शहरं
Join us  
Trending Stories
1
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
3
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
4
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
5
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
6
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
7
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
8
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
9
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
10
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
11
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
12
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
13
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
14
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
15
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
16
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
17
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
18
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
19
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
20
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?

आनंद तरंग अंतरनिष्ठ तितुके तरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 03:28 IST

मुलांची वडिलांवर असलेली निष्ठा कमी झाली की घरात कलह सुरू होतो. भावाभावातलं प्रेम, निष्ठा कमी झाली की कोर्ट कचेऱ्या सुरू होतात.

स.भ. मोहनबुवा रामदासीआपल्या अंतरंगात असलेल्या परमेश्वरावर, अगाध निष्ठा असावी. निष्ठा हा प्रतिष्ठेचा विषय होऊ नये, निष्ठा नसेल तर कुठलाच व्यवहार चालत नाही. मुलांची वडिलांवर असलेली निष्ठा कमी झाली की घरात कलह सुरू होतो. भावाभावातलं प्रेम, निष्ठा कमी झाली की कोर्ट कचेऱ्या सुरू होतात. बेबनाव वाढतच जातो. खटके कायम वाढत जातात. याच्या मुळाशी पैसा, संपत्ती आणि गर्व हीच प्रमुख कारणे असतात. हा व्यावहारिक अंतरनिष्ठेचा फक्त एक प्रकार झाला. असे अनेक प्रकार सांगता येतील, पण माझ्या दृष्टांताला कुणाची दृष्ट लागू नये म्हणून मी व्यवहारातले दाखले थोडे कमी देत असतो. वरील वचनातून समर्थांना अंतरनिष्ठेबद्दल सांगायचे आहे. समर्थ म्हणतात, मूर्तिपूजेवर तुम्ही निष्ठा ठेवाल, पण चालत्या-बोलत्या माणसातला खरा आत्मरूपी (आत्माराम) ओळखण्यासाठी सगळे उपचार असतात. त्या आत्मारामावर निष्ठा, भाव, प्रेम, भक्ती असेल तरच साधक तरू शकेल. नाही तर बाह्याकारे भरंगळले लोकाचारे अशी अवस्था होईल. लोकाचार एकदा अंगात संचारला म्हणजे माणूस कावराबावरा होतो. लोकेशनासुद्धा मर्यादित असावी, अंतरंगात साधक जसजसा डोकवायला लागेल तसतसा त्याचा लोकाचार कमी होतो. समर्थांची लोकप्रियता खूपच होती, त्याचे यथोचित वर्णन केलेले आहे.लोकांस पायाचा आदर। तेथे याचा अनादर। लोकांना समर्थांना केव्हा एकदा पाहीन असे व्हायचे, पण समर्थ त्याबाबत उदासीन असायचे, म्हणून त्यावर एक युक्ती करायचे ती अशी,जातो स्थळ ते सांगेना। सांगितले तेथे जाईना। आपुले स्थिती अनुमाना। येवोच वेदी।खनाळा मध्ये जाऊन राहे। तेथे सर्वत्रांची चिंता वाहे।हे त्यांचे चरित्र वर्णन केलेले आहे. म्हणून परमार्थामध्ये अंतरनिष्ठेला अत्यंत महत्त्व आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक