शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

अजूनही वेळ गेलेली नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 19:45 IST

लहान मुलांची गुन्हेगारी हा गंभीर प्रश्न आज आपल्या समोर उभा

लहान मुलांची गुन्हेगारी हा गंभीर प्रश्न आज आपल्या समोर उभा आहे..पालक मित्रांनो सावधान !  आज बऱ्याच घरांमध्ये विद्यार्थीदशेतच गुंड , मवाली , व्यसनी , व्याभिचारी , स्वार्थी, जमात वाढत आहे .याला जबाबदार कोण ? ज्या वयात विद्यार्थ्यांना श्यामची आई , साने गुरूजीच्या कथा , राजा शिवछत्रपती , महात्मा फुले , डॉ . बाबासाहेब आंबेडकर , सावित्रीच्या लेकी ही पुस्तके वाचावयास द्यायची होती त्याच वयात आपण त्यांना शेकडो चॅनेलचा रिमोट दिला , इंटरनेट कनेक्शन दिले . मुलाला सोबतीची गरज असतानाही दोघेही पती - पत्नी नोकरी करण्यासाठी घराबाहेर पडले. दिवसभर तो इंटरनेटवर व टिव्हीवर काय बघतो हे कोण बघणार ? ज्या वयात आईचा मायेचा हात , मायेची कुस त्याला हवी असते त्याचवयात त्याला स्वतंत्र खोली दिली जाते . त्याच्या ममतेची निघृण हत्या केली जाते . त्याच्या अवास्तव मागण्या प्रेमापोटी पुऱ्या केल्या जातात . पैशाचे बंडल त्यांच्याकडे फेकले जातात . त्याच्या समोर ज्यावेळेस घरात आई - बाबांची प्रचंड भांडणे अक्षरश : मारामाऱ्या होतात . त्यातून ते मूल काय शिकणार ? कधी कधी उतू आलेलं आईबाबांचं प्रेम या मुलांसमोरच वेगळ्या पद्धतीने प्रदर्शित होतं त्यावेळेस या मुलांच्या कोवळ्या मनावर आपण काय कोरतोय याची कल्पना पालकांनी करणे ही काळाची गरज आहे . 'आपल्या मुलांसमोर दारू पिणारे पालक , काही पालक तर मुलींना सांगतात अगं गोव्याला सहलीला चालली का ? मग तेथील.. अवश्य घेऊन ये . मुलांनी टिव्ही बघताना दरडावणारा पालक स्वत : च तासनतास टिव्हीसमोर सिगारेटचा धुर सोडत बसलेला आज पहावयास मिळतोय . मुलींना झाशीची राणी , डॉ . आनंदीबाईची चरित्रे देण्याऐवजी तोकडया कपड्यात स्टेजवर मुलीला दाद देणारे पालक  नक्की काय साधणार आहेत ? मुलांचे - मुलीचे मित्र कोण जाणून घेणार ? आईच तोकडे कपडे घालू लागली . तिलाच सारखे मित्रांचे फोन येत असतील तर मग मुलांना संस्कारक्षम आई " भेटणार कधी ? तरूणांच्या आत्महत्या हा आपल्यासमोर गंभीर प्रश्न आहे. पालकमित्रांनो  थांबा आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी  विपश्यना ध्यान केंद्रावर दरमहा आनापान ध्यान शिबिर असते.'  वय ९ ते १८ वयोगटाच्या मुलामुलीसाठी या शिबिराचे आयोजन केले जाते . ही संपूर्ण शिबिरे पूर्णपणे विनामूल्य असतात . जुन्या साधकांच्या दानावर हे काम चालते . या शिबिरांमुळे मुलांची स्मरणशक्ती, बुद्धीमत्ता,एकाग्रता वाढते, भय कमी होते , चंचलता दूर होते , त्यांची शारिरीक , मानसिक व अध्यात्मिक प्रगती साधते .  आपल्या मुलाना ,  नैतिकतेचे धडे देण्यासाठी सबल व सशक्त पिढी घडवण्यासाठी हा राजमार्ग आहे , या संधीचा आपण आपल्या कुटुंबासह लाभ घ्या व सबल भारत घडवा 

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिक