शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

अंत:करणातील भावानुसार इच्छांचे प्रकटीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 09:06 IST

प्रगट झालेल्या अग्नीच्या संपर्कानेच लाकडातील सूक्ष्म किंवा बीजरूप अग्नी प्रकट होतो. तशी सूक्ष्म किंवा बीजरूप भावना चांगल्या किंवा वाईट भक्तांच्या सान्निध्याने प्रकट होतात.

प्रगट झालेल्या अग्नीच्या संपर्कानेच लाकडातील सूक्ष्म किंवा बीजरूप अग्नी प्रकट होतो. तशी सूक्ष्म किंवा बीजरूप भावना चांगल्या किंवा वाईट भक्तांच्या सान्निध्याने प्रकट होतात. मुळात भावनांचा उच्चतम उत्कर्ष मनुष्याच्या प्रत्यक्ष संगतीतच प्रत्ययाला येतो. त्यामुळे माणसाच्या सान्निध्यात आलेल्यालाच त्याची प्रत्यक्ष अनुभूती येते. राष्ट्रपुरुषांचा प्रताप पाहून अनेक लोकांच्या भावना प्रगट झाल्या. त्यांच्या सान्निध्यात आलेल्या लोकांनी त्यांच्या प्रभावामुळे आपले जीवन त्यांच्यासाठी समर्पण केले. हजारो तरुणांनी त्यांच्यासाठी प्राणांच्या आहुती दिल्या. आपल्या प्राणाची पर्वा न करता त्यांना आपले जीवन समर्पित केले. याला भावनात्मक संसर्गजन्यता म्हणता येईल का, हा प्रश्नच आहे. कारण देशभक्तांच्या, थोर पुरुषांच्या, शूरवीरांच्या मागे हजारो लोक गेले व लाखो घरीच राहिले. याचे कारण असे म्हणता येईल की, मनुष्याच्या ठिकाणी भावना जितक्या तीव्र व पूर्णत्वाने प्रकट झाल्या असतील तितका त्यांचा प्रभाव पडला असे समजावे लागेल. कारण त्यांच्या सुप्त भावना झपाट्याने जागृत होताना दिसून येतात.

एखाद्याच्या प्रभावात येणे, त्यांच्या वचनानुसार वागणे यालाच समजावे त्यांच्या प्रभावी कार्याचा त्यावर परिणाम झाला. त्यामुळे त्यांनी जे ध्येय ठरवलेले असते त्या ध्येयापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांची माघार नसते. कारण त्यांच्यावर पडलेल्या प्रभावाचा तो एक भाग असतो. ज्यांच्या अंत:करणात जो भाव आहे, त्यानुसार त्यांच्या मनात सुप्त इच्छा प्रकट होतात. त्यामुळे मनुष्याचे मन हे भावनांचे चालते-बोलते उदाहरण आहे. संगतीचा परिणाम प्रसिद्धच आहे. ज्यांच्या संगतीत राहावे तसे मन बनते. अर्थात जसे मनाने व्हावे असे आपल्याला वाटते, तशा संगतीत राहिल्याने मन तसे बनते. म्हणून थोर शूरवीरांच्या, संतांच्या, राष्ट्रपुरुषांच्या संगतीत राहा तसे मन बनेल. वाईट गुणांचा त्याग करून चांगल्या गुणांचा अवलंब कराल. त्यामुळे मानसशास्त्राच्या दृष्टीने मनुष्याने केलेल्या संगतीचे महत्त्व व कार्य आपल्याला जाणवते.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक