शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

अध्यात्मिक विचारांनी वाईट विचारांचा नाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 09:03 IST

मन कधी चांगल्या विचारांची कल्पना करते, तर कधी वाईट. या दोन्ही कल्पना मनाला स्थिर बनू देत नाहीत. वाईट गोष्टींचे चिंतन करू न देणे महत्त्वाचे आहे. कारण वाईट विचार मनात आल्यास त्यांना रोखण्यासाठी अध्यात्मिक विचारांचे चिंतन करावे.

- तुळशीराम गुट्टे महाराज

मन कधी चांगल्या विचारांची कल्पना करते, तर कधी वाईट. या दोन्ही कल्पना मनाला स्थिर बनू देत नाहीत. वाईट गोष्टींचे चिंतन करू न देणे महत्त्वाचे आहे. कारण वाईट विचार मनात आल्यास त्यांना रोखण्यासाठी अध्यात्मिक विचारांचे चिंतन करावे. अध्यामिक विचारांचे चिंतन केल्याने वाईट विचारांचा आकार बदलत जातो. माणसांच्या मानसिक व भावनात्मक गोष्टींमुळे मनात परिवर्तन होते. आपणच आपल्याला मानसिकदृष्ट्या सुदृढ ठेवण्यासाठी सकारात्मक गोष्टींचा विचार केला पाहिजे. सकारात्मकता आपल्या जीवनात संतुलन निर्माण करते. मनाला प्रलोभनाकडे भटकू देत नाही. आपल्या मनाचे लक्ष ईशतत्त्वाकडे किंवा कोणत्यातरी दिव्यत्वाचे चिंतन करण्याकडे धावले पाहिजे. मग आपले मन वाईट विचारांना प्रतिबंध करते. आपल्याला मोहात पाडणाऱ्या विषयाला दूर सारून मग ईश्वराकडे ते मन बोलते. मनाला मोहित करणाऱ्या विषयांप्रति घृणा व किळस निर्माण होते. म्हणून साधकांनी किंवा सात्त्विक वृत्तीच्या माणसांनी ध्यानाचा अभ्यास करावा. कारण ध्यानाने मनात सात्त्विकता निर्माण होते. आत्मिक ऊर्जास्पंदने निर्माण होतात. त्यातून वाईट विचारांवर मात होते. मनाची चाललेली ओढाताण थांबते. साधकांनी मनाला आवर घालावा. यासाठी योग-ध्यान या मार्गाचा अवलंब करावा. कारण मनामध्ये चाललेल्या प्रचंड गोंधळाला शांत करावे. यासाठी महत्त्वाचा उपाय ध्यानधारणा सांगितला आहे.

मानसशास्त्राच्या सिद्धांतानुसार ज्या गोष्टीचा परिणाम शरीरावर होतो, तिचाच मनावरही होतो. कारण शरीरापेक्षा मनावर होणारा परिणाम अधिकपटीने जास्त होतो. आजकाल चिडचिड करणारे माणसं जास्त दिसून येतात. कारण सर्वत्र अशांतता, द्वेष, मत्सर जाणवतो. ही लक्षणे दुर्बल मनाची आहेत. म्हणून म्हणावेसे वाटते, मनाला सुदृढ स्थितीत ठेवायचे असेल तर ध्यान साधना करा. ध्यानाने मग परिपक्व होते. सकारात्मकता निर्माण करण्यासाठी ध्यानाचा उपयोग होतो. सकारात्मकता निर्माण झाली की नकारात्मकता नष्ट होते. मग वाईट विचार नष्ट होतात. मन सुदृढ होते. मग शारीरिक, मानसिक धोका उद्भवू शकत नाही. मग आपल्याच मनावर आपले नियंत्रण राहाते.

(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशन चे अध्यक्ष आहेत.)

 

टॅग्स :spiritualअध्यात्मिक