता येतं. भाजीत टाका. तसाच हा जीव आहे. अनुकूल आणि प्रतिकूल वेदनेचं दु:ख सर्वांना सारखंच असतं. देहाची बनावट ज्ञान आणि कर्मेंद्रिंये सर्वांचं सारखंच.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक