शहरं
Join us  
Trending Stories
1
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
2
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
3
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
4
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
5
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
6
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
7
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
8
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
9
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
10
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
11
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
12
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
13
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
14
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
15
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
16
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
17
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
18
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
19
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
20
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
Daily Top 2Weekly Top 5

जर प्रपंच मिथ्या आहे तर तो आम्हाला सत्य का भासतो..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 13:49 IST

हा प्रपंच मिथ्या आहे. मिथ्या या शब्दाचा अर्थ तुम्ही त्याला जसे समजता तसा तो नाही. आम्हाला तो सत्य भासतो पण तो सत्य नाही.

- हभप भरतबुवा रामदासी (बीड)

संसारसिंधू तरुन जाण्यासाठी विचार तरी कोणता करावयाचा..? विचार आणि भवसिंधू याचा संबंध तरी कोणता..? तर या प्रश्नाचे उत्तर असे की,

अगा जे झालेचि नाही । तयाची वार्ता पुससी कायी ॥

हा प्रपंच मिथ्या आहे. मिथ्या या शब्दाचा अर्थ तुम्ही त्याला जसे समजता तसा तो नाही. आम्हाला तो सत्य भासतो पण तो सत्य नाही. संतश्रेष्ठ एकनाथ महाराज म्हणतात -

प्रपंच एक झाला होता । हेंच समूळचि मिथ्या वार्ता ॥पुढे होईल मागुता । हे कल्पांतीहि घडे ना ॥

जर प्रपंच मिथ्या आहे तर तो आम्हाला सत्य का भासतो..?तर संत म्हणतात -

रज्जू सर्पाकार भासीयेले जगडंबर ।

दोरीच्या ठिकाणी भासणारा साप नाहीसा होण्यासाठी तो साप काठीने मारावा लागतो का..? अहो.! त्याला मारण्यासाठी प्रकाशाची उपस्थिती पुरे..! एकदा का प्रकाश त्याठिकाणी निर्माण झाला की तिथे साप नाहीच हे कळते. त्याप्रमाणे क्षणोक्षणी विचार केला की भवसिंधुतून सहज तरुन जाता येते कारण जन्म आणि मरण हे नाहीच याचे ज्ञान होते.

एका सज्जन माणसाचा भूत, प्रेत, पिशाच्च यावर मुळीच विश्वास नव्हता. त्याचे धैर्य पाहण्याकरिता एका सज्जन माणसाने एकदा त्याच्याबरोबर पैज लावली. अमावास्येच्या दिवशी रात्री बारा वाजता स्मशानभूमीत जाऊन तू जर त्याठिकाणी लाकडाची खुंटी ठोकून आला तर आम्ही तुला खरंच निर्भय समजू..! ठरलं..! हा एकटाच स्मशानभूमीत निघाला पण जाताना पिशाच्चाची कल्पना डोक्यात शिरली, कसातरी स्मशानात पोचला, खुंटी ठोकली व निघतांना त्याचे धोतर त्याच खुंटीला अडकले. तो पळून जाण्याचा प्रयत्न करणार तोच तोंडावर पडला. आपल्याला पिशाच्चाने झडपले या विचाराने तो बेशुद्ध पडला. बराच वेळ झाला तरी हा परत कसा येईना..? म्हणून त्याचा मित्र दिवा घेऊन स्मशानात गेला. त्याला सावध केले व खुंटीला अडकलेले धोतर दाखवले. त्याबरोबर त्याची भीती दूर पळाली. भीती नाहिशी होऊन तो पूर्वस्थितीवर आला. यावरुन विचार हाच बंधनाला कारण आहे हे सिद्ध होते. विचारानेच बंधन व विचारानेच मुक्त होता येते म्हणून तुकाराम महाराज म्हणतात -

केला पाहिजे विचार । मन मित्र दावेदार ॥

खरं तर विचार तरी कोणता करावा..? आपण पुढील लेखात याचे चिंतन करू..?

 

( लेखक राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांच्या भ्रमणध्वनी ९४२१३४४९६० ) 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक