शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

मन:शक्ती मजबूत झाल्यास अनेक बदल शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 06:39 IST

शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी मनाचे आरोग्य फार महत्त्वाचे आहे. आरोग्यप्राप्तीसाठी मनाची अवस्था सांभाळणे महत्त्वाचे आहे.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी मनाचे आरोग्य फार महत्त्वाचे आहे. आरोग्यप्राप्तीसाठी मनाची अवस्था सांभाळणे महत्त्वाचे आहे. मनावरच ध्यान, योग, आसन, प्राणायाम व नंतर योगाची प्राप्ती अवलंबून आहे. कारण मनानुसार भावनिक, बौद्धिक, आध्यात्मिक स्तरावरची प्रक्रिया ठरत असते. मनाची एक शक्ती आपल्या आतल्या-बाहेरच्या क्रिया करायला भाग पाडते. आपल्या श्वासोच्छ्वासावरही त्याचा परिणाम होतो. मनाला विश्रांती किंवा शिस्तबद्धपणा लावावयाचा असेल तर भावनेवर नियंत्रण ठेवता यावे. जर भावनेवर नियंत्रण ठेवता आले नाही तर आपल्या हातून काहीही कृत्य घडू शकते. शरीरातील पचनसंस्था, श्वसनसंस्था, मज्जासंस्थेवरही त्याचा परिणाम होत असतो. मन वेगवेगळ्या स्थितीला जाऊन पोहोचते. तेव्हा त्याचा शरीरावर परिणाम होत असतोच! म्हणून आपण आपल्या शरीरावर व मनावर नियंत्रण आणू इच्छित असाल तर आध्यात्मिक मार्गाने जाणे सोयीचे ठरेल. आध्यात्मिक मार्गाने गेल्यास आपल्या आपण मनाला सुदृढ करू शकतो. आपल्यातला न्यूनगंड कमी करू शकतो. आत्मविश्वासाला बळकटी आणता येते. विश्वचैतन्याच्या लहरींशी एकत्र होता येते. मग आत्मस्फूर्ती निर्माण होते. हळूहळू क्रियात्मक बदल घडू लागतात. वेगवेगळ्या स्थितीमध्ये शरीरात व मनात परिवर्तन होते. त्याच्या प्रत्येक कृतीत लय व चैतन्य असते. त्यामुळे जीवनात सतर्कता येते, एक नवीन दृष्टी मिळते. चैतन्याकडे लक्ष केंद्रित होते. यासाठीच मनावर नियंत्रण मिळवले पाहिजे. कारण त्यामुळे स्वास्थपूर्ण जीवन जगता येते. मानसिक आरोग्य स्थिर राहाते. जीवनशैली बदलते. तुमचे जीवन सुखी व आनंदी राहाते. रोगप्रतिकारक शक्ती मनावरच अवलंबून असते. मन:शक्ती मजबूत असली की स्वत:मध्ये अनेक बदल घडवू शकतो. मनातील वाईट विचारांचा नाश करून मनाला चांगल्या विचारांची सवय लागते. त्यामुळे माणसांनी अध्यात्माचा आश्रय घ्यावा. अध्यात्माशिवाय आत्मिक उन्नती नाही. आत्मिक उन्नतीशिवाय जीवन सुखी बनू शकत नाही. त्यामुळे अध्यात्माशी एकरूप होऊन मनावर नियंत्रण मिळवा व सुखी संसाराचा मार्ग अवलंबावा.(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष आहेत)

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक