शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग : पाचवी कला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 03:25 IST

परिवाराला सुखी आणि काळजीमुक्त ठेवण्यासाठी पक्के नियोजन खूप महत्त्वाचे ठरते,

विजयराज बोधनकरनियोजनाने मोठमोठे चमत्कार घडले आहेत. नियोजनामुळे अनेक सामान्य माणसे आकाशाइतकी मोठी झाली आहेत. गोष्ट कुठलीही असो पक्के नियोजन असेल तर उत्तम यश पदरी पडते. मग नियोजन म्हणजे काय हे समजून घेणे गरजेचे आहे. नियोजनासाठी पूर्णपणे बुद्धीचा वापर करावा लागतो, बारीकसारीक गोष्टींचा विचार करूनच मांडणी करावी लागते. घरात लग्न असो, नव्या व्यवसायाची सुरुवात करायची असो, दूर कुठे तरी प्रवासाला जायचे असो, गावात उत्सव असो, सरकारी योजना असो, शैक्षणिक योजना असो, असे अनेक विषय असो, यात नेमके धोके कुठे आहेत, नेमकी कुठली बाजू महत्त्वाची आहे, याला येणारा खर्च किती, मनुष्यबळाची काय तयारी करावी लागणार, नियमांची उजळणी किती करावी लागणार, आर्थिक पाठबळ कसे उभे करता येईल, दिनक्रमात वेळेचा सदुपयोग कसा करून घेता येईल, अशा अनेक गोष्टींचे चिंतन मनन करून त्याची डायरीत नोंद करून त्यावर अंमलबजावणी करणे म्हणजे नियोजन होय.

परिवाराला सुखी आणि काळजीमुक्त ठेवण्यासाठी पक्के नियोजन खूप महत्त्वाचे ठरते, ही एक मोठी कला आहे. मोठमोठी मॅनेजमेंटची कॉलेजे याचे शिक्षण देतात, व्यक्तिमत्त्व विकासासाठी नियोजनाची कला खूप यश पदरात पाडून जाते, घरापासून ते देशाच्या कारभारापर्यंत नियोजनासाठी प्रत्येक व्यक्तीने काळजी घेतली पाहिजे, दिवसभराचे, आठवड्याचे, महिनाभराचे आणि वर्षभराचे नियोजन करणारी व्यक्ती कधीही सैरभर न होता ठरविल्या मार्गाने आपल्या स्वप्नांचा प्रवास करीत राहते आणि अपयशापासून स्वत:ला वाचवत असते. आध्यात्मिक मार्ग आणि नियोजनाचा मार्ग एकचआहे. ज्यामुळे बुद्धी स्थिर राहते आणि मन सकारात्मक विचार करण्यास सतत प्रवृत्त होत राहते. म्हणूनच नियोजनाला पाचवी कला आणि महत्त्वाची कला समजावी.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक