शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

आनंद तरंग अंतरनिष्ठ तितुके तरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 03:28 IST

मुलांची वडिलांवर असलेली निष्ठा कमी झाली की घरात कलह सुरू होतो. भावाभावातलं प्रेम, निष्ठा कमी झाली की कोर्ट कचेऱ्या सुरू होतात.

स.भ. मोहनबुवा रामदासीआपल्या अंतरंगात असलेल्या परमेश्वरावर, अगाध निष्ठा असावी. निष्ठा हा प्रतिष्ठेचा विषय होऊ नये, निष्ठा नसेल तर कुठलाच व्यवहार चालत नाही. मुलांची वडिलांवर असलेली निष्ठा कमी झाली की घरात कलह सुरू होतो. भावाभावातलं प्रेम, निष्ठा कमी झाली की कोर्ट कचेऱ्या सुरू होतात. बेबनाव वाढतच जातो. खटके कायम वाढत जातात. याच्या मुळाशी पैसा, संपत्ती आणि गर्व हीच प्रमुख कारणे असतात. हा व्यावहारिक अंतरनिष्ठेचा फक्त एक प्रकार झाला. असे अनेक प्रकार सांगता येतील, पण माझ्या दृष्टांताला कुणाची दृष्ट लागू नये म्हणून मी व्यवहारातले दाखले थोडे कमी देत असतो. वरील वचनातून समर्थांना अंतरनिष्ठेबद्दल सांगायचे आहे. समर्थ म्हणतात, मूर्तिपूजेवर तुम्ही निष्ठा ठेवाल, पण चालत्या-बोलत्या माणसातला खरा आत्मरूपी (आत्माराम) ओळखण्यासाठी सगळे उपचार असतात. त्या आत्मारामावर निष्ठा, भाव, प्रेम, भक्ती असेल तरच साधक तरू शकेल. नाही तर बाह्याकारे भरंगळले लोकाचारे अशी अवस्था होईल. लोकाचार एकदा अंगात संचारला म्हणजे माणूस कावराबावरा होतो. लोकेशनासुद्धा मर्यादित असावी, अंतरंगात साधक जसजसा डोकवायला लागेल तसतसा त्याचा लोकाचार कमी होतो. समर्थांची लोकप्रियता खूपच होती, त्याचे यथोचित वर्णन केलेले आहे.लोकांस पायाचा आदर। तेथे याचा अनादर। लोकांना समर्थांना केव्हा एकदा पाहीन असे व्हायचे, पण समर्थ त्याबाबत उदासीन असायचे, म्हणून त्यावर एक युक्ती करायचे ती अशी,जातो स्थळ ते सांगेना। सांगितले तेथे जाईना। आपुले स्थिती अनुमाना। येवोच वेदी।खनाळा मध्ये जाऊन राहे। तेथे सर्वत्रांची चिंता वाहे।हे त्यांचे चरित्र वर्णन केलेले आहे. म्हणून परमार्थामध्ये अंतरनिष्ठेला अत्यंत महत्त्व आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक