शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

आनंद तरंग: दुष्टांचा संहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 04:00 IST

एक अतिरेकी मारणं पापच. पण अनेक निरपराधी वाचवणं हा त्या पापाचा शुद्ध हेतू आहे. इथे हिंसाच अहिंसा होऊन जाते. सतत मार खाणारी अहिंसा अनेकांच्या हिंसेला कारणीभूत होत असेल तर ते पुण्य पापात्मक आहे.

बा.भो. शास्त्री

एक अतिरेकी मारणं पापच. पण अनेक निरपराधी वाचवणं हा त्या पापाचा शुद्ध हेतू आहे. इथे हिंसाच अहिंसा होऊन जाते. सतत मार खाणारी अहिंसा अनेकांच्या हिंसेला कारणीभूत होत असेल तर ते पुण्य पापात्मक आहे. अंगलट येणारी दया पृथ्वीराज चौहान या पराक्रमी राजाला भोवली. फसवा घोरी जिंकला. क्षमा हरली. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात,‘‘दया तिचे नाव धर्माचे पालनआणिक निर्दालन कंटकाचे’’किती सुंदर अभंग आहे हा. धर्माचे पालन दयाच करते व दुष्टांचा संहार हेही दयेतच येतं. अभ्यासासाठी मुलांना निवेदन देऊन काय उपयोग? त्यांच्यावर रागावणं गरजेचं आहे. बेसुमार मोबाइलचा वापर करणारी मुलं आणि मुली अनिष्टाच्या भोवऱ्यात सापडत असतील तर त्याला आपणच जबाबदार असतो. यांचं भान आपल्याला असावं लागतं. तेव्हा त्यांना समज द्या. काही ऐकतील, काही ऐकणार नाहीत. न ऐकणारे तुम्हाला सोडायला तयार आहेत, मोबाइल नाही. संसार सोडणाऱ्या संन्याशाच्या कानाला तो चिकटला आहे. कसं करणार? तो कसा वापरायचा तुम्ही सांगालही. पण तसं करीलच याचा भरोसाच नाही. रेडिओ कानातून घुसला. हा डोळ्यातून शिरला. चांगलं माहितीचं प्रलोभन दाखवून. हा वाईट जास्त शिकवतो. त्यात धर्म आहे. अधर्म आहे. कीर्तन आहे. नर्तन आहे. राम आहे. काम आहे. अशा चक्रव्यूहात अभिमन्यू व सभेत द्रौपदी आहे. मोबाइलला दया येत नाही. चांगलं स्वीकारणाऱ्यांची संख्या कमी तर वाईट घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. आम्ही पांडवांसारख्या माना खाली घालतो. त्यांना वाचवण्यासाठी हुशारीने इष्टकारक अनिष्ट करायला काय हरकत आहे?

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक