शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

जैन धर्म विज्ञान आधारित, भक्तामर गाथांमध्ये मोठी शक्ती - विजय दर्डा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 05:23 IST

आंतरिक यात्रेत ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन, १२ मेपर्यंत उपक्रम चालणार

नागपूर : जैन धर्म पूर्णतः विज्ञानावर आधारित आहे. आचार्य मानतुंग यांनी पहिले तीर्थंकर भगवान आदिनाथ यांच्या स्तुतीत रचलेल्या भक्तामर गाथांमध्ये मोठी शक्ती आहे, असे प्रतिपादन सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष, लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी केले. सिद्धायतन संस्था, संगम फाऊंडेशन, आयव्हीएस हीलिंग सेंटर आणि जीतो लेडीज विंग, रायपूर यांच्या वतीने कोविडच्या दुसऱ्या घातक लाटेमध्ये भक्तामर हीलिंगद्वारे व आपली दिव्य शक्ती जागृत करून सकारात्मक ऊर्जेसोबत महामारीच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी आयोजित सात दिवसीय आंतरिक यात्रेच्या ऑनलाईन कार्यक्रमादरम्यान शनिवारी मुख्य अतिथी म्हणून दर्डा बोलत होते.

भक्तामरची सहावी गाथा बुद्धीच्या विकासात यशस्वी झाली आहे. कुठली गोष्ट हरविली असेल तर अकराव्या गाथेतून यश मिळते.  ४५ वी गाथा आजारांचा सामना करण्यात प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. काही लोकांनी कर्करोगासारख्या आजारातदेखील या गाथेचा प्रयोग केल्याची मला जाण आहे, मात्र त्या माध्यमातून चांगले-वाईट झाले आहे. याचे प्रमाण नाही. केवळ मान्यता आहे. त्यामुळेच तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने जी औषधे घेत असाल ती कायम ठेवा, ती बंद करू नका, असे प्रतिपादन दर्डा यांनी केले. यावेळी त्यांनी क्षमा, जगा आणि जगू द्या तसेच अपरिग्रहाच्या महतीवरदेखील प्रकाश टाकला.

सात दिवसीय आंतरिक यात्रा कार्यक्रमाच्या ऑनलाईन आयोजनाला ६ मे रोजी सुरुवात झाली. हा उपक्रम १२ मेपर्यंत चालेल. डॉ. मंजू जैन यांनी भक्तामर पाठ देशविदेशातील जैन व इतर धर्मीय बांधवांना विविध केंद्रांच्या माध्यमातून पोहोचविण्याचे कार्य केले आहे. नागपुरातदेखील मोठी प्रयोगशाळा बनते आहे. तेथे या सर्व गाथांच्या माध्यमातून प्रयोग होणार आहेत. या आयोजनात इंटरनॅशनल स्पिरिच्युअल हीलर डॉ. मंजू जैन आणि वेलनेस कोच-स्पिरिच्युअल हीलर सोनल जैन-जैसवाल या कोरोना महामारीदरम्यान भक्तामर हीलिंग आणि अंतर्गत शक्ती जागृत करण्यासंदर्भात उपाय सांगत आहेत.

कार्यक्रमात मधुस्मिताजी म. सा., प्रेरणाजी म. सा. यांच्यासमवेत सिद्धायतन संस्थेच्या मॅनेजिंग ट्रस्टी ललिता जैन सेठी (कोलकाता), संगम फाउंडेशनच्या संस्थापक नीरज सुराणा, आयव्हीएस हीलिंग सेंटरचे संचालक विनय जैन, जीतो लेडीज विंग, रायपूरच्या अध्यक्षा कुसुम श्रीश्रीमाल, विशाखापट्टणमचे उद्योगपती मनोज जैसवाल यांच्यासमवेत शेकडो समाजबांधव सहभागी झाले होते. सीए संतोष जैन (कोलकाता) यांनी मुख्य अतिथींचा परिचय करून दिला. मधुस्मिताजी म.सा. यांनी मंगलाचरण व प्रार्थना केली. कार्यक्रमाचे संचालन नीरज सुराणा यांनी केले.

चक्रांचे सांगितले महत्त्वसोनल जैन-जैसवाल यांनी कुंडलिनीतील मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा, सहास्रार या सात चक्रांबाबत माहिती दिली. जसजसे चक्र खुलत जातात, तसतसे आपले भाव शुद्ध होत जातात व आपल्याला आतून सुख-शांतीची अनुभूती होते, असे त्यांनी सांगितले. भगवंत सर्वांच्याच आत आहेत. त्यांना मिळविण्यासाठी मन स्वच्छ व भाव पवित्र आले पाहिजेत. जे मनात आहे तेच तोंडीदेखील असले पाहिजे, असे प्रतिपादन मनोज जैसवाल यांनी केले.

आत्म्याला जागृत करा भक्तामर स्तोत्राच्या एकेका श्लोकात अपार शक्ती आहे. यातून नकारात्मकता दूर होऊन आयुष्यात सकारात्मकता येते. या मंत्रामुळे लोकांचे आजार, सुख, बुद्धिमत्ता आणि समृद्धीसोबतच आयुष्याला पूर्ण तऱ्हेने यशस्वी बनविण्यासंदर्भात प्रभाव टाकतात. या मंत्रांच्या माध्यमातून आत्म्याला जागृत करता येते, असे मंजू जैन यांनी सांगितले. 

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डाspiritualअध्यात्मिक