शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

अजूनही वेळ गेलेली नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 19:45 IST

लहान मुलांची गुन्हेगारी हा गंभीर प्रश्न आज आपल्या समोर उभा

लहान मुलांची गुन्हेगारी हा गंभीर प्रश्न आज आपल्या समोर उभा आहे..पालक मित्रांनो सावधान !  आज बऱ्याच घरांमध्ये विद्यार्थीदशेतच गुंड , मवाली , व्यसनी , व्याभिचारी , स्वार्थी, जमात वाढत आहे .याला जबाबदार कोण ? ज्या वयात विद्यार्थ्यांना श्यामची आई , साने गुरूजीच्या कथा , राजा शिवछत्रपती , महात्मा फुले , डॉ . बाबासाहेब आंबेडकर , सावित्रीच्या लेकी ही पुस्तके वाचावयास द्यायची होती त्याच वयात आपण त्यांना शेकडो चॅनेलचा रिमोट दिला , इंटरनेट कनेक्शन दिले . मुलाला सोबतीची गरज असतानाही दोघेही पती - पत्नी नोकरी करण्यासाठी घराबाहेर पडले. दिवसभर तो इंटरनेटवर व टिव्हीवर काय बघतो हे कोण बघणार ? ज्या वयात आईचा मायेचा हात , मायेची कुस त्याला हवी असते त्याचवयात त्याला स्वतंत्र खोली दिली जाते . त्याच्या ममतेची निघृण हत्या केली जाते . त्याच्या अवास्तव मागण्या प्रेमापोटी पुऱ्या केल्या जातात . पैशाचे बंडल त्यांच्याकडे फेकले जातात . त्याच्या समोर ज्यावेळेस घरात आई - बाबांची प्रचंड भांडणे अक्षरश : मारामाऱ्या होतात . त्यातून ते मूल काय शिकणार ? कधी कधी उतू आलेलं आईबाबांचं प्रेम या मुलांसमोरच वेगळ्या पद्धतीने प्रदर्शित होतं त्यावेळेस या मुलांच्या कोवळ्या मनावर आपण काय कोरतोय याची कल्पना पालकांनी करणे ही काळाची गरज आहे . 'आपल्या मुलांसमोर दारू पिणारे पालक , काही पालक तर मुलींना सांगतात अगं गोव्याला सहलीला चालली का ? मग तेथील.. अवश्य घेऊन ये . मुलांनी टिव्ही बघताना दरडावणारा पालक स्वत : च तासनतास टिव्हीसमोर सिगारेटचा धुर सोडत बसलेला आज पहावयास मिळतोय . मुलींना झाशीची राणी , डॉ . आनंदीबाईची चरित्रे देण्याऐवजी तोकडया कपड्यात स्टेजवर मुलीला दाद देणारे पालक  नक्की काय साधणार आहेत ? मुलांचे - मुलीचे मित्र कोण जाणून घेणार ? आईच तोकडे कपडे घालू लागली . तिलाच सारखे मित्रांचे फोन येत असतील तर मग मुलांना संस्कारक्षम आई " भेटणार कधी ? तरूणांच्या आत्महत्या हा आपल्यासमोर गंभीर प्रश्न आहे. पालकमित्रांनो  थांबा आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी  विपश्यना ध्यान केंद्रावर दरमहा आनापान ध्यान शिबिर असते.'  वय ९ ते १८ वयोगटाच्या मुलामुलीसाठी या शिबिराचे आयोजन केले जाते . ही संपूर्ण शिबिरे पूर्णपणे विनामूल्य असतात . जुन्या साधकांच्या दानावर हे काम चालते . या शिबिरांमुळे मुलांची स्मरणशक्ती, बुद्धीमत्ता,एकाग्रता वाढते, भय कमी होते , चंचलता दूर होते , त्यांची शारिरीक , मानसिक व अध्यात्मिक प्रगती साधते .  आपल्या मुलाना ,  नैतिकतेचे धडे देण्यासाठी सबल व सशक्त पिढी घडवण्यासाठी हा राजमार्ग आहे , या संधीचा आपण आपल्या कुटुंबासह लाभ घ्या व सबल भारत घडवा 

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिक