शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

अजूनही वेळ गेलेली नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 19:45 IST

लहान मुलांची गुन्हेगारी हा गंभीर प्रश्न आज आपल्या समोर उभा

लहान मुलांची गुन्हेगारी हा गंभीर प्रश्न आज आपल्या समोर उभा आहे..पालक मित्रांनो सावधान !  आज बऱ्याच घरांमध्ये विद्यार्थीदशेतच गुंड , मवाली , व्यसनी , व्याभिचारी , स्वार्थी, जमात वाढत आहे .याला जबाबदार कोण ? ज्या वयात विद्यार्थ्यांना श्यामची आई , साने गुरूजीच्या कथा , राजा शिवछत्रपती , महात्मा फुले , डॉ . बाबासाहेब आंबेडकर , सावित्रीच्या लेकी ही पुस्तके वाचावयास द्यायची होती त्याच वयात आपण त्यांना शेकडो चॅनेलचा रिमोट दिला , इंटरनेट कनेक्शन दिले . मुलाला सोबतीची गरज असतानाही दोघेही पती - पत्नी नोकरी करण्यासाठी घराबाहेर पडले. दिवसभर तो इंटरनेटवर व टिव्हीवर काय बघतो हे कोण बघणार ? ज्या वयात आईचा मायेचा हात , मायेची कुस त्याला हवी असते त्याचवयात त्याला स्वतंत्र खोली दिली जाते . त्याच्या ममतेची निघृण हत्या केली जाते . त्याच्या अवास्तव मागण्या प्रेमापोटी पुऱ्या केल्या जातात . पैशाचे बंडल त्यांच्याकडे फेकले जातात . त्याच्या समोर ज्यावेळेस घरात आई - बाबांची प्रचंड भांडणे अक्षरश : मारामाऱ्या होतात . त्यातून ते मूल काय शिकणार ? कधी कधी उतू आलेलं आईबाबांचं प्रेम या मुलांसमोरच वेगळ्या पद्धतीने प्रदर्शित होतं त्यावेळेस या मुलांच्या कोवळ्या मनावर आपण काय कोरतोय याची कल्पना पालकांनी करणे ही काळाची गरज आहे . 'आपल्या मुलांसमोर दारू पिणारे पालक , काही पालक तर मुलींना सांगतात अगं गोव्याला सहलीला चालली का ? मग तेथील.. अवश्य घेऊन ये . मुलांनी टिव्ही बघताना दरडावणारा पालक स्वत : च तासनतास टिव्हीसमोर सिगारेटचा धुर सोडत बसलेला आज पहावयास मिळतोय . मुलींना झाशीची राणी , डॉ . आनंदीबाईची चरित्रे देण्याऐवजी तोकडया कपड्यात स्टेजवर मुलीला दाद देणारे पालक  नक्की काय साधणार आहेत ? मुलांचे - मुलीचे मित्र कोण जाणून घेणार ? आईच तोकडे कपडे घालू लागली . तिलाच सारखे मित्रांचे फोन येत असतील तर मग मुलांना संस्कारक्षम आई " भेटणार कधी ? तरूणांच्या आत्महत्या हा आपल्यासमोर गंभीर प्रश्न आहे. पालकमित्रांनो  थांबा आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी  विपश्यना ध्यान केंद्रावर दरमहा आनापान ध्यान शिबिर असते.'  वय ९ ते १८ वयोगटाच्या मुलामुलीसाठी या शिबिराचे आयोजन केले जाते . ही संपूर्ण शिबिरे पूर्णपणे विनामूल्य असतात . जुन्या साधकांच्या दानावर हे काम चालते . या शिबिरांमुळे मुलांची स्मरणशक्ती, बुद्धीमत्ता,एकाग्रता वाढते, भय कमी होते , चंचलता दूर होते , त्यांची शारिरीक , मानसिक व अध्यात्मिक प्रगती साधते .  आपल्या मुलाना ,  नैतिकतेचे धडे देण्यासाठी सबल व सशक्त पिढी घडवण्यासाठी हा राजमार्ग आहे , या संधीचा आपण आपल्या कुटुंबासह लाभ घ्या व सबल भारत घडवा 

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिक