शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
4
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
5
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
6
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
7
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
8
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
9
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
10
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
11
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
12
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
13
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
14
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
15
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
16
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
17
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
18
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
19
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
20
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

सगुणाची ओळख

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 00:43 IST

- प्रा. शिवाजीराव भुकेले संत चळवळीला हे पूर्णपणे ठाऊक आहे की, निर्गुणाला धक्का न लावता सगुणाची यथार्थ ओळख करून घेता ...

- प्रा. शिवाजीराव भुकेले

संत चळवळीला हे पूर्णपणे ठाऊक आहे की, निर्गुणाला धक्का न लावता सगुणाची यथार्थ ओळख करून घेता येते. अर्थात सगुणा-निर्गुणातील भावनेचे प्रामाणिक प्रकटीकरणही महाराष्ट्रातील संत चळवळीची संपूर्ण देशाला मिळालेली खरी आध्यात्मिक देणगी आहे, असे आज आधुनिक बुद्धिवंतही मानू लागले आहेत. समाजाची जडत्वाची अवस्था नष्ट होऊन त्यात एक चैतन्य संचारले पाहिजे. त्यासाठी संतांनी त्याला नावारूपाला आणले. एवढेच नव्हेतर त्याच्या सगुण रूपाच्या भोवती आपल्या प्रतिभेचे असे आंगडे-टोपरे शिवले आहे की, कधी तो माझे आघडे-बघडे-छकुडे वाटू लागतो, तर कधी पंढरीनिवासा सखा वाटू लागतो. कधी-कधी संत विठाई-किताई कृष्णाई, कान्हाई या अर्थभावनेने त्याला साद घालू लागतात. जनाबाईला तर तो आपले आईवडील, बंधू आणि सर्वांत जवळचा मित्र वाटतो. संतांच्या या प्रयत्नांमुळे भक्तीच्या मर्यादित क्षेत्रात का असेना, एक आत्मजाणीवेची पहाट निर्माण झाली. परमेश्वराच्या सगुण-निर्गुणातीत भक्तिभावनेला महत्त्व देणारे भक्तांचे शिरोमणी संत ज्ञानेश्वर महाराज एका अभंगात म्हणतात,।। मलया निळ शीत निळू, पालवी नये गाळूसुमनाचा परिमळू गुंफिता नयेपैसा झाला सर्वेश्वरू, म्हणू नये साना थोरूत्याच्या स्वरूपाचा निर्धारू कवन जाणे।।मलयेगिरीवरून वाहणाऱ्या सुगंधी वाºयाला कधी गाळून घेता येत नाही. फुले गुंफून त्याची सुंदर माळ तयार करता येईल; पण फुलांचा सुगंध गुंफता येत नाही. मोत्याचे पाणी रांजणात भरता येत नाही आणि गगनाला गवसणी घालता येत नाही, तशीच आहे परमेश्वरी शक्ती.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक