शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरीचा खंडेराया अवतरला खामगाव नगरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 15:23 IST

गेल्या बत्तीस वषार्पासून ‘खंडोबारायाचा  भव्य नंगर सोहळा’ अतिशय धूमधडाक्याने साजरा केल्या जातो .

खामगाव : ‘श्रद्धावान लभते ज्ञानम्, संशयात्मा विनश्यति’ असे भगवदगीतेत भगवंताने अजुर्ना  ला सांगितले आहे . अर्थात जी व्यक्ती श्रद्धावान आहे तिलाच ज्ञानाची प्राप्ती होते आणि जे संशय करतात त्यांचा विनाश होतो. श्रद्धेला मोल नाही अशी आपली संस्कृती सांगते , तर आदि शंकराचार्य यांनी त्यांच्या विवेकचूडामणी या ग्रंथात तीन गोष्टींना अत्यंत दुर्लभ मानले आहे.त्या म्हणजे मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम आणि सत्संगत्वम . अर्थात मनुष्याचा देह प्राप्त होणे दुर्मिळ आहे आणि मनुष्याला मोक्षप्राप्तीची इच्छा होणे त्याहून दुर्मिळ आहे.त्याहूनही अति दुर्मिळ काय असेल तर ते म्हणजे  सत्संगाची प्राप्ती होय. हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे या मार्गशीर्ष महिन्यात धार्मिक सणांची खूप रेलचेल असते. या महिन्यात गीता जयंती, वैकुंठ एकादशी ,दत्त जयंती. गुरुचरित्र सप्ताह इत्यादी सण येतात .याच महिन्यात कुरुक्षेत्रावर कृष्णाने अर्जुनाला गीतोपदेश दिला. हा गीतोपदेश केवळ अजुर्नासाठी नाही तर संपूर्ण मानवी कल्याणासाठी आहे. याच महिन्यात जेजुरीला खंडोबारायाचा  महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. खंडोबाची मल्हारी मार्तंड म्हणूनही कर्नाटक आणि महाराष्ट्रात ओळख आहे. खंडोबारायाचा हा महोत्सव कर्नाटक आणि महाराष्ट्रात अतिशय मोठ्या थाटात साजरा केल्या जातो. याच महोत्सवाचा एक भाग म्हणजे चंपाषष्टी  महोत्सवही साजरा होतो. चंपाषष्टीच्या सहा दिवस चालणाºया महोत्सवात सहभागी झाल्याने भक्तांना सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते.  वैभव आणि सुख शांती मिळते. सर्व पापांचा नाश होतो अशी भक्तांची अपार श्रद्धा आहे. या दिवसात देवासमोर अखंड दीपज्योत तेवत ठेवतात.चंपाषष्टीची कथा अशी आहे की, मणी आणि मल्ल या दोन राक्षस बंधूंनी ऋषिमुनींचच नव्हे तर देवांचे आणि सर्वसामान्यांचे जगणे कठीण केले होते .  देवगणांनी भगवानशंकराला प्रार्थना केली. या दोन राक्षसांच्या तावडीतून आपली सुटका करा अशी विनवणी केली तेव्हा भगवान शंकरांनी खंडोबाचा अवतार धारण केला. खंडोबाचे शरीर हळदीने माखलेले होते. भगवान शंकर आणि या राक्षस बंधूंचे घनघोर युद्ध झाले .या युद्धात मणी हा राक्षस भगवान शंकराला शरण आला. त्याने आपला पांढरा शुभ्र घोडा भगवान शंकर यांना भेट दिला, मला तुमच्याच चरणी आश्रयास ठेवा अशी प्रार्थना केली. तेव्हा भगवान शंकराने त्याला आपल्या चरणी आश्रय दिला. आजही खंडोबाच्या मूर्तीच्या जवळ या मणीची मूर्ती ठेवली जाते. मात्र  मणीचा दुसरा भाऊ राक्षस मल्ल याने मात्र  हिंसेचा मार्ग पत्करला तेव्हा भगवान शंकरांनी त्याला यमसदनी पाठवले. अशी ही कथा आहे. विशेष हे की जेजुरीच्या खंडोबारायाच्या महोत्सवाची प्रतिकृती विदर्भात बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव नगरीत मोठ्या प्रमाणात साजरी केल्या जाते. खामगावच्या श्री शिव खंडोबा भक्त मंडळ आणि शिव खंडोबा महिला भजनी मंडळ यांच्या वतीने गेल्या बत्तीस वषार्पासून ‘खंडोबारायाचा  भव्य नंगर सोहळा’ अतिशय धूमधडाक्याने साजरा केल्या जातो . खामगावच्या शिवाजी वेस मध्ये खंडोबाचे फार प्राचीन मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिरात खंडोबारायाची घोड्यावर स्वार असलेली अति भव्य अशी पितळेची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. प्रसिद्ध मूर्तिकार जयंत विष्णुपंत विंचुरकर यांनी अहोरात्र परिश्रम करून ही २३१ किलो वजनाची आणि सात फूट  उंचीची अतिशय देखणी मूर्ती बनवली आहे. उल्लेखनीय म्हणजे या मूर्ती बनविण्याची मजुरी तीन-चार लाख रुपये झाली असती पण खंडोबाराया प्रती असलेल्या श्रद्धेच्या पोटी मूर्तिकार जयंत विंचुरकर यांनी पारिश्रमिक म्हणून एक रुपयासुद्धा घेतला नाही. मूर्ती तयार झाल्यानंतर मंडळाच्या   आनंद थानवी ,नाना देशमुख ,राजू कोल्हे, रवी भवरे ,रवी भावरे ,विजू उगले ,जयंत विंचुरकर ,सागर हेरोडे ,विष्णू पुरोहित , राजू कोल्हे , प्रकाश उखळकर, शिवा भाऊ मानेकर,  अमोल सराफ, संजय मुनोत  इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी  ही मूर्ती प्रत्यक्ष जेजुरी गडावर नेऊन तिथे खंडोबाचा अभिषेक करून खामगावला आणल्यानंतर तिची उदंड उत्साहात प्राणप्रतिष्ठा केली. विशेष हे की मंडळाच्यावतीने जो महाप्रसादचा अर्थात ‘प्रीती भोज’चा कार्यक्रम केला जातो. तो तर एक प्रकारची खामगाव  वासीयांसाठी पर्वणीच असते. जवळपास पंधरा ते वीस हजार लोकांच्या प्रीती भोजनाचा कार्यक्रम म्हणजे खंडोबा भक्तांच्या प्रीतीचे सामान्य माणसांना होणारे दर्शनच असते. मंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एक महिन्यापर्यंत अहोरात्र या उत्सवासाठी राबवतात. धर्म पंथ जात वंश अशा कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता समाजातील सर्व आबालवृद्ध स्त्री-पुरुष प्रचंड उत्साहात या खंडोबा महोत्सवात सहभागी होत असतात यामुळेच या महोत्सवातून एक प्रकारच्या सामाजिक जाणीवेचा, समाजाप्रती असलेल्या कर्तव्याचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचा बोध देणारा संदेश सर्व राज्यभर दिल्या जातो समाज व्यसनमुक्त व्हावा अशी प्रार्थना मंडळ खंडोबारायाच्या चरणी करत असते.देशात सत्य ,धर्म, शांतता, प्रेम, सद्भाव आणि मानवता नांदो   अशीही मंडळाची प्रार्थना असते .हा महोत्सव विदर्भात एक अतिशय महत्त्वाचा उत्सव समजल्या जातो. जेजुरीचा खंडेराया अवतरला खामगाव नगरी ऐसा घोष करीत भक्त मंडळी दररोज'ुखालील अर्चना - प्रार्थना  करीत असतात.सप्तऋषिस मनी मल्हारसुर गाजले भारी । म्हणुनी अष्टभैरव मार्तंड अवतार धरी ।।

बनाईच्या तपाने देव मल्हारी झाले प्रसन्न।खामगाव नगरी नगरी नंगर ठरला यावे वाघे जण।।

 भवसिंधु हा पार कराया कलियुगी साधन।

विसरू नको मानवा, मार्तंड चरणी लावी मन।।

- डॉ. गायत्री कालीदास थानवीशिवाजी वेस, खामगाव.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकkhamgaonखामगाव