शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

जो जे वांछील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 06:40 IST

आपल्या मातृवत्सल हृदयाने साऱ्या विश्वाच्या डोक्यावर प्रेमाचा पदर पांघरणारी संत ज्ञानेश्वर माउली जेव्हा वैश्विक दु:खावर सांत्वनाची फुंकर घालण्यासाठी ‘जो ...

आपल्या मातृवत्सल हृदयाने साऱ्या विश्वाच्या डोक्यावर प्रेमाचा पदर पांघरणारी संत ज्ञानेश्वर माउली जेव्हा वैश्विक दु:खावर सांत्वनाची फुंकर घालण्यासाठी ‘जो जे वांछील तो ते लाहों प्राणीजात’ अशी विश्वप्रार्थना विश्वात्मक परमेश्वराकडे करतात तेव्हा माउली शास्त्र, वेद, उपनिषदे यांच्याही पुढे चार पावले गेले आहेत असे वाटते. सर्वेऽपि सुखिन: संतु। सर्वे संतु निरामय! ही प्रार्थना आपण सगळेच करीत आलो आहोत, पण भल्या, बुऱ्यांच्या सगळ्याच मानवजातीच्या इच्छा पूर्ण होवोत अशी शुभंकर इच्छा व्यक्त करण्यासाठी स्वत:च्या इच्छा- अपेक्षांचा ‘वै’ व्हावा लागतो तेव्हाच दुसºयाच्या इच्छा पूर्ण होवोत, असे मागणे मागता येते. स्वत:चे श्वास जेव्हा सुकुमार होतात आणि मुख सुखात्म्याचे माहेर होते तेव्हा दुसºयाच्या कल्याणाची भावना मनात निर्माण होते. माउलीच्या या उदात्त भावात्मकतेवर कळस चढविताना तुकोबाराय म्हणाले होते...जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जों आपुले।तोचि साधु ओळखावा, देव तेथेचि जाणावा।मृदु सबाह्य नवनीत, तैसे सज्जनाचे चित्त।ज्यासी अपंगीता नाही, त्यासी धरी जों ऽहृदयी।दया करणे जें पुत्रासी, तेचि दासा अन् दासी।तुका म्हणे सांगो किती, त्याचि भगवंताची मूर्ती।दुसºयाच्या कल्याणासाठी जो भूतलावर जन्माला येतो त्याच्या मनातील आशा-निराशेची अवस्था भर्जीत बियाप्रमाणे झालेली असते. दुसºयाच्या सुखाने सुखी व्हावे आणि सर्वांना सुख देऊन झाल्यानंतरही जर भगवंत म्हणालाच, ‘अरे वत्सा! माग ना माझ्याकडे काहीतरी।’ तर त्याला भक्ताने उत्तर द्यावे, ‘सारी सुखे माझ्या पायाशी लोळण घेत आहेत, त्यामुळेच तर मी निर्भय आनंदात डोलत आहे.’ जर काही द्यायचे असेल तर ज्यांना गरज आहे त्यांना दे। एवढी मोठी सद्भावना प्रकट करण्यासाठी विधात्यानेच दुसºयाच्या कल्याणार्थ जन्माला आलेल्या सद्भक्ताची मूस तयार करावी लागते. खरे तर तुमच्या-माझ्यासारख्या सामान्यांना संसार सागराच्या पैलतीरापर्यंत नेऊन पोहोचविण्यासाठीच संताचे येणे होते. जे काही करावे, जे काही मागावे ते इतरांसाठीच असे त्यांचे जीवन जगण्याचे एकच तत्त्व असते. प्रामाणिकपणाने आणि ध्यासाने ते तत्त्व पाळत असतात. दिव्याने जसे दुसºयासाठी जळत राहावे आणि दुसºयाला प्रकाश द्यावा. मोबदल्यात मात्र स्वत:साठी काहीच मागू नये, तसे असते संताचे त्यागशील ‘जिणे’. ज्ञानी भक्ताने संतांचे हे जिणे समजून घ्यायचे आणि स्वत:ही तसे गुण आत्मसात करायचा प्रयत्न करायचे. असे झाले तर सारे काही सार्थकी लागेल. त्यासाठी संतांचे जीवन समजून घ्यावे. जर जो-जो जशी-जशी शुभंकर इच्छा व्यक्त करीत ती-ती त्याच्या कर्म अधिष्ठानाने पूर्ण झाली तर हा लहान-तो मोठा, हा गरीब-तो श्रीमंत, हा शोषक-तो शोषित हे भेदभावच राहणार नाहीत आणि हे समतेचे स्वप्न जेव्हा या संसारात प्रत्यक्षात येईल तेव्हाच आपल्या सुखी माणसांनी निर्माण केलेले वाळवंट नष्ट होऊन सर्व सुखी समाजाची संकल्पना साकार होईल. मात्र, तोपर्यंत ज्ञानोबा माउली म्हणतच राहतील।किंबहुना सर्व सुखी। पूर्ण होवोनि तिन्ही लोकी।भजीजों आदि पुरुखी। अखंडित।- प्रा. शिवाजीराव भुकेले