शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
3
"गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
4
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
5
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
6
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
7
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
8
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
9
२०२५ची सांगता एकदशीने: २०२६मध्ये किती एकादशी? २ अधिक व्रतांची भर; पाहा, आषाढी-कार्तिकी तिथी
10
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
11
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
12
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
13
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
14
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
15
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
16
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
17
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
18
बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस 'बँक हॉलिडे'; पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर
19
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
20
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
Daily Top 2Weekly Top 5

अनुचित नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 05:57 IST

धर्माधिकाऱ्यांनी स्त्रियांची उपेक्षा करून त्यांची निंदा केली. पुरुषप्रधान संस्कृतीने तिला नरकाची खाण म्हटलं. महिलांना धर्माधिकार नाकारला.

- बा. भो. शास्त्रीस्वार्थी माणसाने अनेक जाती निर्माण केल्या. काहींचे अधिकार हिरावून घेतले. स्वनिर्मित कल्पना धर्मग्रंथात पेरल्या आणि धर्मनियम तयार करून माणसांचे तुकडे केले. जगाला आधार देणारा मानवच निराधार केला. देवधर्मापासून त्याला वंचित ठेवला. धर्माधिकाऱ्यांनी स्त्रियांची उपेक्षा करून त्यांची निंदा केली. पुरुषप्रधान संस्कृतीने तिला नरकाची खाण म्हटलं. महिलांना धर्माधिकार नाकारला. तिला मंदिर प्रवेशास बंदी केली. अधिकाराची पात्रता असावी हे खरं आहे. अपात्र राजा, सेनापती, वैद्य, शिक्षक, धर्माचे आचार्य समाज हे देशाला अतिशय घातकच आहेत. पण हा पात्रतेचा अधिकार विशिष्ट वर्गालाच कसा काय असू शकेल, याचा विचार आता समाजाने केला पाहिजे. आजही जर महिलांना सन्मान मिळत नसेल तर तोे देश उन्नत कसा? या संकुचित विचाराने अखंड मानव जात छिन्नभिन्न झाली. त्यात एकलव्यासह अनेकांचा बळी गेला. यातून उच्च-नीचतेचा भाव निर्माण झाला. अनंत काळ भेदाभेद होत राहिला. परमगती सर्व जीवांना मिळत नाही, असा मतलबी विद्वानांनी सिद्धांत मांडला होता. पण पाच हजार वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णाने या अनुचित रूढींविरोधात पहिलं बंड पुकारलं.मां हि पार्थ व्यपाश्रित्यये पि स्यु: पापयोनय:स्त्रियोवैश्यास्तथा शूद्रास्तेपि यान्ति परां गतिम्पापात्म्यासह स्त्री, वैश्य तसेच शूद्रांनाही मोक्षाधिकार असल्याचं ठणकावून गीतेत सांगितलं आहे. नंतर श्रीचक्रधरांनी लोकांचं निरीक्षण केलं आणि ते म्हणाले, ‘हा अवघा जनु ठकला असे गा: परि मी ठकला ऐसे कव्हनी न म्हणे : कव्हनी एकु ऐसे म्हणेल : मी ठकला : तरी तयाचे ठक फैडिजैल.’ हाच कळवळा संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून व्यक्त केला.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक