शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

वैराग्यप्राप्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 02:53 IST

आपल्या भोगउत्सुक इंद्रियांवर बुद्धीच्या बळावर पूर्ण ताबा मिळवून, त्या इंद्रियांमध्ये वैराग्य निर्माण होणे साधकावस्थेत अत्यंत आवश्यक आहे.

- वामनराव देशपांडेदेहभावना नष्ट झाल्याशिवाय परमात्माप्राप्तीच्या साधनेला आवश्यक असणारी गती प्राप्तच होत नाही. दहाही इंद्रिये वासनाग्रस्त असतात. आपण कोणी तरी श्रेष्ठ पुरुष आहोत, हा अहंकार साधनेच्या आड येतो. तसेच जन्मापासून वृद्धत्वापर्यंत शरीर वेदना आणि दु:खांना सामोरे जावे लागते. सुखदु:खांनी लडबडलेले आयुष्यसुद्धा करीत असलेल्या नामसाधनेच्या सतत आड येत राहते. त्यासाठी काय उपाय करावे यावर भगवंत हितोपदेश करतात.इन्द्रियार्थेषु वैराग्यमनहक्कार एव च।जन्ममृत्युजराव्याधिदु:दोषानुदर्शनम।।आपल्या भोगउत्सुक इंद्रियांवर बुद्धीच्या बळावर पूर्ण ताबा मिळवून, त्या इंद्रियांमध्ये वैराग्य निर्माण होणे साधकावस्थेत अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत इंद्रिये आपापल्या विषयसेवनांपासून अलिप्त होत नाहीत, तोपर्यंत वैराग्याची प्राप्ती होतच नाही. अहंकारी वृत्तीचा दंश साधकाला चुकूनही होता कामा नये. अहंकार साधनेला मारक ठरतो. तसेच जरा-व्याधींकडे लक्ष केंद्रित करणे साधनेला हितकारक होत नाही. म्हणून साधकाने व्याधींकडे वा वाढत जाणाऱ्या वयाकडे दुर्लक्ष करावे. हे जे दु:खरूप होणे, म्हणजे शारीर भाव मनात सळसळत राहणे असते ते करीत असलेल्या साधनेला निश्चितपणे हानी पोहोचवते हे निश्चित. सत्य म्हणजे नेमके काय? सत्य काय तर सुखाची प्राप्ती अविरत व्हावी ही तीव्र इच्छा मानवी दु:खाचे कारण आहे. एकदा का सुखाच्या अभावाने दु:ख निर्माण झाले की, विवेक संपुष्टातच येतो. सुख काय अथवा दु:ख काय, ही मनोनिर्मिती आहे. त्याचा आपण त्याग केला पाहिजे. भगवंत सतत अर्जुनाच्या निमित्ताने आपल्या सर्वच साधक भक्तांना मोलाचा संदेश देतात की,असक्तिरनभिष : पुत्रदारगृहादिषु।नित्ये च समचितत्वामिष्टानिष्टोपपत्तिषु ।।

टॅग्स :spiritualअध्यात्मिक