शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत पाकिस्तानातून पाठवलेला शस्त्रांचा साठा जप्त; लॉरेन्स टोळीसह कुख्यात गुंडांना हत्यार पुरवणार होते
2
"तुम्ही काट मारली, तर मी पण काट मारणार"; अजित पवारांनी माळेगावकरांना दाखवली अर्थमंत्रालयाची ताकद
3
IND vs SA : 'आत्मनिर्भर' बुमराह! मार्करमला बोल्ड केल्यावर KL राहुलसोबतचं सेलिब्रेशन ठरलं खास (VIDEO)
4
यूट्यूबवर एअर शोचा Video पाहत होते विंग कमांडरचे वडील, मिळाली लेकाच्या मृत्यूची माहिती
5
'ईठा'च्या शूटवेळी श्रद्धा कपूरला दुखापत, शूटिंग थांबलं; तमाशा सम्राज्ञी विठाबाईंच्या भूमिकेत दिसणार
6
पायलटचे नियंत्रण सुटले की ब्लॅकआउटमुळे अपघात झाला? संरक्षण तज्ञांनी तेजस अपघाताचे कारण सांगितले
7
Multibagger Stock: पैसाच पैसा! ₹२८ च्या शेअरनं केलं मालामाल; ५ वर्षात दिला ५६,०००% पर्यंतचा तुफान रिटर्न
8
५ वेळा डावलले, तरी 'एकनिष्ठ'; तिकीट न मिळाल्याने BJP च्या कार्यकर्त्याची बॅनरबाजी; सत्तेचा लोभ नसल्याचा दिला संदेश
9
Mumbai Local: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर आजपासून १२ दिवस विशेष रात्रकालीन ब्लॉक
10
"...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
11
अदानी समूहानं तयार केल्या २ नव्या कंपन्या, काय करणार काम? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
'संगीत देवबाभळी' फेम अभिनेत्री घटस्फोटाच्या ३ महिन्यानंतर दुसऱ्यांदा बांधतेय लग्नगाठ, केळवणाचे फोटो केले शेअर
13
india Israel: कॅमेरा लावलेली गोळी पोटात गेल्यावर काय होते? कुठून आल्या कल्पना?
14
Maharashtra CET: सीईटीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, कुठल्या दिवशी कोणता पेपर? वाचा
15
IND vs SA : बुमराहनं मार्करमसाठी जाळं विणलं; पण KL राहुलनं स्लिपमध्ये झोपा काढत त्यावर पाणी फेरलं!
16
श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत अडचणीत, २५२ कोटींच्या ड्रग्स केसप्रकरणी मुंबई पोलिसांनी पाठवलं समन्स'
17
विनायक चतुर्थी २०२५: मार्गशीर्ष विनायक चतुर्थी ठरणार खास, गणेशकृपेने ९ राशींची पूर्ण होणार आस!
18
धक्कादायक! मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली, मृतदेह तलावात फेकून दिला
19
Tarot Card: लोभाला बळी पडू नका, मनाचा कौल घ्या; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
20
पाकिस्तानच्या तुरुंगातील खलाशांना आणा, राज्य शासनाकडे मागणी; १८ मच्छीमार तुरुंगातच!
Daily Top 2Weekly Top 5

संतमार्ग हा तेजाचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 18:20 IST

जर आम्हाला ईश्वरी अनुभूती घ्यायची आहे तर आम्हाला त्याचं गुणगान भावयुक्त अंत:करणाने करावं लागेल. मुळातच जगातील सगळ्या संतांनी साधनामार्गांचं मुख्य अधिष्ठान भाव हेच सांगितलं आहे. भावविरहित बुद्धीने परमार्थ साधू शकत नाही हे सांगताना आमचे ज्ञानोबाराय म्हणतात,

ठळक मुद्दे म्हणून आमच्या ठायी भाव असलाच पाहिजे आणि तोही बळकट व दृढ तसेच निष्ठाधिष्ठित भाव असला पाहिजे.

संतांनी आम्हाला दाखविलेला प्रत्येक मार्ग हा तेजाचा मार्ग आहे आणि तो खूप सखोल व स्वच्छ आहे. या तेजस्वी मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रत्येक जीवाच्या जीवनात तेजच येते. या तेजाचा विचार करता त्यांनी आम्हाला,‘सहज बोलणे हित उपदेश।करुनि सायास शिकविती।।’या न्यायाने आमच्या जीवनातील कितीतरी समस्यांवरची उत्तरे दिलीत किंवा उपाय सुचविलेत.संतांनी असेच जे अनंत उपाय आम्हाला सांगितले आहेत. त्यातीलच ईश्वराच्या प्राप्तीचा एक खूप देखणा व आम्हाला सर्वांगाने अंतर्मुख करणारा उपाय सांगताना आमचे तुकाराम महाराज सांगतात,‘भावे गावे गीत।शुद्ध करोनिया चित्त।।तुज व्हावा आहे देव।तरी हा सुलभ उपाव।।’जर आम्हाला ईश्वरी अनुभूती घ्यायची आहे तर आम्हाला त्याचं गुणगान भावयुक्त अंत:करणाने करावं लागेल. मुळातच जगातील सगळ्या संतांनी साधनामार्गांचं मुख्य अधिष्ठान भाव हेच सांगितलं आहे. भावविरहित बुद्धीने परमार्थ साधू शकत नाही हे सांगताना आमचे ज्ञानोबाराय म्हणतात,‘भावबळे आकळे एरव्ही नाकळे।करतळी आवळे तैसा हरी।।’पारमार्थिक अनुभूती घेण्यासाठी बाकी कोणतं बळ आमच्या अंगी असो अथवा नसो, पण भावाचं बळमात्र आमच्या अंगी असायलाच हवं. एक भाविकसामर्थ्य आमच्या अंगी असेल, तर आम्हाला आमचं साधकीय जीवन अगदी सुदृढपणाने जगता येऊशकतं. म्हणून आमच्या ठायी भाव असलाच पाहिजे आणि तोही बळकट व दृढ तसेच निष्ठाधिष्ठित भाव असलापाहिजे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकkolhapurकोल्हापूर