शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आनंद तरंग - संवेदनशील व्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 01:53 IST

माझ्यातच आहेत,’ तेव्हा जे असभ्य आहे, ते बदलायला सुरुवात होईल. तुम्हाला परिवर्तन घडवून आणावेच लागेल, तुम्ही ते टाळूच शकणार नाही.

सद्गुरू जग्गी वासुदेवआज जगात अहंकाराचा नायनाट करण्याबद्दल खूपच अनावश्यक चर्चा सुरू आहे. लोकांनी हे शास्त्रांमधून उचलले आहे. जेव्हा तुमचे व्यक्तिमत्त्व असभ्य, अभद्र बनते, तेव्हा त्याला तुम्ही अहंकार म्हणता. दोष दुसऱ्यांवर ढकलायचा, हा आणखी एक मार्ग आहे. जेव्हा तुमचे व्यक्तिमत्त्व अभद्र होते, तेव्हा तुम्ही त्याकडे हा ‘मी’ असंच पाहिलं पाहिजे. जेव्हा तुम्ही त्याकडे ‘मी अभद्र, असभ्य झालो’ असे पाहाल, तेव्हा तुम्हाला त्याविषयी काहीतरी करावेसे वाटेल. जसे आहात, तसेच असणे तुम्हाला आवडणार होणार नाही, पण हे टाळण्यासाठी आपण कित्येक युक्त्या लढवत असतो. या क्षणी तुम्ही सभ्य असाल किंवा अभद्र असलात, तरी आहात ते तुम्हीच, हो की नाही? तसंच ध्यानात असू द्या. ज्या गोष्टी अस्तित्वातच नाहीत, त्या निर्माण करू नका. तुमचा अहंकार, तुमचा आत्मा किंवा आणखी काही. ज्या क्षणी तुम्ही, ‘जे छान आहे तो माझा आत्मा, आणि जे असभ्य आहे, तो माझा अहंकार,’ यासारख्या गोष्टी निर्माण करता, तेव्हा परिवर्तन घडवून आणणे अशक्य होते. जेव्हा तुमच्या असे लक्षात येते की, ‘मी जो कोणी आहे, सभ्य किंवा अभद्र, या दोन्हीमाझ्यातच आहेत,’ तेव्हा जे असभ्य आहे, ते बदलायला सुरुवात होईल. तुम्हाला परिवर्तन घडवून आणावेच लागेल, तुम्ही ते टाळूच शकणार नाही. आज जगामध्ये, आपल्याला एक साधी जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. जीवनाप्रती जागरूकता. आज लोकांमध्ये फक्त अहंकाराची जाणीव आहे, जीवनाची जाणीवच नाही. ते अहंकाराविषयी संवेदनशील आहेत, जीवनाविषयी संवेदनशील नाहीत. जेव्हा तुम्ही अहंकाराविषयी संवेदनशील असता, तेव्हा जीवन म्हणजे केवळ तुम्ही, इतर काहीही जीवन नाही, या दृष्टिकोनातून स्वत:कडे पाहत असता. सर्वांना तुम्ही पायदळी तुडवू शकता. तुम्ही जर जीवनाविषयी संवेदनशील झालात, तर अहंकार ही समस्याच उरणार नाही.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक