शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

मनाला शुभचिंतनाची सवय लावणे गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 08:17 IST

​​​​​​​आत्मग्लानी किंवा व्यर्थ विचार करणे या गोेष्टी मनाला दुर्बल बनवितात.

- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराजआत्मग्लानी किंवा व्यर्थ विचार करणे या गोेष्टी मनाला दुर्बल बनवितात. मनाला दुर्बल बनू न देता त्यावर संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. निकृष्ट भावना आणि विचार यांचा सामना करण्यासाठी मनाला प्रवृत्त करा. आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून उत्साहाने कार्य करीत राहिले पाहिजे. मनावर संयम ठेवला पाहिजे. जास्तीत जास्त चांगला विचार करा. मनाला शुभचिंतन करण्याची सवय लावायला हवी. तुम्ही मनाला जेवढे चांगले ठेवाल तेवढा तुमचा आध्यात्मिक विकास होत असतो. जर गायीला चांगला पौष्टिक आहार दिला तर ती अधिक दूध देते, तिच्या दुधामध्ये वाढ होते. त्याचप्रमाणे मनाला चांगला आहार म्हणजे सद्विचारांचा आहार दिला तर मन प्रसन्न होईल. प्रसन्न मन शांतीला जन्म देते, त्या मनामध्ये कायम शांती वास करते. ध्यानधारणा, प्रार्थना, जप हा मनाला प्रसन्न ठेवण्याचा सात्त्विक आहार आहे. त्यामुळे मनाची स्थिती-गती यावर नियंत्रण ठेवता येते. याने मनावर करडी नजर ठेवता येते. त्याच्या गतिविधीचा विचार करता येतो. मनावर कंट्रोल ठेवला की मन स्वयंस्थिर होते आणि तुमच्या कार्याला चांगली गती मिळते. तुम्हाला श्वासावर चांगले नियंत्रण ठेवता येते. श्वासावर नियंत्रण केल्याने प्राणायाम साधला जातो. मनाच्या भावनेवरच प्राणायामची स्थिती अवलंबून असते. ती साध्य झाल्यास मन सजग बनते. सजग झालेले मन आपल्या श्वास- उच्छ्वासात बदल घडवून आणते.मग चित्तशुद्धीचा मार्ग मोकळा होतो.कारण चित्तशुद्धी आध्यात्मिक मार्गात असणाऱ्या माणसाला सर्वाेच्च स्थिती गाठून देते. चित्तशुद्धी झाल्याशिवाय आत्म्यामध्ये गोपाल निवास करीत नाही. चित्ताची अवस्था निरामय असावी लागते. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात,तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ।येऊनी गोपाल राहे तिथे।।चित्त निर्मळ झाल्याशिवाय अध्यात्माचा मार्ग मोकळा होत नाही. चित्त स्थिर ठेवण्यात मनाचा मोठा वाटा असतो. नव्हे मनाचाच एक भाग चित्त आहे. म्हणून या मनाची परिस्थिती मनावरच अवलंबून आहे.(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक