शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

मन:शक्ती मजबूत झाल्यास अनेक बदल शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 06:39 IST

शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी मनाचे आरोग्य फार महत्त्वाचे आहे. आरोग्यप्राप्तीसाठी मनाची अवस्था सांभाळणे महत्त्वाचे आहे.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी मनाचे आरोग्य फार महत्त्वाचे आहे. आरोग्यप्राप्तीसाठी मनाची अवस्था सांभाळणे महत्त्वाचे आहे. मनावरच ध्यान, योग, आसन, प्राणायाम व नंतर योगाची प्राप्ती अवलंबून आहे. कारण मनानुसार भावनिक, बौद्धिक, आध्यात्मिक स्तरावरची प्रक्रिया ठरत असते. मनाची एक शक्ती आपल्या आतल्या-बाहेरच्या क्रिया करायला भाग पाडते. आपल्या श्वासोच्छ्वासावरही त्याचा परिणाम होतो. मनाला विश्रांती किंवा शिस्तबद्धपणा लावावयाचा असेल तर भावनेवर नियंत्रण ठेवता यावे. जर भावनेवर नियंत्रण ठेवता आले नाही तर आपल्या हातून काहीही कृत्य घडू शकते. शरीरातील पचनसंस्था, श्वसनसंस्था, मज्जासंस्थेवरही त्याचा परिणाम होत असतो. मन वेगवेगळ्या स्थितीला जाऊन पोहोचते. तेव्हा त्याचा शरीरावर परिणाम होत असतोच! म्हणून आपण आपल्या शरीरावर व मनावर नियंत्रण आणू इच्छित असाल तर आध्यात्मिक मार्गाने जाणे सोयीचे ठरेल. आध्यात्मिक मार्गाने गेल्यास आपल्या आपण मनाला सुदृढ करू शकतो. आपल्यातला न्यूनगंड कमी करू शकतो. आत्मविश्वासाला बळकटी आणता येते. विश्वचैतन्याच्या लहरींशी एकत्र होता येते. मग आत्मस्फूर्ती निर्माण होते. हळूहळू क्रियात्मक बदल घडू लागतात. वेगवेगळ्या स्थितीमध्ये शरीरात व मनात परिवर्तन होते. त्याच्या प्रत्येक कृतीत लय व चैतन्य असते. त्यामुळे जीवनात सतर्कता येते, एक नवीन दृष्टी मिळते. चैतन्याकडे लक्ष केंद्रित होते. यासाठीच मनावर नियंत्रण मिळवले पाहिजे. कारण त्यामुळे स्वास्थपूर्ण जीवन जगता येते. मानसिक आरोग्य स्थिर राहाते. जीवनशैली बदलते. तुमचे जीवन सुखी व आनंदी राहाते. रोगप्रतिकारक शक्ती मनावरच अवलंबून असते. मन:शक्ती मजबूत असली की स्वत:मध्ये अनेक बदल घडवू शकतो. मनातील वाईट विचारांचा नाश करून मनाला चांगल्या विचारांची सवय लागते. त्यामुळे माणसांनी अध्यात्माचा आश्रय घ्यावा. अध्यात्माशिवाय आत्मिक उन्नती नाही. आत्मिक उन्नतीशिवाय जीवन सुखी बनू शकत नाही. त्यामुळे अध्यात्माशी एकरूप होऊन मनावर नियंत्रण मिळवा व सुखी संसाराचा मार्ग अवलंबावा.(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष आहेत)

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक