शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

अध्यात्मिक विचारांनी वाईट विचारांचा नाश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 8:45 AM

मन कधी चांगल्या विचारांची कल्पना करते, तर कधी वाईट. या दोन्ही कल्पना मनाला स्थिर बनू देत नाहीत. वाईट गोष्टींचे चिंतन करू न देणे महत्त्वाचे आहे. कारण वाईट विचार मनात आल्यास त्यांना रोखण्यासाठी अध्यात्मिक विचारांचे चिंतन करावे.

- तुळशीराम गुट्टे महाराज

मन कधी चांगल्या विचारांची कल्पना करते, तर कधी वाईट. या दोन्ही कल्पना मनाला स्थिर बनू देत नाहीत. वाईट गोष्टींचे चिंतन करू न देणे महत्त्वाचे आहे. कारण वाईट विचार मनात आल्यास त्यांना रोखण्यासाठी अध्यात्मिक विचारांचे चिंतन करावे. अध्यामिक विचारांचे चिंतन केल्याने वाईट विचारांचा आकार बदलत जातो. माणसांच्या मानसिक व भावनात्मक गोष्टींमुळे मनात परिवर्तन होते. आपणच आपल्याला मानसिकदृष्ट्या सुदृढ ठेवण्यासाठी सकारात्मक गोष्टींचा विचार केला पाहिजे. सकारात्मकता आपल्या जीवनात संतुलन निर्माण करते. मनाला प्रलोभनाकडे भटकू देत नाही. आपल्या मनाचे लक्ष ईशतत्त्वाकडे किंवा कोणत्यातरी दिव्यत्वाचे चिंतन करण्याकडे धावले पाहिजे. मग आपले मन वाईट विचारांना प्रतिबंध करते. आपल्याला मोहात पाडणाऱ्या विषयाला दूर सारून मग ईश्वराकडे ते मन बोलते. मनाला मोहित करणाऱ्या विषयांप्रति घृणा व किळस निर्माण होते. म्हणून साधकांनी किंवा सात्त्विक वृत्तीच्या माणसांनी ध्यानाचा अभ्यास करावा. कारण ध्यानाने मनात सात्त्विकता निर्माण होते. आत्मिक ऊर्जास्पंदने निर्माण होतात. त्यातून वाईट विचारांवर मात होते. मनाची चाललेली ओढाताण थांबते. साधकांनी मनाला आवर घालावा. यासाठी योग-ध्यान या मार्गाचा अवलंब करावा. कारण मनामध्ये चाललेल्या प्रचंड गोंधळाला शांत करावे. यासाठी महत्त्वाचा उपाय ध्यानधारणा सांगितला आहे.

मानसशास्त्राच्या सिद्धांतानुसार ज्या गोष्टीचा परिणाम शरीरावर होतो, तिचाच मनावरही होतो. कारण शरीरापेक्षा मनावर होणारा परिणाम अधिकपटीने जास्त होतो. आजकाल चिडचिड करणारे माणसं जास्त दिसून येतात. कारण सर्वत्र अशांतता, द्वेष, मत्सर जाणवतो. ही लक्षणे दुर्बल मनाची आहेत. म्हणून म्हणावेसे वाटते, मनाला सुदृढ स्थितीत ठेवायचे असेल तर ध्यान साधना करा. ध्यानाने मग परिपक्व होते. सकारात्मकता निर्माण करण्यासाठी ध्यानाचा उपयोग होतो. सकारात्मकता निर्माण झाली की नकारात्मकता नष्ट होते. मग वाईट विचार नष्ट होतात. मन सुदृढ होते. मग शारीरिक, मानसिक धोका उद्भवू शकत नाही. मग आपल्याच मनावर आपले नियंत्रण राहाते.

(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशन चे अध्यक्ष आहेत.)

 

टॅग्स :spiritualअध्यात्मिक