शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

आनंद तरंग: आनंदाचे देणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 02:34 IST

आपण नकारात्मक विचारांना खतपाणी घातलं, तर ते मजबूत होतील. नकारात्मक गुण उदा. अहंकार आणि राग मनात घर करतील. ते अपयशाला आमंत्रण देतील.

माता अमृतानंदमयीएके दिवशी, एक माणूस आपल्या नातवाला प्राणिसंग्रहालयात घेऊन गेला. तिथे शेजार-शेजारच्या दोन पिंजऱ्यांत दोन सिंह होते. एक सिंह त्याच्या पिंजºयाजवळ कोणीही गेलं, तरी शांतपणे बसून होता. कुणी त्याला हात लावण्याचा प्रयत्न केला, तरी तो रागावत नव्हता. याचा अर्थ तो सिंह माणसाच्या अस्तित्वाला सरावला होता. दुसरा सिंह त्याच्या जवळ येण्याचा जरासा प्रयत्न जरी केला, तरी गर्जना करत होता. तो आपल्या पंज्यांनी मारायचा प्रयत्न करत होता. यामुळे लोक त्याच्यापासून लांब राहात होते. त्या माणसानं विचारलं, ‘मुला, जर या दोन्ही सिंहांनी एकमेकांशी लढाई केली, तर कोण जिंकेल?’ कितीही विचार केला, तरी नातवाला त्याचं उत्तर सापडेना. तेव्हा तो माणूस म्हणाला, ‘ज्या सिंहाला जास्त खायला घालण्यात आलं आहे, तो जिंकेल.’ आपल्या मनाचंही तसंच आहे. आपण नकारात्मक विचारांना खतपाणी घातलं, तर ते मजबूत होतील. नकारात्मक गुण उदा. अहंकार आणि राग मनात घर करतील. ते अपयशाला आमंत्रण देतील. नकारात्मक विचारांमध्ये गुंतणं हे हिंसा, अन्याय आणि आज आपल्याभोवती दिसत असलेल्या इतर समस्यांचं प्रमुख कारण आहे. जर आपण सकारात्मक विचारांना प्रोत्साहन दिलं, तर ते मनाच्या मुळांपर्यंतच जातील आणि प्रेम, कनवाळूपणा आणि सहनशीलता हे गुण आपल्यात येतील. समाजात शांतता आणि तृप्तीला बहर येईल. हे होण्यापूर्वी आपण अहंकार, निस्वार्थीपणा आणि आवडी- निवडीचे तण आपल्या मनाच्या बागेतून काढून टाकावे लागतील. आपण प्रत्येक विचाराचे मनापासून विश्लेषण करायला हवे आणि नकारात्मक विचार काढून टाकत त्या जागी सकारात्मक विचार पेरले पाहिजेत. कुणी रागावलं, तर आपण किती दु:खी होतो याचा विचार करा. तसंच आपणही इतर कुणाच्या दु:खाचं कारण होता कामा नये. कुणी आपल्यावर प्रेम केलं, तर आपण आनंदी होतो, त्याचप्रमाणे आपण इतरांनाही आनंद द्यायला हवा.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक