शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

सर्वपित्री अमावास्येला तर्पण, पिंडदानाचे हे आहे महत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 07:57 IST

Sarva Pitru Amavasya : पितृपक्षात पितृलोकांतून सर्व पितर पृथ्वीवर येतात व आपले वंशज आपल्यासाठी काय करतात, हे पाहतात, असे आपल्याकडे समजतात.

पितृपक्षात पितृलोकांतून सर्व पितर पृथ्वीवर येतात व आपले वंशज आपल्यासाठी काय करतात, हे पाहतात, असे आपल्याकडे समजतात. संपूर्णवर्षभरात तसेच पितृपक्षात जे कुणी आपल्या पितरांचे श्राद्ध घालू शकले नाहीत, ज्या मृतांची नक्की तिथी माहीत नाही किंवा आजारपण, बदली, दौरे अशाअनेक कारणांमुळे जे कुणी पितरांचे श्राद्ध करू शकलेले नाहीत. ते सर्वजण सर्वपित्री अमावास्येला श्राद्ध करून पितरांच्या ऋणातून उतराई होऊ शकतात व त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करू शकतात. सर्वपित्री अमावास्येला एवढे महत्त्व का प्राप्त झाले, याची पौराणिक कथा जाणून घेऊ या-

श्रेष्ठ पितृ अग्निष्वात व बर्हिषपद यांची मानसकन्या अक्षोदा हिने घोर तपश्चर्या केली. देवतांच्या एक हजार वर्षांपर्यंत ती तप करीत होती.तिच्या तेजाने पितृलोकही प्रकाशमान झाला. त्यामुळे अक्षोदावर सर्व श्रेष्ठ पितृगण प्रसन्न झाले व तिला वर माग म्हणाले. तिचे त्यांच्याबोलण्याकडे लक्ष नव्हते. ती तेथील तेजस्वी पितृ अमावसु यांना न्याहाळत होती. तिने वरच मागितला की, मी आपल्याबरोबर राहण्याचा आनंद उपभोगूइच्छिते.

तिच्या या वक्तव्याने सर्व पितृ संतप्त झाले व त्यांनी तिला शाप दिला की, ती पितृ लोकांतून पतित होऊन पृथ्वीवर जाईल. या शापानंतर ती गयावया करूलागली. त्यामुळे तिला उ:शाप दिला. आपले तेज व सौंदर्याने स्वर्गातील अप्सरांनाही फिके पाडणा-या अक्षोदाचा प्रस्ताव नाकारणारे अमावसु यांची नंतर सर्व पितरांनी प्रशंसा केली व त्यांना वरदान दिले. सर्व पितृगण म्हणाले, हे अमावसु, तुम्ही तुमचे मन भटकू दिले नाही. त्यामुळे आजपासून या तिथीला अमावसु हे नाव देत आहोत. जो कोणी मनुष्य वर्षभर कधीच श्राद्ध-तर्पण करणार नाही, करू शकणार नाही, त्याने या तिथीला श्राद्ध केले तर सर्व तिथींना त्याने श्राद्ध केल्याचे फळ प्राप्त होईल. तेव्हापासून आजच्या या तिथीला सर्वपित्री अमावास्या असे नामाभिधान प्राप्त झाले. त्यामुळे सर्व पितरांचे श्राद्ध करण्यासाठी ही तिथी महापुण्यदायक मानली गेली आहे.

गजच्छाया योग

हंसे करस्थिते या तु अमावास्या करान्वितासा ज्ञेया कुंजरच्छाया इति बौधायनोब्रवीत

अर्थ : सूर्य हस्त नक्षत्रात असताना अमावास्या आली व त्या दिवशी चंद्रही हस्त नक्षत्रात असेल तर त्याला गजच्छाया योग म्हणतात. हा भाद्रपद कृष्णअमावास्येलाच येऊ शकतो.

यंदा २०१८ साली गजच्छाया योग आला आहे. त्यामुळे या वर्षीच्या सर्वपित्री अमावास्येला पितरांच्या नावाने पिंडदान, तर्पण करणे महापुण्यदायक असणारआहे.

पितृ पक्षात कोणा-कोणाचे स्मरण होते?

पितृपक्षात एका व्यक्तीने श्राद्ध केले असता ती व्यक्ती सात गोत्रांतील आपल्या संबंधितांचा उद्धार करतो, असे समजले जाते. श्राद्ध करणारा व्यक्तीहा त्याचे वडील, आजोबा, पणजोबा तसेच आई, आजी, पणजी यांच्या नावाने पिंडदान, तर्पण करतो. त्याचबरोबर आईचे वडील, आजोबा, पणजोबा, आईची आई, आजी, पणजी यांचाही या श्राद्धात उल्लेख येतो. त्याचप्रमाणे पत्नी, मुलगा, मुलगी, बंधू, भगिनी, काका, मामा, आत्या, मावशी, मोक्षगुरू, पितागुरू यापैैकी जे मृत झाले असतील त्यांचेही तो स्मरण करीत असतो. एवढेच नव्हे तर त्याचे मित्र, उपकारकर्ते, जगात ज्यांना कोणी वारस नाही, ज्यांना कोणी पिंडदान, तर्पण करायला नाही, करीत नाही, त्यांच्यासाठीही तो धर्मकार्य करीत असतो. त्यामुळे ज्याने वर्षभर किंवा पितृपक्षात पितरांसाठी काहीहीकेले नाही, त्याने केवळ सर्वपित्री अमावास्येलाच श्राद्ध केले तरी पितर तृप्त होतात.- संकलन : सुमंत अयाचित

टॅग्स :spiritualअध्यात्मिक