शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

बेकार सुशिक्षित असू शकतो आणि सुशिक्षित बेकार कसा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 05:08 IST

स्वावलंबन हा त्याचा गुण आहे. तो कधीच परोपजीवी नसतो. तो कुणाला झिजवत नाही, राबवत नाही.

- बा.भो. शास्त्रीस्वावलंबन हा त्याचा गुण आहे. तो कधीच परोपजीवी नसतो. तो कुणाला झिजवत नाही, राबवत नाही. हेच स्वावलंबन स्वत:ला, समाजाला व देशाला मोठं करतं. त्याच्या कष्टातून ईष्ट जन्माला येतं. जीवन सुखी होतं, सुशिक्षित बेकार हा शब्द किती विचित्र आहे. बेकार सुशिक्षित असू शकतो आणि सुशिक्षित बेकार कसा? अशिक्षिताच्या कारखान्यात सुशिक्षित बेकार वॉचमन होतो. स्वत:ची भाकरी न कमवता आईच्या कष्टाच्या भाकरीवर जगणारा सुशिक्षित कसा? वयाच्या पंधराव्या वर्षी शिवाजी महाराज स्वत:च्या पराक्रमाने माऊली किल्ला जिंकतात म्हणूनच त्यांना ‘‘यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत’’ असं समर्थ म्हणाले. इथंच थांबलं नाही तर ‘श्रीमंतयोगी’ असंही म्हटलं आहे. तपात संयम असतो. संयमाला यम घाबरतो. थोडासा संयम असेल तर रोडवर गाड्यांचं अपघाताचं प्रमाण घटेल. मोबाईलचं संकट टळेल. असंयम हाच अवघ्या अपघाताचा जनक आहे व तितिक्षा हीच तपश्चर्या आहे. तपश्चर्या कालबाह्य झाली असं कसं म्हणता येईल? शाश्वतमूल्यं कधीच कालबाह्य होत नसतं. शास्त्रज्ञ संशोधनासाठी घेत असलेले कष्ट, शेतकरी व कामगारांचे कष्ट, सीमेवर लढणाऱ्या जवानांचं समर्पण आई-बाबा हे तपातच मोडतात. एका मराठी भावगीतात परपुष्ट संन्याशाबद्दल म्हटलं आहे.‘‘रुद्राक्षांच्या गळ्यात माळालाविलेस तू भस्म कपाळाकधी न घेऊन नांगर हातीपिकविलेस मातीतून मोतीकाय अभाग्या भगवे नेसूनघर संन्यसून जासी’’आळशी व ऐतखाऊ लोकांमुळे तपाचा अर्थ धूसर झाला. नियमित व्यायाम, वाणीची स्वच्छता, निर्मळ दृष्टी, स्वकष्टार्जित धन, शुद्ध आहार व सहिष्णुता या सद्गुणांचा समूह हचा तपसाधना आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक