शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

माझा नवा जन्म झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 05:19 IST

१ सप्टेंबर १९५५ रोजी सत्यनारायण गोएंका शिबिरात सहभागी झाले़ निवासस्थान मिळाल्यानंतर ते सयाजी उ बा खिन यांना भेटायला गेले़ ...

१ सप्टेंबर १९५५ रोजी सत्यनारायण गोएंका शिबिरात सहभागी झाले़ निवासस्थान मिळाल्यानंतर ते सयाजी उ बा खिन यांना भेटायला गेले़ तेथे त्यांना लहानशी पुस्तिका मिळाली़ त्यात कालामसुत्ताचे बोल होते़ त्यात लिहिले होते की, तुम्ही कोणतीही गोष्ट अशासाठी ग्रहण करू नका की, तिला आम्ही असे ऐकत आलो आहोत़ यासाठी ग्रहण करू नका की, ही आमची परंपरागत मान्यता आहे आणि पिढ्यान् पिढ्या चालत आलेली आहे़ यासाठीसुद्धा ग्रहण करू नका की, ही आमच्या धर्मग्रंथानुकूल आहे़

यासाठीसुद्धा ग्रहण करू नका की, ही तर्कसंगत आणि न्यायसंगत आहे़ यासाठीसुद्धा ग्रहण करू नका की, आम्ही या मान्यतेशी आसक्त झालो आहोत़ यासाठीसुद्धा ग्रहण करू नका की, हिच्या उपदेशकाचे व्यक्तित्व भव्य आहे़ यासाठीसुद्धा ग्रहण करू नका की, हिचा उपदेशक श्रमण आमचा गुरू आहे़ आम्हाला पूजनीय आहे़ जेव्हा तुम्ही स्वानुभूतीने जाणाल की हा धर्म उपदेश कुशल करणारा आहे़ निर्दोष आहे़ अनुभवी आणि समजदार लोकांनीप्रशंसित केला आहे़ स्वानुभूतीने जाणा की, संपूर्णपणे ग्रहण केल्याने तो सर्व हितकारी आहे, सुखकारी आहे़ तेव्हाच त्याला ग्रहण करून जीवनात उतरावा़ त्याच वेळी सयाजी उ बा खिन यांनी गोएंका यांना सांगितले की, भगवान गौतम बुद्ध यांचे व्यक्तिमत्त्व भव्य आणि पूज्य असूनही त्यांनी आपला उपदेश अंधविश्वासाने ग्रहण करण्यास मनाई केली़ म्हणून मी जे शिकवेन तेही अंधविश्वासाने ग्रहण करू नका़

जेव्हा तुम्ही स्वानुभूतीने स्वत: पाहाल की तो उपदेश पूर्णपणे कल्याणकारी आहे, तरच ग्रहण करा आणि त्याला आपल्या जीवनात उतरवा़ बुद्धांच्या उपदेशाला स्वानुभूतीवर उतरविण्यासाठी तुम्ही येथे आला आहात़ सयाजी उ बा खिन यांच्याशी बोलणे झाल्यानंतर गोएंका दहा दिवसीय विपश्यना शिबिरात सहभागी झाले़ या कल्याणकारी विधीने अविद्येचे आवरण तोडून मला दुसरा जन्म दिला, अशी गोएंका यांची भावना शिबिरानंतर होती़फरेदुन भुजवाला