शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

वैराग्यप्राप्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 02:53 IST

आपल्या भोगउत्सुक इंद्रियांवर बुद्धीच्या बळावर पूर्ण ताबा मिळवून, त्या इंद्रियांमध्ये वैराग्य निर्माण होणे साधकावस्थेत अत्यंत आवश्यक आहे.

- वामनराव देशपांडेदेहभावना नष्ट झाल्याशिवाय परमात्माप्राप्तीच्या साधनेला आवश्यक असणारी गती प्राप्तच होत नाही. दहाही इंद्रिये वासनाग्रस्त असतात. आपण कोणी तरी श्रेष्ठ पुरुष आहोत, हा अहंकार साधनेच्या आड येतो. तसेच जन्मापासून वृद्धत्वापर्यंत शरीर वेदना आणि दु:खांना सामोरे जावे लागते. सुखदु:खांनी लडबडलेले आयुष्यसुद्धा करीत असलेल्या नामसाधनेच्या सतत आड येत राहते. त्यासाठी काय उपाय करावे यावर भगवंत हितोपदेश करतात.इन्द्रियार्थेषु वैराग्यमनहक्कार एव च।जन्ममृत्युजराव्याधिदु:दोषानुदर्शनम।।आपल्या भोगउत्सुक इंद्रियांवर बुद्धीच्या बळावर पूर्ण ताबा मिळवून, त्या इंद्रियांमध्ये वैराग्य निर्माण होणे साधकावस्थेत अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत इंद्रिये आपापल्या विषयसेवनांपासून अलिप्त होत नाहीत, तोपर्यंत वैराग्याची प्राप्ती होतच नाही. अहंकारी वृत्तीचा दंश साधकाला चुकूनही होता कामा नये. अहंकार साधनेला मारक ठरतो. तसेच जरा-व्याधींकडे लक्ष केंद्रित करणे साधनेला हितकारक होत नाही. म्हणून साधकाने व्याधींकडे वा वाढत जाणाऱ्या वयाकडे दुर्लक्ष करावे. हे जे दु:खरूप होणे, म्हणजे शारीर भाव मनात सळसळत राहणे असते ते करीत असलेल्या साधनेला निश्चितपणे हानी पोहोचवते हे निश्चित. सत्य म्हणजे नेमके काय? सत्य काय तर सुखाची प्राप्ती अविरत व्हावी ही तीव्र इच्छा मानवी दु:खाचे कारण आहे. एकदा का सुखाच्या अभावाने दु:ख निर्माण झाले की, विवेक संपुष्टातच येतो. सुख काय अथवा दु:ख काय, ही मनोनिर्मिती आहे. त्याचा आपण त्याग केला पाहिजे. भगवंत सतत अर्जुनाच्या निमित्ताने आपल्या सर्वच साधक भक्तांना मोलाचा संदेश देतात की,असक्तिरनभिष : पुत्रदारगृहादिषु।नित्ये च समचितत्वामिष्टानिष्टोपपत्तिषु ।।

टॅग्स :spiritualअध्यात्मिक