शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
3
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
4
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
5
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
6
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
7
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
8
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
9
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
10
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
11
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
12
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
13
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
14
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
15
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
16
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
17
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
18
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
19
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
20
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार

आनंदाचा स्रोत सहकार्य नि सहजीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 19:19 IST

जपान हा देश सा-या जगात आगळा वेगळा समजला जातो. याला अर्थातच अनेक कारणं आहेत.

- रमेश सप्रे

जपान हा देश सा-या जगात आगळा वेगळा समजला जातो. याला अर्थातच अनेक कारणं आहेत. राजेशाही जरी नसली तरी आपला राजा हा सूर्यवंशाचा प्रतिनिधी आहे ही त्यांची ठाम समजूत. नव्हे, राजाला देवासारखा मान दिला जातो. पूर्वीच्या पारंपरिक जपानमध्ये प्रत्येक घरात एक छोटीशी खोली असायची. आपल्या देवघरासारखी. तिच्यात सारी साधनसामग्री अतिशय कलात्मक रितीनं मांडलेली असायची. छोटासा पलंग, वारं घेण्यासाठी नक्षीदार पंखा, पाणी पिण्यासाठी भांडी, विश्रंती घेताना घालावयाचे खास कपडे, मुख्य म्हणजे सुंदर अंतर्गत सजावट, त्या खोलीला ‘लोकोनामा’ म्हणत. प्रत्येकाची श्रद्धा असायची, विशेष म्हणजे अतिशय आधुनिक अशा यंत्रमानवीकरण (रोबोटायझेशन) झालेल्या आजच्या काळातही अनेकांची अशी श्रद्धा असते की सध्याचा राजा प्रत्येकाच्या घरात विश्रांती घेण्यासाठी येतो. ही फक्त भावना असेलही पण ती व्यक्त करताना अतिशय कलाकुसर कौशल्याचा उपयोग केला जातो. 

जपानला त्या देशातील लोक ‘निप्पन’ असं म्हणतात. उगवत्या सूर्याचा देश म्हणून त्याचं वर्णन केलं जातं. म्हणून त्याचा ध्वजही उगवत्या सूर्याचं दर्शन घडवणाराच आहे. आणखी बरंच काही लिहिता येईल जपान नि जपानी लोकांबद्दल. ब-याच वर्षापूर्वी आर्थर कोएस्लर नावाच्या लेखकानं एक अप्रतिम पुस्तक लिहिलं होतं. जपान आणि भारत या दोन देशांचा अनेक दिवस दौरा, निरीक्षण नि अभ्यास करून त्यानं लिहिलेल्या पुस्तकाचं नाव अतिशय अर्थपूर्ण आहे. ‘द लोटस अँड द रोबो’, ‘कमळ आणि यंत्रमानव (रोबो)’ ही दोन प्रतीकं आहेत ज्याला आपण संस्कृती (कल्चर) आणि सुधारणा (सिव्हिलायझेशन) म्हणतो त्या संस्कृतीचं प्रतीक आहे. ‘कमळ’ आणि तंत्रज्ञानानं घडवून आणलेली क्रांतिकारी सुधारणा तिचं प्रतीक ‘रोबो’. 

त्या वेळी जपाननं (कमळ) संस्कृती चांगली जपली होती आणि तंत्रज्ञानात विशेषत: इलेक्ट्रॉनिक्समध्ये तर जपानने खूप प्रगती केली होती. म्हणजे ‘रोबो’- यंत्रमानव -ही मिळवण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू केली होती. भारत मात्र आपली संस्कृती झपाटय़ानं गमावत होता आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पिछाडीला होता. असो. 

आज जपानची स्थिती आर्थिक विकासाच्या दृष्टीनं चांगलीच आहे; पण अमेरिकेनं दुस-या महायुद्धात हिरोशिमा-नागासाकीवर टाकलेले अणुबॉम्ब अन् घडवलेला विध्वंस, त्या राखेतून फिनिक्स पक्षासारखा जपान पुन्हा उंच उडू लागला; पण नैसर्गिक आपत्ती मात्र त्याची पाठ अजून सोडत नाहीत. ज्वालामुखी, भूकंप, त्सुनामीसारखी राक्षसी सागरलाटा या सारख्या आपत्ती जपानवर अनेकदा कोसळत असतात. तरीही या सा-या प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत जपानी लोक अत्यंत आनंदात असतात. काय आहे या आनंदाचं रहस्य? कठोर परिश्रम, शिस्त, वक्तशीरपणा, वेळेची किंमत जाणून सतत कार्यरत राहणं हे तर त्यांच्या आनंदाचं रहस्य आहेच; पण त्यांनी आणखी एक मूल्य आपल्या जीवनशैलीचा भाग बनवलंय. ते म्हणजे परस्पर सहकार्य. सहयोगाचं तत्त्व हे जपानी लोकांच्या आनंदाचा स्नेत आहे. उगम आहे. 

स्पर्धेपेक्षा सहकार्यानं राष्ट्र समर्थपणे उभं करता येतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे जपान. या तत्त्वाचं दर्शन घडवणारी एक अद्भूत घटना जपानमध्ये घडली आणि समाज माध्यमातून ती सा-या जगानं अनुभवली. त्याचं असं झालं. वारंवार होणा-या भूकंपापासून जीवितहानी होऊ नये म्हणून जपानमध्ये अनेक घरं लाकडाची असतात. त्याची दुरुस्ती सगळेजण ब-याच वेळा स्वत: करतात. असाच एक जपानी माणूस स्वत:च्या घराचं छप्पर दुरुस्त करत होता. त्यानं एक फळी काढली नि काय आश्चर्य! 

फळीमागे जी फट होती त्यात एक जिवंत पाल होती जिच्या पायातून गेल्या दुरुस्तीच्यावेळी म्हणजे दोन तीन वर्षापूर्वी एक खिळा मारला गेला होता. ज्या वेळी त्या फळीला खिळे ठोकले जात होते त्या वेळी नेमकी ती पाल मध्ये आल्यानं खिळा तिच्या एका पायातून लाकडात ठोकला गेला होता. त्या माणसाला जागेवरून बिल्कुल हलू न शकलेली पाल इतके दिवस जिवंत कशी याचं आश्चर्य वाटत असतानाच त्याला एक विलक्षण दृश्य दिसलं. दोन तीन पाली निरनिराळ्या बाजूंनी आल्या नि तोंडात असलेलं भक्ष्य (किडे) तिला भरवायला सुरुवात केली. ती पाल का व कशी जिवंत राहिली याचं कोडं उकललं होतं. 

सा-या पाली मजेत इकडे तिकडे फिरून त्या पालीसाठी खाद्य आणत होत्या. यातली सहकार्याची सहसंवेदनेची, सहानुभूतीची भावना थक्क करणारी होती. साध्या कीटक प्राणी या सारख्यांना हे कळतं नि वळतं सुद्धा तर आपण माणसांनी अशी एकरूपतेची समरसतेची भावना इतरांबद्दल जोपासली तर जीवनात दु:ख उरणारच नाही. भावपूर्ण, निरपेक्ष, नि:स्वार्थी सहजीवन हे आनंदाचं जिवंत रहस्य आहे. व्यक्तीच्या तसेच सा:या समाजाच्या आनंदासाठी असा सहयोग आवश्यक आहे. एक प्रकारचा सहयज्ञच आहे हा!

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक