शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
3
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
4
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
5
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
6
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
7
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
8
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
9
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
10
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
11
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
12
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
13
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
14
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
15
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
16
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
17
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
18
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
19
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
20
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू

जैन धर्म विज्ञान आधारित, भक्तामर गाथांमध्ये मोठी शक्ती - विजय दर्डा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 05:23 IST

आंतरिक यात्रेत ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन, १२ मेपर्यंत उपक्रम चालणार

नागपूर : जैन धर्म पूर्णतः विज्ञानावर आधारित आहे. आचार्य मानतुंग यांनी पहिले तीर्थंकर भगवान आदिनाथ यांच्या स्तुतीत रचलेल्या भक्तामर गाथांमध्ये मोठी शक्ती आहे, असे प्रतिपादन सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष, लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी केले. सिद्धायतन संस्था, संगम फाऊंडेशन, आयव्हीएस हीलिंग सेंटर आणि जीतो लेडीज विंग, रायपूर यांच्या वतीने कोविडच्या दुसऱ्या घातक लाटेमध्ये भक्तामर हीलिंगद्वारे व आपली दिव्य शक्ती जागृत करून सकारात्मक ऊर्जेसोबत महामारीच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी आयोजित सात दिवसीय आंतरिक यात्रेच्या ऑनलाईन कार्यक्रमादरम्यान शनिवारी मुख्य अतिथी म्हणून दर्डा बोलत होते.

भक्तामरची सहावी गाथा बुद्धीच्या विकासात यशस्वी झाली आहे. कुठली गोष्ट हरविली असेल तर अकराव्या गाथेतून यश मिळते.  ४५ वी गाथा आजारांचा सामना करण्यात प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. काही लोकांनी कर्करोगासारख्या आजारातदेखील या गाथेचा प्रयोग केल्याची मला जाण आहे, मात्र त्या माध्यमातून चांगले-वाईट झाले आहे. याचे प्रमाण नाही. केवळ मान्यता आहे. त्यामुळेच तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने जी औषधे घेत असाल ती कायम ठेवा, ती बंद करू नका, असे प्रतिपादन दर्डा यांनी केले. यावेळी त्यांनी क्षमा, जगा आणि जगू द्या तसेच अपरिग्रहाच्या महतीवरदेखील प्रकाश टाकला.

सात दिवसीय आंतरिक यात्रा कार्यक्रमाच्या ऑनलाईन आयोजनाला ६ मे रोजी सुरुवात झाली. हा उपक्रम १२ मेपर्यंत चालेल. डॉ. मंजू जैन यांनी भक्तामर पाठ देशविदेशातील जैन व इतर धर्मीय बांधवांना विविध केंद्रांच्या माध्यमातून पोहोचविण्याचे कार्य केले आहे. नागपुरातदेखील मोठी प्रयोगशाळा बनते आहे. तेथे या सर्व गाथांच्या माध्यमातून प्रयोग होणार आहेत. या आयोजनात इंटरनॅशनल स्पिरिच्युअल हीलर डॉ. मंजू जैन आणि वेलनेस कोच-स्पिरिच्युअल हीलर सोनल जैन-जैसवाल या कोरोना महामारीदरम्यान भक्तामर हीलिंग आणि अंतर्गत शक्ती जागृत करण्यासंदर्भात उपाय सांगत आहेत.

कार्यक्रमात मधुस्मिताजी म. सा., प्रेरणाजी म. सा. यांच्यासमवेत सिद्धायतन संस्थेच्या मॅनेजिंग ट्रस्टी ललिता जैन सेठी (कोलकाता), संगम फाउंडेशनच्या संस्थापक नीरज सुराणा, आयव्हीएस हीलिंग सेंटरचे संचालक विनय जैन, जीतो लेडीज विंग, रायपूरच्या अध्यक्षा कुसुम श्रीश्रीमाल, विशाखापट्टणमचे उद्योगपती मनोज जैसवाल यांच्यासमवेत शेकडो समाजबांधव सहभागी झाले होते. सीए संतोष जैन (कोलकाता) यांनी मुख्य अतिथींचा परिचय करून दिला. मधुस्मिताजी म.सा. यांनी मंगलाचरण व प्रार्थना केली. कार्यक्रमाचे संचालन नीरज सुराणा यांनी केले.

चक्रांचे सांगितले महत्त्वसोनल जैन-जैसवाल यांनी कुंडलिनीतील मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा, सहास्रार या सात चक्रांबाबत माहिती दिली. जसजसे चक्र खुलत जातात, तसतसे आपले भाव शुद्ध होत जातात व आपल्याला आतून सुख-शांतीची अनुभूती होते, असे त्यांनी सांगितले. भगवंत सर्वांच्याच आत आहेत. त्यांना मिळविण्यासाठी मन स्वच्छ व भाव पवित्र आले पाहिजेत. जे मनात आहे तेच तोंडीदेखील असले पाहिजे, असे प्रतिपादन मनोज जैसवाल यांनी केले.

आत्म्याला जागृत करा भक्तामर स्तोत्राच्या एकेका श्लोकात अपार शक्ती आहे. यातून नकारात्मकता दूर होऊन आयुष्यात सकारात्मकता येते. या मंत्रामुळे लोकांचे आजार, सुख, बुद्धिमत्ता आणि समृद्धीसोबतच आयुष्याला पूर्ण तऱ्हेने यशस्वी बनविण्यासंदर्भात प्रभाव टाकतात. या मंत्रांच्या माध्यमातून आत्म्याला जागृत करता येते, असे मंजू जैन यांनी सांगितले. 

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डाspiritualअध्यात्मिक