शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

शरीर-मनाचे सामर्थ्य वाढवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 05:39 IST

विचारांमधील शक्ती विचारांनीच वाढते. अविचाराने सद्विचारांचा क्षय होतो. म्हणून कधीही अविचार करू नये.

- मोहनबुवा रामदासी

शक्तीने मिळती राज्ये।युक्तीने यत्न होतसे।शक्ती युक्ती जये ठायी।तेथे श्रीमंत नांदती।समर्थांनी शरीराच्या शक्ती संवर्धनावर विशेष भर दिला आहे. शरीरास यंत्र जाणावे, असा उपदेश समर्थ करतात. शरीर हे सर्व कार्यासाठी एक साधन, माध्यम आहे. साधनच जर शक्तीसंपन्न नसेल, तर या शरीराच्या माध्यमातून होणारी कामे ही उत्तम दर्जाची होऊ शकत नाहीत. म्हणूनच ‘शरीर माध्यम खलु धर्म साधनम्’ असे म्हटले आहे. शरीर सुदृढ व निरोगी असेल, तर मनात येणारा प्रत्येक विचार हा एक वेगळी ऊर्जाशक्ती घेऊनच बाहेर पडतो. शरीराच्या संवर्धनासाठी सूर्यनमस्कार व मनाच्या संवर्धनासाठी मनोबोध अत्यंत आवश्यक आहे.

विचारांमधील शक्ती विचारांनीच वाढते. अविचाराने सद्विचारांचा क्षय होतो. म्हणून कधीही अविचार करू नये. शरीराची शक्ती पौष्टिक पदार्थ, भाजीपाला व फळांनी वाढविता येते; पण मनाचे सामर्थ्य व शक्ती ज्याने हा भाजीपाला व फळे निर्माण केली त्याच्या नामानेच म्हणजेच सद्विचारानेच मनाचे सामर्थ्य वाढेल. म्हणून मनात येणारा प्रत्येक विचार हा बुद्धीच्या कसोटीवर तपासता आला पाहिजे. मनातील अविवेक आणि अविचारांची स्पंदने हाय बी.पी. आणि शुगरला कारणीभूत आहेत. विचारांची उंची राखावी व संयमी वृत्ती असावी; पण अट्टाहास व दुराग्रह नसावा. सध्याचा जमाना हा फास्टफूडचा आहे; त्यामुळे रोगराई, व्हायरस फारच पसरत आहे.

एका विशिष्ट मर्यादेपर्यंत याचा आस्वाद घ्यायला हरकत नाही; पण त्याची आस जास्ती असू नये, नाहीतर मग वाद होतात. प्रकृतीचे सगळे नियम झुगारून आणि धाब्यावर बसवून ढाब्यावर जेवायची सवय लागली. ‘शरीर माध्यम खलु धर्म साधनम्’ या शरीर यंत्रासारखे यंत्र आणीक नाही! तोंडातल्या बत्तिशीच्या एवढे वर्ष काम देणारा इंपोरटेड अडकित्ता अजून तयार झाला नाही म्हणून या शरीरसामर्थ्याबरोबर मनाचेही सामर्थ्य वाढवा.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक