शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
7
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
8
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
9
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
10
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
11
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
12
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
13
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
14
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
15
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
16
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
17
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
18
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
19
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
20
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?

शरीर-मनाचे सामर्थ्य वाढवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 05:39 IST

विचारांमधील शक्ती विचारांनीच वाढते. अविचाराने सद्विचारांचा क्षय होतो. म्हणून कधीही अविचार करू नये.

- मोहनबुवा रामदासी

शक्तीने मिळती राज्ये।युक्तीने यत्न होतसे।शक्ती युक्ती जये ठायी।तेथे श्रीमंत नांदती।समर्थांनी शरीराच्या शक्ती संवर्धनावर विशेष भर दिला आहे. शरीरास यंत्र जाणावे, असा उपदेश समर्थ करतात. शरीर हे सर्व कार्यासाठी एक साधन, माध्यम आहे. साधनच जर शक्तीसंपन्न नसेल, तर या शरीराच्या माध्यमातून होणारी कामे ही उत्तम दर्जाची होऊ शकत नाहीत. म्हणूनच ‘शरीर माध्यम खलु धर्म साधनम्’ असे म्हटले आहे. शरीर सुदृढ व निरोगी असेल, तर मनात येणारा प्रत्येक विचार हा एक वेगळी ऊर्जाशक्ती घेऊनच बाहेर पडतो. शरीराच्या संवर्धनासाठी सूर्यनमस्कार व मनाच्या संवर्धनासाठी मनोबोध अत्यंत आवश्यक आहे.

विचारांमधील शक्ती विचारांनीच वाढते. अविचाराने सद्विचारांचा क्षय होतो. म्हणून कधीही अविचार करू नये. शरीराची शक्ती पौष्टिक पदार्थ, भाजीपाला व फळांनी वाढविता येते; पण मनाचे सामर्थ्य व शक्ती ज्याने हा भाजीपाला व फळे निर्माण केली त्याच्या नामानेच म्हणजेच सद्विचारानेच मनाचे सामर्थ्य वाढेल. म्हणून मनात येणारा प्रत्येक विचार हा बुद्धीच्या कसोटीवर तपासता आला पाहिजे. मनातील अविवेक आणि अविचारांची स्पंदने हाय बी.पी. आणि शुगरला कारणीभूत आहेत. विचारांची उंची राखावी व संयमी वृत्ती असावी; पण अट्टाहास व दुराग्रह नसावा. सध्याचा जमाना हा फास्टफूडचा आहे; त्यामुळे रोगराई, व्हायरस फारच पसरत आहे.

एका विशिष्ट मर्यादेपर्यंत याचा आस्वाद घ्यायला हरकत नाही; पण त्याची आस जास्ती असू नये, नाहीतर मग वाद होतात. प्रकृतीचे सगळे नियम झुगारून आणि धाब्यावर बसवून ढाब्यावर जेवायची सवय लागली. ‘शरीर माध्यम खलु धर्म साधनम्’ या शरीर यंत्रासारखे यंत्र आणीक नाही! तोंडातल्या बत्तिशीच्या एवढे वर्ष काम देणारा इंपोरटेड अडकित्ता अजून तयार झाला नाही म्हणून या शरीरसामर्थ्याबरोबर मनाचेही सामर्थ्य वाढवा.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक