शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

अध्यात्मिक विचारांनी वाईट विचारांचा नाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 09:03 IST

मन कधी चांगल्या विचारांची कल्पना करते, तर कधी वाईट. या दोन्ही कल्पना मनाला स्थिर बनू देत नाहीत. वाईट गोष्टींचे चिंतन करू न देणे महत्त्वाचे आहे. कारण वाईट विचार मनात आल्यास त्यांना रोखण्यासाठी अध्यात्मिक विचारांचे चिंतन करावे.

- तुळशीराम गुट्टे महाराज

मन कधी चांगल्या विचारांची कल्पना करते, तर कधी वाईट. या दोन्ही कल्पना मनाला स्थिर बनू देत नाहीत. वाईट गोष्टींचे चिंतन करू न देणे महत्त्वाचे आहे. कारण वाईट विचार मनात आल्यास त्यांना रोखण्यासाठी अध्यात्मिक विचारांचे चिंतन करावे. अध्यामिक विचारांचे चिंतन केल्याने वाईट विचारांचा आकार बदलत जातो. माणसांच्या मानसिक व भावनात्मक गोष्टींमुळे मनात परिवर्तन होते. आपणच आपल्याला मानसिकदृष्ट्या सुदृढ ठेवण्यासाठी सकारात्मक गोष्टींचा विचार केला पाहिजे. सकारात्मकता आपल्या जीवनात संतुलन निर्माण करते. मनाला प्रलोभनाकडे भटकू देत नाही. आपल्या मनाचे लक्ष ईशतत्त्वाकडे किंवा कोणत्यातरी दिव्यत्वाचे चिंतन करण्याकडे धावले पाहिजे. मग आपले मन वाईट विचारांना प्रतिबंध करते. आपल्याला मोहात पाडणाऱ्या विषयाला दूर सारून मग ईश्वराकडे ते मन बोलते. मनाला मोहित करणाऱ्या विषयांप्रति घृणा व किळस निर्माण होते. म्हणून साधकांनी किंवा सात्त्विक वृत्तीच्या माणसांनी ध्यानाचा अभ्यास करावा. कारण ध्यानाने मनात सात्त्विकता निर्माण होते. आत्मिक ऊर्जास्पंदने निर्माण होतात. त्यातून वाईट विचारांवर मात होते. मनाची चाललेली ओढाताण थांबते. साधकांनी मनाला आवर घालावा. यासाठी योग-ध्यान या मार्गाचा अवलंब करावा. कारण मनामध्ये चाललेल्या प्रचंड गोंधळाला शांत करावे. यासाठी महत्त्वाचा उपाय ध्यानधारणा सांगितला आहे.

मानसशास्त्राच्या सिद्धांतानुसार ज्या गोष्टीचा परिणाम शरीरावर होतो, तिचाच मनावरही होतो. कारण शरीरापेक्षा मनावर होणारा परिणाम अधिकपटीने जास्त होतो. आजकाल चिडचिड करणारे माणसं जास्त दिसून येतात. कारण सर्वत्र अशांतता, द्वेष, मत्सर जाणवतो. ही लक्षणे दुर्बल मनाची आहेत. म्हणून म्हणावेसे वाटते, मनाला सुदृढ स्थितीत ठेवायचे असेल तर ध्यान साधना करा. ध्यानाने मग परिपक्व होते. सकारात्मकता निर्माण करण्यासाठी ध्यानाचा उपयोग होतो. सकारात्मकता निर्माण झाली की नकारात्मकता नष्ट होते. मग वाईट विचार नष्ट होतात. मन सुदृढ होते. मग शारीरिक, मानसिक धोका उद्भवू शकत नाही. मग आपल्याच मनावर आपले नियंत्रण राहाते.

(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशन चे अध्यक्ष आहेत.)

 

टॅग्स :spiritualअध्यात्मिक