शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

अजूनही वेळ गेलेली नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 19:45 IST

लहान मुलांची गुन्हेगारी हा गंभीर प्रश्न आज आपल्या समोर उभा

लहान मुलांची गुन्हेगारी हा गंभीर प्रश्न आज आपल्या समोर उभा आहे..पालक मित्रांनो सावधान !  आज बऱ्याच घरांमध्ये विद्यार्थीदशेतच गुंड , मवाली , व्यसनी , व्याभिचारी , स्वार्थी, जमात वाढत आहे .याला जबाबदार कोण ? ज्या वयात विद्यार्थ्यांना श्यामची आई , साने गुरूजीच्या कथा , राजा शिवछत्रपती , महात्मा फुले , डॉ . बाबासाहेब आंबेडकर , सावित्रीच्या लेकी ही पुस्तके वाचावयास द्यायची होती त्याच वयात आपण त्यांना शेकडो चॅनेलचा रिमोट दिला , इंटरनेट कनेक्शन दिले . मुलाला सोबतीची गरज असतानाही दोघेही पती - पत्नी नोकरी करण्यासाठी घराबाहेर पडले. दिवसभर तो इंटरनेटवर व टिव्हीवर काय बघतो हे कोण बघणार ? ज्या वयात आईचा मायेचा हात , मायेची कुस त्याला हवी असते त्याचवयात त्याला स्वतंत्र खोली दिली जाते . त्याच्या ममतेची निघृण हत्या केली जाते . त्याच्या अवास्तव मागण्या प्रेमापोटी पुऱ्या केल्या जातात . पैशाचे बंडल त्यांच्याकडे फेकले जातात . त्याच्या समोर ज्यावेळेस घरात आई - बाबांची प्रचंड भांडणे अक्षरश : मारामाऱ्या होतात . त्यातून ते मूल काय शिकणार ? कधी कधी उतू आलेलं आईबाबांचं प्रेम या मुलांसमोरच वेगळ्या पद्धतीने प्रदर्शित होतं त्यावेळेस या मुलांच्या कोवळ्या मनावर आपण काय कोरतोय याची कल्पना पालकांनी करणे ही काळाची गरज आहे . 'आपल्या मुलांसमोर दारू पिणारे पालक , काही पालक तर मुलींना सांगतात अगं गोव्याला सहलीला चालली का ? मग तेथील.. अवश्य घेऊन ये . मुलांनी टिव्ही बघताना दरडावणारा पालक स्वत : च तासनतास टिव्हीसमोर सिगारेटचा धुर सोडत बसलेला आज पहावयास मिळतोय . मुलींना झाशीची राणी , डॉ . आनंदीबाईची चरित्रे देण्याऐवजी तोकडया कपड्यात स्टेजवर मुलीला दाद देणारे पालक  नक्की काय साधणार आहेत ? मुलांचे - मुलीचे मित्र कोण जाणून घेणार ? आईच तोकडे कपडे घालू लागली . तिलाच सारखे मित्रांचे फोन येत असतील तर मग मुलांना संस्कारक्षम आई " भेटणार कधी ? तरूणांच्या आत्महत्या हा आपल्यासमोर गंभीर प्रश्न आहे. पालकमित्रांनो  थांबा आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी  विपश्यना ध्यान केंद्रावर दरमहा आनापान ध्यान शिबिर असते.'  वय ९ ते १८ वयोगटाच्या मुलामुलीसाठी या शिबिराचे आयोजन केले जाते . ही संपूर्ण शिबिरे पूर्णपणे विनामूल्य असतात . जुन्या साधकांच्या दानावर हे काम चालते . या शिबिरांमुळे मुलांची स्मरणशक्ती, बुद्धीमत्ता,एकाग्रता वाढते, भय कमी होते , चंचलता दूर होते , त्यांची शारिरीक , मानसिक व अध्यात्मिक प्रगती साधते .  आपल्या मुलाना ,  नैतिकतेचे धडे देण्यासाठी सबल व सशक्त पिढी घडवण्यासाठी हा राजमार्ग आहे , या संधीचा आपण आपल्या कुटुंबासह लाभ घ्या व सबल भारत घडवा 

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिक