शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

भजन

By admin | Updated: September 10, 2016 12:46 IST

जगद्गुरु तुकोबाराय अत्यंत स्पष्टपणे सांगतात की, मानव जीवनामध्ये भजन हेच सर्वश्रेष्ठ ध्येय आहे. जीवनामध्ये जे काही थोरपण आह ते मुळीच उपयोगाचे नाही

डॉ. बाळासाहेब गरुड, ठाकूरबुवा ‘‘तुका म्हणे येथे भजन प्रमाण । काय थोरपण जाळावे ते ।।’’जगद्गुरु तुकोबाराय अत्यंत स्पष्टपणे सांगतात की, मानव जीवनामध्ये भजन हेच सर्वश्रेष्ठ ध्येय आहे. जीवनामध्ये जे काही थोरपण आह ते मुळीच उपयोगाचे नाही. कारण ईश्वराने हा उत्कृष्ट असा मानव देह भजनासाठीच दिलेला आहे. ‘देवे दिला देह भजना गोमटा ।।’ मानवालादेवाने सर्वोकृष्ट अशी वाणी दिलेली आहे. मानवाची वाणी विचार प्रधान तर आहेच त्याबरोबर या वाणीने भावही प्रगट करता येतो. भगवंताला जोडण्याचे सहज साधन हे वाणीच आहे. ‘‘पवित्र तो देह वाणी पुष्यवंत । जो वदे अच्च्युत सर्वकाळ ।।’’ ‘‘भावे गावे गीत । शुध्द करुनिया चित्त ।। तुज व्हावा आहे देव । तरि हा सुलभ उपाव ।।’’ ईवरप्राप्तीचे सुलभ साधन असेल तर ते भजनच आहे. वारकरी संप्रदायाचे सर्वच वाड्मय गेय स्वरुपात निर्माण केलेले आहे. गायनामध्ये मनुष्य सहज रंगला जातो, रममाण होतो आणि त्याचे चित्त भगवंताशी एकाग्र होते. म्हणूनच सर्व संतांच्या रचना काव्य स्वरुपात आहेत आणि त्या गेय आहेत. संत तुकोबाराय म्हणतात ‘‘ गायनाचे रंगी । शक्ति अभ्दूत हे अंगी ।।’’ गायनामध्ये अभ्द्त शक्ती आहे याचाच अर्थ गायनाद्वारे सहज भगभ्दाव प्रकट होतो तसेच गेय वाड्मय पाठांतरासाठी सुलभ बनते. संत वाड्मय हे मंत्रग्रंथ आहेत, म्हणून त्याचे पारायण व पाठांतर आवश्यक आहे. काव्याचे पारायणही सोपे जाते आणि या भजनाद्वारे हरिनाम साधना घडते. कुठल्याही ग्रंथाचे पारायण करणे किंवा साग्रसंगीत भजन करणे हे नामचिंतनच आहे. कारण सर्व ग्रंथ अंतिमरित्या आपणास त्या परमेश्वराच्या नामालाच जोडू इच्छितात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात ‘‘देखैं मनुष्य जात सकळ । हे स्वभावता भजनशील । पार्था जालेचि असे केवळ । माझा ठाई ।।’’ यामध्ये मानवाला त्याच्या मूळ स्वभावाची आठवण करुन दिली आहे आणि सूचित केले आहे की, मानवी जीवनाची मांडणी भगवभ्दजनावरच आहे.