शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

आनंद तरंग - तुमच्या ‘स्व’चा अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 05:31 IST

दुर्दैवाने लोक आपल्या मर्यादा जणू मौल्यवान ठेवा म्हणून जपतात. तुम्ही तुमची बंधनं जणू तुमचा अलंकार म्हणून मिरवतात.

सद्गुरू जग्गी वासुदेवदुर्दैवाने लोक आपल्या मर्यादा जणू मौल्यवान ठेवा म्हणून जपतात. तुम्ही तुमची बंधनं जणू तुमचा अलंकार म्हणून मिरवतात. जर एखादी गोष्ट आभूषण म्हणून तुम्ही अनुभवायला लागलात की, मग ते तुमच्यापासून दूर करणं फार कठीण होऊन जातं, पण जर तुम्ही त्यांना वस्तुत: बेड्या, बंधनं आहेत असं पाहिलं, तर तुम्हालाच त्या मोडून टाकण्याची इच्छा जागृत होईल. समजा जर मी तुम्हाला लोखंडी साखळ्यांनी बांधलं तर तुम्हाला लगेच कळेल की, तुम्ही बंधनात आहात आणि ज्या क्षणी तुम्हाला कळेल की, तुम्ही बेड्यांत अडकला आहात; त्याच क्षणी त्यातून मुक्त होण्याची तळमळ निर्माण होईल. मात्र, समजा मी तुम्हाला सोन्याच्या साखळीने बांधलं, तर तुम्हाला वाटेल की, हा तर दागिना आहे. दोन्ही साखळ्या तुम्हाला तितक्याच ताकदीने बांधून ठेवतात, पण हे लक्षात येण्यासाठी तुम्ही संपूर्ण आयुष्य घालवता. अलंकार, आभूषण म्हणून जे काही तुम्ही परिधान करता, त्या तुम्हाला जखडून ठेवणाऱ्या असल्या, तरीही तुम्हाला स्वत:हून त्या दूर करणं शक्य नाही. तुम्ही त्या दूर करू शकत नाही असं नाही, तुम्ही करू शकता, पण सहसा तुम्ही ते करत नाही. दुसºयाने तुम्हाला मदत करावी लागते आणि तोच तुमचा गुरू आहे.

गुरू हा काही कुणी तुमचे सांत्वन करणारा नाहीये. स्वखुशीने तुम्ही तुमच्या ‘स्व’चा अंत करण्यासाठी जो तुमचे मार्गदर्शन करतो तो गुरू. तुमचे व्यक्तिमत्त्व आणि तुमचे मर्यादित अस्तित्व सतत पायदळी तुडवतो तो गुरू. त्यांच्या सानिध्यात नेहमी तुम्हाला अवघडल्यासारखं वाटतं, पण तरीही तुम्हाला त्यांच्या सहवासात राहावेसे वाटते, असं असेल, तर ते तुमचे गुरू आहेत. सामान्यत: जेव्हा तुम्हाला अस्वस्थ, अवघडल्यासारखे वाटते, तेव्हा तिथून पळून जावेसे वाटते. तुमच्या गुरूंच्या उपस्थितीत तुम्हाला अस्वस्थ वाटतं, पण तरीही तुम्हाला त्यांच्यासोबत राहावंस वाटतं.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक