शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

आनंद तरंग: आनंदाचे देणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 02:34 IST

आपण नकारात्मक विचारांना खतपाणी घातलं, तर ते मजबूत होतील. नकारात्मक गुण उदा. अहंकार आणि राग मनात घर करतील. ते अपयशाला आमंत्रण देतील.

माता अमृतानंदमयीएके दिवशी, एक माणूस आपल्या नातवाला प्राणिसंग्रहालयात घेऊन गेला. तिथे शेजार-शेजारच्या दोन पिंजऱ्यांत दोन सिंह होते. एक सिंह त्याच्या पिंजºयाजवळ कोणीही गेलं, तरी शांतपणे बसून होता. कुणी त्याला हात लावण्याचा प्रयत्न केला, तरी तो रागावत नव्हता. याचा अर्थ तो सिंह माणसाच्या अस्तित्वाला सरावला होता. दुसरा सिंह त्याच्या जवळ येण्याचा जरासा प्रयत्न जरी केला, तरी गर्जना करत होता. तो आपल्या पंज्यांनी मारायचा प्रयत्न करत होता. यामुळे लोक त्याच्यापासून लांब राहात होते. त्या माणसानं विचारलं, ‘मुला, जर या दोन्ही सिंहांनी एकमेकांशी लढाई केली, तर कोण जिंकेल?’ कितीही विचार केला, तरी नातवाला त्याचं उत्तर सापडेना. तेव्हा तो माणूस म्हणाला, ‘ज्या सिंहाला जास्त खायला घालण्यात आलं आहे, तो जिंकेल.’ आपल्या मनाचंही तसंच आहे. आपण नकारात्मक विचारांना खतपाणी घातलं, तर ते मजबूत होतील. नकारात्मक गुण उदा. अहंकार आणि राग मनात घर करतील. ते अपयशाला आमंत्रण देतील. नकारात्मक विचारांमध्ये गुंतणं हे हिंसा, अन्याय आणि आज आपल्याभोवती दिसत असलेल्या इतर समस्यांचं प्रमुख कारण आहे. जर आपण सकारात्मक विचारांना प्रोत्साहन दिलं, तर ते मनाच्या मुळांपर्यंतच जातील आणि प्रेम, कनवाळूपणा आणि सहनशीलता हे गुण आपल्यात येतील. समाजात शांतता आणि तृप्तीला बहर येईल. हे होण्यापूर्वी आपण अहंकार, निस्वार्थीपणा आणि आवडी- निवडीचे तण आपल्या मनाच्या बागेतून काढून टाकावे लागतील. आपण प्रत्येक विचाराचे मनापासून विश्लेषण करायला हवे आणि नकारात्मक विचार काढून टाकत त्या जागी सकारात्मक विचार पेरले पाहिजेत. कुणी रागावलं, तर आपण किती दु:खी होतो याचा विचार करा. तसंच आपणही इतर कुणाच्या दु:खाचं कारण होता कामा नये. कुणी आपल्यावर प्रेम केलं, तर आपण आनंदी होतो, त्याचप्रमाणे आपण इतरांनाही आनंद द्यायला हवा.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक