शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
2
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
3
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
4
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
5
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
6
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
7
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
8
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
9
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
10
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
11
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
12
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
13
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
14
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
15
Travel : अवघ्या ३ दिवसात फिरता येईल 'हा' सुंदर देश; भारताचे १०००० होतील तब्बल ५८०००! फिरण्यासाठी बेस्ट
16
"बँक खात्यात ५ लाख आले, तरीही म्हणाला आणखी पैसे लागतील"; डॉ. आदिलच्या whatsApp चॅटमध्ये काय काय?
17
केरळ, यूपीसह अनेक राज्यात SIR ला आव्हान; सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मागितले उत्तर...
18
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
19
Local Body ELection: दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय, नगराध्यक्ष आणि सर्वच २६ नगरसेवक बिनविरोध!
20
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक काळातील एक महत्त्वपूर्ण प्रबंधशास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 17:51 IST

प्रबंधशास्त्र हे आधुनिक काळाचे एक महत्त्वपूर्ण शास्त्र आहे. या शास्त्राचा उपयोग करून ध्येयप्राप्ती करण्यास फार सहजता निर्माण झालेली आहे. हेच कारण आहे की, मानवाने प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रबंधशास्त्राचा उपयोग सुरू केलेला आहे. 

- डॉ. भूषण कुमार उपाध्यायप्रबंधशास्त्र हे आधुनिक काळाचे एक महत्त्वपूर्ण शास्त्र आहे. या शास्त्राचा उपयोग करून ध्येयप्राप्ती करण्यास फार सहजता निर्माण झालेली आहे. हेच कारण आहे की, मानवाने प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रबंधशास्त्राचा उपयोग सुरू केलेला आहे. या शास्त्राचे इतके महत्त्व आहे की, विश्वातील प्रत्येक विद्यापीठामध्ये हे शास्त्र शिकविले जाते. भारतात पुरातन काळातील ग्रंथांमध्ये प्रबंधशास्त्राची चर्चा केली आहे. कोणत्या कार्यास कशा प्रकारे संपादित करावे याबाबतची चर्चा अनेक स्थानांवर मिळून येते. चाणक्यच्या अर्थशास्त्रापासून ते पुराण आदी ग्रंथांपर्यंत आम्ही प्रबंधशास्त्राच्या अनेक महत्त्वपूर्ण सूत्रांना पाहत आलेलो आहोत.मनाच्या व्यवस्थापनाकरिता ज्या प्रबंधशास्त्राचा उदय झालेला आहे त्यास ‘योगशास्त्र’ असे म्हटलेले आहे़. विस्तार आणि शास्त्रीय पद्धतीने मनाच्या व्यवस्थापनाचा खुलासा हा योगशास्त्रामध्ये केलेला आहे. योगशास्त्राचा महत्त्वपूर्ण ग्रंथ महर्षी पतंजली यांनी लिहिलेला असून त्याचे नाव ‘पतंजली योगसूत्र’ असे आहे. या ग्रंथामध्ये विस्तारपूर्वक आणि विशिष्टतापूर्ण मनाच्या व्यवस्थापनाची गोष्ट सांगितलेली आहे. योगसूत्रातील एका सूत्रामध्ये भगवान पतंजली अशा प्रकारे प्रबंधशास्त्राचे मूळ सांगतात -‘स तु दीर्घकालनैरन्तर्यसत्कारासेवितो दृढभूÞमि:।’म्हणजेच दीर्घकाळापर्यंत व निरंतर श्रद्धापूर्वक सेवेने आम्ही जे कार्य करतो त्याचा आधार दृढ (पक्का) असतो. भगवान पतंजली यांनी ही गोष्ट मनाच्या अभ्यासाविषयी म्हटलेली आहे, परंतु ही बाब जीवनाच्या सर्व स्तरांवर लागू होत असते. भगवान पतंजली यांनी कोणतेही कार्य धैर्याने करण्यास सांगितलेले आहे. दीर्घकाळासोबत आवश्यक आहे की प्रयत्न हे सतत करत राहावे. म्हणजेच प्रयत्नांमध्ये सातत्य असावे. जर प्रयत्नांमध्ये खंडता निर्माण होत राहिली तर कार्यसिद्धी पूर्णत्वास नेण्यास अडचण निर्माण होईल. याव्यतिरिक्त सत्कार किंवा श्रद्धेची भावना असावी. ज्या कार्यामध्ये श्रद्धेची भावना नसते ते कार्य योग्यरीत्या पूर्ण होत नाही. जे कार्य आम्ही संपादित करणार त्यामध्ये सेवाभाव असावा. जे कार्य दुसऱ्यांच्या हिताकरिता नि:स्वार्थ भावनेने केले जाते ते कार्य महान म्हणून संबोधले जाते़ सरतेशेवटी भगवान पतंजली यांचे म्हणणे आहे की, अशा प्रकारे जे कार्य संपादित होते त्या कार्याची आधारशीला दृढ (पक्की) असते, तसेच ती सिद्ध होत असते. भगवान पतंजली यांचे हे सूत्र महाव्यवस्थापनाचे महाकाव्य होय.

टॅग्स :Yogaयोगspiritualअध्यात्मिक