शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

याला विकासाची वाट म्हणावी की विनाशाची?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 03:59 IST

अतिवेगाने प्रवास करण्याच्या वेडापायी सर्वत्र सिमेंटचेच रस्ते विनाशासाठी सज्ज आहेत. याला विकास म्हणावा की हट्टीपणा?

- विजयराज बोधनकरएकदा एका गावात वेगळ्या पद्धतीने आधुनिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावयाचा होता. गणेश चतुर्थीच्या दिवशी गावात वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण करायचे होते. परंतु अडचण अशी निर्माण झाली की गावात झाडे लावण्यासाठी जमीनच शिल्लक नव्हती. विकासाच्या नावावर मातीच्या देहावर सिमेंटचे पक्के झाकण लावून तिला मुकी-बहिरी, आंधळी केली होती. शेकडो वर्षांपासून आपला मातीशी ऋणानुबंध आहे. मातीत खेळत अनेक पिढ्या लहानाच्या मोठ्या झाल्यात. पावसाळा व हिवाळ्यात गावातल्या रस्त्याच्या दुतर्फा गवत आणि अन्य वनस्पती उगविण्याचे आता पूर्णपणे बंद झाले आहे. थंडावा देणारी मातीची घरे पाडून तिथे निर्जीव सिमेंटची टोलेजंग घरे गावातही उभी राहू लागली आहेत.खरेतर, माती आणि माता या दोन्ही जन्मदात्या; पण या दोघींनाही ग्रहण लागले. मातेची मम्मी झाली आणि मातीला सिमेंटची जेल झाली. शहरात तर माती अंगावरच्या तिळाइतकी शिल्लक आहे. निसर्गाच्या मूलभूत घटकांचीच मानवाला अडचण होऊ लागली. आपल्या संस्कृतीत पंचमहाभूते म्हणजेच पृथ्वी, जल, अग्नी, हवा आणि अवकाश हे केंद्रस्थानी आहे. पावसाचे पाणी मातीत मुरले जाऊन विहिरीच्या झऱ्यातून शुद्धीकरण होऊन पिण्याच्या कामी यायचे. मातीत मुरलेल्या पाण्यामुळे शेती व आजूबाजूचे शिवार हिरवेगार राहून उत्तम प्राणवायूचा पुरवठा होत राहायचा. डोंगरदऱ्यांत पडलेले पावसाचे पाणी सतत नदी-नाल्यांतून वाहत राहायचे. आज मानवी स्वार्थापायी डोंगरच्या डोंगर उद्ध्वस्त होताना दिसताहेत, तिथे पाऊस तरी कसा कोसळणार? त्याचमुळे पृथ्वीवरच्या उष्णतेने उच्चांक गाठला आहे. बारमाही थंड असलेली गावे आता आग ओकू लागली आहेत. अतिवेगाने प्रवास करण्याच्या वेडापायी सर्वत्र सिमेंटचेच रस्ते विनाशासाठी सज्ज आहेत. याला विकास म्हणावा की हट्टीपणा?

टॅग्स :spiritualअध्यात्मिक