शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

तणावमुक्त कसे जगावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 04:17 IST

निर्णयाची घाई असावी, पण घाईचा निर्णय नसावा. कारण काही निर्णय नियतीवर सोपवावेत.

- स.भ. मोहनबुवा रामदासीहल्ली आपण पाहतो लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत ताणतणाव (२३१ी२२) आलेला जाणवतो. ताणतणाव आल्यावर हे जाणवतं, पण ताणतणाव येऊच नये यासाठीचे आपले प्रयत्न नेहमीच कमी पडतात. ताणतणावाची अनेक कारणं आहेत.१. अपेक्षांचा डोंगर वाढला : माझं आहे त्यापेक्षा झटपट श्रीमंती आणि प्रॉपर्टीची जबरदस्त लालसा मनात निर्माण झालेली मला पाहायला मिळते.२. स्पर्धा : माझ्यापेक्षा श्रीमंत दुसरा असूच शकत नाही किंवा असणार नाही, यावर खूप ताणतणाव निर्माण होतो. मला मिळालं नाही तरी चालेल, पण दुसऱ्याला मिळू नये, ही ईर्षा प्रचंड ताणतणाव निर्माण करते.३. कर्जबाजारी : ही व्यक्ती प्रचंड तणावग्रस्त असते. वैरीसुद्धा विचार करणार नाही, एवढे तणावग्रस्त विचार ते करतात. दैनंदिन व्यवहाराची नियमावली, आवश्यक ते व तेवढं खर्चावर नियंत्रण ठेवून पैसा आला तरी गरजेपुरता वापरून साधी राहणी स्वीकारली, तर कर्जाचा बोजा कमी होईल. चारशे वर्षांपूर्वी समर्थांनी हा विचार मांडला.मेळविती तितुके भक्षिती।ते कठीण काळी मरोन जाती।दीर्घ सूचनेने वर्तती। तेचि भले।।हा विचार करून ताणतणावातून बाहेर पडण्यासाठी निश्चितच मदत होते. मी व माझं हा विचार ताणतणावाला वाढवितो. म्हणून समर्थांच्या वचनाप्रमाणे आचरण ठेवावे.आहे तितुके देवाचे।ऐसे वर्तणे निश्चयाचे।मूळ तुटे उद्वेगाचे। येणे रीती।।निर्णयाची घाई असावी, पण घाईचा निर्णय नसावा. कारण काही निर्णय नियतीवर सोपवावेत. आपला रिमोट सद्गुरूंच्या हाती सोपवावा म्हणजे ताणतणावातून बाहेर पडण्यास मदत होते. संस्कारक्षम जीवन, संतुलित आहार व शांत निद्रा या तीन गोष्टी अत्यावश्यक आहेत.